Author: अनंत पांगारकर
नाशिक – १९ नोव्हेंबर नाशिकमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये आयोगाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला असून यामध्ये तब्बल पाच कोटींची रोकड जप्त केली आहे. एका नेत्यालाही वाहनासोबत ताब्यात घेतलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची राज्यभर करडी नजर आहे. गस्तही वाढवण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आज नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये छापा मारला. या छाप्यात अधिकाऱ्यांनी एका राजकीय नेत्याकडे ५ कोटीची रोकड आढळून आली. अधिकाऱ्यांनी लागलीच त्या नेत्याला त्याच्या वाहनासह ताब्यात घेतलं. दरम्यान त्याच्याकडे इतकी मोठी रक्कम कुठून आली कुठे घेऊन…
अहिल्यानगर जिल्ह्यात बाराच्या बारा जागी महाविकास आघाडी निवडून येणार ३५ वर्ष सत्ता असून राहत्याचा विकास का नाही? एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान देऊ नये ते का स्वीकारले नाही? काहींनी संगमनेरला रणभूमी करण्याचे ठरविले होते शिर्डीच्या हॉस्पिटलला कोण अडथळे आणतय मंगळवार १९ नोव्हेंबर संगमनेर – आचारसंहिता काळातही जिल्हा प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असून एकतर्फीपणे वागत आहे. राजकारणासाठी जनतेच्या प्रश्नांची कोणी खेळू नये असे सांगत यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तीन तक्रारी केल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाली तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातील विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार अशी शक्यता असतानाच ‘बटेंगे तो कटेंगे’ या योगी आदित्यनाथ यांच्या नाऱ्याने वातावरण निर्मितीत महायुती मागे पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ‘लाडकी बहीण’मुळे निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती ‘बटेंगे तो कटेंगे’ या प्रचारामुळं पुरती रसातळाला गेल्याचं दिसू लागलं आहे. याचा फटका निवडणुकीत महायुतीला बसू शकतो, असे अंदाज बाहेर येऊ लागले आहेत. मे 2024 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. यावेळी महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर ‘भटकती आत्मा’ आणि ‘उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे ‘नकली संतान’ अशी टीका केली होती.…
सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडत आहे. त्यानंतर शनिवारी (२३ नोव्हेंबर) येथील भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात मतमोजणी पार पडणार आहे. मतदान ते मतमोजणी दरम्यान प्रशासनाने नेमकी काय तयारी केली आहे, मतदारांनी काय काळजी घ्यावयाची याबाबत संगमनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी माहिती दिली. काय म्हणाले निवडणूक निर्णय अधिकारी बघा व्हिडिओ…
सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर तालुका हा एकनिष्ठ विचारांचा आहे. आमदार बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाशी तर संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे त्यांच्याशी गद्दारी करून सरकार स्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संगमनेरमध्ये पाऊल ठेवू शकणार नव्हते. मात्र त्यांच्या नावाखाली तालुक्यातील तरुणांना बनवाबनवी करून संगमनेरात बोलावून फसवले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेचा बार फुसका ठरल्याची टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, सध्याचे मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आणि संगमनेरमध्ये गद्दारीला माफी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथे येणार नव्हते. हे सर्वश्रूत…
सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – प्रतिनिधी राज्यातील मतदारांमध्ये महायुतीच्या कारभाराबद्दल प्रचंड रोषाचे वातावरण असून महाविकास आघाडीबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करत असंविधानिक, बेकायदेशीर भ्रष्ट सरकार सत्तेवरून घालून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणे याला आमचे प्राधान्य असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार संपण्यापूर्वी थोरात सोमवारी दुपारी संगमनेरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जयश्री थोरात यादेखील उपस्थित होत्या. थोरात म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र सायंकाळी प्रचाराची सांगता होत आहे. राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही.…
२४३८ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृह मतदान तर ५६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान ८५ वर्षांवरील २१०६ ज्येष्ठ नागरिक, ३३२ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान सोमवार, १८ नोव्हेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात तीन दिवस गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. यात २४३८ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृह मतदान तर ५६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील आणि मतदान केंद्रापर्यत पोहोचू न शकणाऱ्या दिव्यांग मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.…
सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – बी. जे. खताळ पाटील यांचे सुसंस्कृत राजकारण व समाजकारण संपूर्ण राज्याला परिचित आहे. मात्र या आडनावाचा वापर करून समोरील व्यक्ती प्रशासनावर दबाव निर्माण करत आहे. पालकमंत्र्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून होत असलेली सेटलमेंट हा काय प्रकार सुरू आहे अशी टीका करताना भाजपकडून तालुक्यात सुरू झालेला धाक व दडपशाही प्रकार निंदनीय असल्याची टीका भाजपच्या आयटी सेलचे सहसंयोजक व नुकताच भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या विक्रमसिंह खताळ यांनी केली आहे. हॉटेल सेलिब्रेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत पत्नी शिवांगी खताळ होत्या. विक्रमसिंह खताळ म्हणाले, महसूलच्या अनेक कामांची बंदी असताना एका विशिष्ट कुटुंबासाठी नियम शिथिल…
सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – साखर धंदा मोठ्या अडचणीतून वाटचाल करत आहे. कारखाना कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत भाव देण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कौठे मलकापूर येथील ओसाड माळरानावर उभ्या राहिलेल्या श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या कारखान्याच्या आठव्या गळीप हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र बिरोले यांच्या पत्नी अश्विनी व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी विधीवत व शास्त्रोक्त पद्धतीच्या वैदिक मंत्रोपचारात पार पडला. यावेळी बिरोले बोलत होते. बिरोले म्हणाले, कारखान्याच्या मशिनरीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून या गळीप हंगामात दैनंदिन साडेतीन हजार…
अहिल्यानगर दि.१७- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूक कालावधीत मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. कोणत्याही मतदाराला मतदान केंद्रात मोबाईल सोबत बाळगता येणार नाही. उमेदवारांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीलादेखील सोबत मोबाईल बाळगता येणार नाही. मोबाईल बाळगल्यास मतदान केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. छुप्यारितीने मोबाईल बाळगल्यास व मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात मतदान होणार असल्याच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारण्यास बंदी राहील. तसेच मोबाईल फोन, स्मार्ट…
