Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेचा भोंगळ कारभार आणि कंत्राटदारांची मिलीभगत आता सामान्य नागरिकांच्या जीवावर उठू लागली आहे. प्रभाग क्रमांक १३ व १४ मधील शनी मंदिरासमोर अवघ्या एक महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला दगडी रस्ता महिना उलटायच्या आतच पूर्णपणे उखडला आहे. प्रशासनाच्या या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे संगमनेरकर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत प्रशासकीय ढिषाळपणाचे जाहीर वाभाडे काढले आहेत. तसेच प्रशासनाला जागे करण्यासाठी थेट ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलनाचा सणसणीत इशारा दिला आहे. रस्ता की मृत्यूचा…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीचे वातावरण राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, मात्र नवीन कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक दडपण कमी होईल. व्यापारात धनलाभाचे योग असून नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यास मदत करेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि मधुर होतील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि अतिक्रमणमुक्त मोहिमेअंतर्गत संगमनेर नगरपालिका प्रशासनाने आज मोठी कारवाई केली. अकोले बायपासवरील बीएड कॉलेजसमोरील अनधिकृत भाजीपाला मार्केट पालिकेच्या पथकाने पूर्णपणे हटवले. मात्र, या कारवाई दरम्यान पालिका कर्मचारी, पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागून पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यात दोन कर्मचाऱ्यांचे कपडे फाटल्याची धक्कादायक घटना घडली असून, पोलिसांनी एका विक्रेत्याला ताब्यात घेतले असून त्याने मद्यप्राशन केले असल्याचे बोलले जात आहे. संगमनेर नगरपालिकेने शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे रस्ते आणि चौक मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील पेटीत हायस्कूल परिसरातील चौकात…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटली असून भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निर्णयाला धुडकावून लावत शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यानंतर स्वतः अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने सत्तार यांचा भाजपवरील राग अनावर झाला. अत्यंत आक्रमक भाषेत भाजपवर प्रहार करताना ते म्हणाले, शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच…
संगमनेर | प्रतिनिधी राज्यातील तब्बल ८१ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून अपात्र ठरवून महायुती सरकारने महिलांच्या विश्वासाला तडा दिला असून ही महिलांची सरळसरळ फसवणूक असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवून मतदान केले म्हणूनच हे सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेत आल्यानंतर त्याच महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे काम सरकारने केले आहे. ८१ लाख महिलांना अपात्र ठरवणे म्हणजे त्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरण्यासारखे आहे, असे थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले. महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा ढासळत चालली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहरातून बुलेट दुचाकीच्या सायलेन्सर मधून मोठमोठे आवाज काढत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एका तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू साळुंखे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या आठ दिवसांपासून बस स्थानक आणि नवीन नगर रोड परिसरात हा युवक आपल्या बुलेटमधून फटाक्यांसारखे मोठे आवाज काढून नागरिकांना व व्यापाऱ्यांना नाहक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून स्थानिक व्यापाऱ्यांनी शहर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सावंत यांनी या तरुणावर पाळत ठेवली. दुपारच्या सुमारास हा युवक पुन्हा बस स्थानक परिसरात आपल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: समनापूर बायपास चौफुली येथे महिनाभरापूर्वी झालेल्या गंभीर आणि प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी अरबाज जहागीरदार आणि जुनेद शेख यांना अटक करण्यात संगमनेर शहर पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अरबाजला पोलिसांनी थेट पुण्यातून ताब्यात घेतले, तर जुनेदला संगमनेरमधील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे संगमनेर आणि परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. सुमारे एका महिन्यापूर्वी संगमनेर जवळील समनापूर बायपास चौफुली येथे दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोरांनी फिर्यादीवर चाकूने तब्बल ७ वार केले होते.…
मुंबई, विशेष प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या मोठ्या बदलांमधून जात आहे. बँक खात्यांची पडताळणी आणि ई-केवायसी मोहिमेनंतर या योजनेतील तब्बल ८१ लाख महिला अपात्र ठरल्या असून, सध्या लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ६६ लाखांवरून १ कोटी ८५ लाखांवर आली आहे. योजनेच्या सुरुवातीला २.४० कोटी लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र बँकांकडून मिळालेल्या माहितीनंतर बनावट लाभार्थी, पुरुष, सरकारी कर्मचारी आणि प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तींनीही याचे लाभ घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे राज्य सरकारने पडताळणीची प्रक्रिया कडक केली असून, यामुळे शासनाची दरमहा १२०० कोटी रुपयांची मोठी बचत होणार आहे. याशिवाय, ६५ वर्षांवरील वयोमर्यादेच्या अटीमुळे सुमारे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकाम, तीव्र ब्लास्टिंग आणि स्टोन क्रेशरच्या त्रासाला कंटाळून अखेर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आजपासून (१ जून) उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. गावालगत अव्याहतपणे सुरू असलेल्या या खाणकामामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या जोरदार ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. याशिवाय, क्रेशरमधून उडणाऱ्या धूळ प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले आणि…
मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमालीची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांचे सत्र अखेर संपले असून, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला आहे. विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांपैकी तब्बल ११ जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीचा तिढा सुटून उमेदवारांची घोषणा झाल्यामुळे आता राज्यातील विधानपरिषदेचा हा रणसंग्राम अधिकच चुरशीचा आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित जागांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ४ जागांवर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. जागावाटपाचा हा फॉर्म्युला निश्चित होताच भारतीय जनता पक्षाने…
