Author: अनंत पांगारकर
नागपूर – राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होऊन देखील अद्यापपर्यंत पालकमंत्र्यांचा पेच सुटू शकलेला नाही. २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन समोर असताना देखील अद्यापही पालकमंत्री निवडीस मुहूर्त लागू शकलेला नाही. पालकमंत्री निवडीवरून महायुतीत मतभेद असल्याचे बोलले जात आहे, या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे भाष्य करत २६ जानेवारी पूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर झालेले असेल असं म्हटले आहे. शुक्रवारी नागपुरात मंत्री बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पालकमंत्री नियुक्तीचा कोणताही पेच नाही. महायुतीचे सरकार असल्याने घटक पक्षांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. येत्या २६ जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर झालेले असेल. यापूर्वी बावनकुळे यांनी १५…
अहिल्यानगर – अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेच्या काळात अकार्यकारी पदावर बदली केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अशा २० अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. शुक्रवारी ओला यांनी या बदल्यांचे आदेश काढले. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगमनेर पोलीस उपअधीक्षकांचे वाचक असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांची घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. याशिवाय कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती मुळुक यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना अर्ज शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे टीएमसीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.…
मुंबई, दि. १८ : एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. शुक्रवारी परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, नवीन बस खरेदीचा करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग (प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या) होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा. याबाबत सर्वांगीण अभ्यास करून…
माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा लौकिक देशपातळीवर! संगमनेर – संगमनेरमधील सहकारमहर्षी चषकातून आयपीएलसह देशपातळीवरचे अनेक खेळाडू तयार होतील, असा विश्वास स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी व्यक्त केला. राज्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सर्वात गौरवशाली ठरलेल्या सहकार महर्षी T-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या एस आर एस संघाने 277 धावांचे मोठे आव्हान उभे करून पुण्याच्या पुनीत बालन संघाचा 37 धावांनी पराभव करून मानाचा सहकार महर्षी चषक पटकावला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या 25 व्या वर्षातील क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी…
२० जानेवारीपासून दुकानासमोर बानोबी शेख करणार उपोषण संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या मालकीच्या मिळकतीवर अवैधरित्या सुरू असलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली असून यासंदर्भात पालिका व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याने येत्या सोमवारपासून (२० जानेवारी) दुकान समोरील रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून या उपोषणात सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक सहभागी होणार आहे, अशी माहिती तक्रारकर्त्या बानोबी शेख यांनी दिली आहे. दरम्यान या विषयावरून दोन दिवसांपूर्वी संगमनेर नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी या परिसरातील नागरिक, माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला घेराव घालत संबंधित दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली…
अहिल्यानगर ता. १७ – ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळून गावकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्वामित्व योजनेंतर्गत ५० लाख मालमत्ता पत्रकाचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे. शनिवारी (१८ जानेवारी) रोजी दुपारी १२-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या योजनेअंतर्गत भूमी अभिलेख विभागामार्फत आतापर्यंत ३ लाख १७ हजार गावांमधून ड्रोनद्वारे सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले असुन १ लाख १९ हजार गावांमधून २ कोटी १९ लाख मालमत्ता पत्रक तयार करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक-पुणे महामार्गावर शुक्रवारी (१७ जानेवारी) सकाळी झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातामध्ये नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमधील दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला. आता त्या पाठोपाठ नारायणगाव जवळ झालेल्या या अपघातामुळे महाराष्ट्र हळहळला आहे. एसटी बस, ट्रक आणि मॅक्झिमो व्हॅनमध्ये हा मोठा अपघात झाला. देबुबाई दामू टाकळकर (वय ६५ वर्ष, रा. वैशखखेडे ता. जुन्नर जि. पुणे), विनोद केरूभाऊ रोकडे (वय ५० वर्ष, रा. कांदळी ता. जुन्नर जि. पुणे), युवराज महादेव वाव्हळ (वय २३ वर्ष, रा. १४ नंबर कांदळी ता. जुन्नर…
संगमनेर – १२ गायी आणि २ वासरांची संगमनेरच्या बेकायदेशीर कत्तलखान्यात कत्तल होण्यापूर्वीच पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी या गोवंश जनावरांना जीवदान दिले आहे. संगमनेर शहरातील मदिना नगर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार समोर आला. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मदिनानगरमधील एका काटवणामध्ये कत्तलीसाठी जिवंत गोवंश जनावरे बांधून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. सोनवणे यांनी यासंदर्भात आपल्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपाधीक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे व पोलीस नाईक राहुल डोके यांचे घटनास्थळी जात मिळालेल्या माहितीच्या आधारे मदिनानगरमध्ये जात पाहणी केली असता पथकाला चौदा…
मुंबई – गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य निवडणूक आयुक्तपदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी, राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांकडे नावाची शिफारस करण्याचे अधिकार होते, त्यानंतर मुख्यमंत्री ते नाव राज्यपालांकडे पाठवायचे. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना थेट उमेदवाराची शिफारस करतील. राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. तसेच येत्या काही महिन्यांत या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांवर…
मुंबई, दि. १६ : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१६ जानेवारी) राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट आणि राज्य मंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. मात्र या सर्वच सेवा आपले…
