Author: अनंत पांगारकर
आजचे राशिभविष्य मेष- आज नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा मोठे पद मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात घेतलेले छोटे निर्णय देखील भविष्यात मोठा नफा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणांमध्ये धावपळ होऊ शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. वृषभ- तुमचे नम्र वागणे आणि गोड बोलणे यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी भेट झाल्यामुळे मन आनंदी होईल. एखादा लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे, जो लाभदायक ठरेल. कौटुंबिक वातावरण सुखाचे राहील, मात्र कायदेशीर किंवा प्रशासकीय कामांमध्ये निष्काळजीपणा करू नका. मिथुन- आज घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सध्या समाजात वाढलेली नकारात्मकता दूर करून मानवता आणि आनंदाची निर्मिती करण्यासाठी संपूर्ण जुलै महिना ‘मंथ ऑफ काइंडनेस’ (दयाळूपणाचा महिना) म्हणून राबवण्याचा एक अनोखा संकल्प प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सोडला आहे. या मोहिमेत प्रत्येकाने दररोज किमान एक चांगली कृती करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जगभरात अशा प्रकारची संकल्पना पहिल्यांदाच संगमनेर तालुक्यात राबवली जात असून, या संदर्भात यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जागतिक युद्ध, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि नकारात्मक बातम्यांमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे, ज्याचा विपरीत परिणाम पुढील पिढीवर होत आहे. हे…
विशेष प्रतिनिधी / मुंबई “देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्षचोरी केली जाऊ लागली, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागलं आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क आणि अधिकार नाकारले जात आहेत, म्हणून वेळीच सावध व्हा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आवाज बुलंद करा,” असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणाच्या प्रभारी मीनाक्षी नटराजन यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे “लोकशाही वाचवा निर्धार सभा” आयोजित करण्यात आली होती.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: अवैध मुरूम आणि माती वाहतुकीबाबत जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला झाला असून, यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात ही धक्कादायक घटना घडली. समजलेल्या माहितीनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असलेले फिर्यादी संदीप घुगे (वय ४३) हे रात्री जेवण करून घराबाहेर शतपावली करत असताना, दोन मोटारसायकलवरून सहा जण तेथे आले. त्यातील एका गाडीवर विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे), प्रवीण ठकाजी पुणेकर व सुदर्शन शिवाजी श्रीराम (दोघे रा. डिग्रस) हे होते. विशाल व प्रवीण यांनी घुगे यांना पाहताच पिस्तूल उपसून ‘तुझा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने रविवारी (५ जुलै) सायंकाळी सहा वाजता एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यापारी असोसिएशन हॉल येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ‘तापलेल्या पृथ्वीची गोष्ट’ या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. गुरुदास नुलकर प्रकाश टाकणार आहेत. हवामान बदलाचे चटके संपूर्ण जगाला बसत असताना, या संकटाची दाहकता आणि त्यामागील शास्त्रीय कारणे समजून घेणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने आयोजित या व्याख्यानात डॉ. नुलकर हे सामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनात कशी भर घालता येईल, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करतील. सत्यशोधक विचार मंच आपल्या प्रबोधनपर उपक्रमांसाठी ओळखला जातो. मंचाचे समन्वयक संदीप…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने चांगला राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी किंवा कार्यालयीन अधिकारी वर्गाशी चर्चा करताना अत्यंत सजग राहा. व्यावसायिक योजनांमध्ये काही सकारात्मक बदल करावे लागतील, ज्यासाठी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. कुटुंबातील वातावरण धार्मिक राहील. वृषभ – आज कामाच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या संदर्भात परदेश प्रवासाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्री जाण्याचा तुमचा संकल्प आज तडीस जाऊ शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. मिथुन – आज विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. नेहमीपेक्षा अतिरिक्त किंवा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा मनात प्रबळ होईल. घरातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलिसांचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कारनामा समोर आला असून, दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला चक्क २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने जेलमध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळे न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर तीव्र शब्दात प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तपासी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणावरून आता मानवाधिकार आयोग देखील चौकशी करण्याची शक्यता असून पोलीस प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. एवढा गंभीर प्रकार घडत असताना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे चिमुकलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला आज शंभर दिवस उलटूनही आरोपी अद्याप सापडलेला नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तपासातून अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर न आल्याने त्यांनी बुधवारी विधिमंडळात या विषयावर पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवला. या संवेदनशील प्रकरणासंदर्भात आमदार तांबे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची विनंती केली होती. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः पीडित कुटुंबाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या मागणीला अखेर मोठे यश आले आहे. नगर परिषदेकडून या ऐतिहासिक कामासाठी अधिकृत निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, संगमनेर शिवजयंती उत्सव युवक समिती आणि शहरातील शिवभक्तांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. २६ मार्च २०२१ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने कतारी यांनी निवेदन देत यासंबंधीची मागणी केली होती. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाचे तत्कालीन शहर प्रमुख सध्याचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शिवजयंती उत्सव समिती व शिवभक्तांकडून या स्मारकांसाठी सातत्याने निवेदने देऊन पाठपुरावा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीसाठी हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पांसाठी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी विशेष पुढाकार घेतला असून, संगमनेर नगर परिषदेने या कामासाठी अधिकृत निविदा प्रसिद्ध केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून, दोन्ही महापुरुषांच्या भव्य स्मारकांचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर बस स्थानकाच्या आवारात प्रस्तावित चौथर्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंधरा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा ब्राँझ गनमेटल या धातूपासून बनविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, शिवाजी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सद्यस्थितीत असलेल्या…
