Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. २३ मार्च – प्रतिनिधी कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क अखेर रद्द करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२५ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने बळीराजा चिंतेत होता. केंद्र सरकारने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने परिपत्रक काढून कांद्यावर असलेले २० टक्के निर्यात शुल्क रद्द करून शून्य करण्यात आल्याचे जाहीर केले असून हा निर्णय १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सुमारे…
गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये घडलेल्या घटनेची दखल आता सर्वदूर घेतली जाऊ लागली आहे. राज्य आणि केंद्र सरकार या दंगलीकडे एकांगाने पाहणार हे अगदी स्पष्टपणे दिसू लागल्याने यामागच्या डोक्याची चिरफाड करणं अत्यंत गरजेचं आणि तितकंच आवश्यक बनलं आहे. सरकार पुरस्कृत दंगल कशी असते हे नागपूरच्या घटनेने दाखवून दिलं. सरकारी पक्षाची लोकं भाजपचे नेते आणि यंत्रणा या दंगलीनंतर ज्याप्रकारे आग ओकण्याचं काम करत आहेत, ते पाहिलं तर ही दंगल सरकार पुरस्कृतच आहे, असं चित्र आहे. सरकारला विकली गेलेली माध्यमं आणि शासकीय यंत्रणांकडून यातलं खरं काय ते कळू देलं जात नाही. तरी समाजमाध्यमांनी केलेला पोलखोल सारं काही सांगून जात आहे. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत समाज…
नाशिक, दि. २२ मार्च जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या कर्जवाटपात अनियमितता झाल्यामुळे २५ माजी संचालक आणि त्यांच्या वारसांवर निश्चित केलेल्या आर्थिक जबाबदारीच्या प्रकरणात सहकार विभागाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. यात राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह सत्ताधारी पक्षांचे चार विद्यमान आमदार आणि काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा समावेश आहे. एक काळ असा होता, जेव्हा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा देशात नावलौकिक होता. परंतु, संचालकांच्या मनमानी कारभारामुळे ही बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. आज शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे आणि ठेवीदारांना पैसे परत करणेही बँकेला जड जात आहे. बँकेचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी बँकेच्या…
शिर्डी, दि. २२ मार्च – संत साहित्य आणि विचारांमधून समाजात एकतेचा संदेश दिला जातो. संतांची भूमिका नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी असते. संत साहित्य जोपर्यंत जिवंत राहील, तोपर्यंत समाजातील विषमता नष्ट होईल आणि एकता निर्माण होईल. संत विचारांमध्ये समाजाला एकत्र ठेवण्याची ताकद आहे, असे राज्याचे जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला शिर्डी येथे सुरुवात झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,…
मुंबई, दि. २२ मार्च – राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने शुक्रवारी ‘प्रत्यय’ ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू करत महसूल विभागाने महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ‘प्रत्यय’(PAPERLESS RIVISION & APPEALS IN A TRANSPERANT WAY) प्रणालीचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव संतोष कुमार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे,…
मुंबई, दि. २२ मार्च – प्रतिनिधी संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांवर नगरपरिषदेने अन्यायकारक शास्तीकर आणि दंडाचा बोजा टाकला आहे. यातून दिलासा मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून, त्यांनी लवकरच बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली. आपल्या फेसबुक या समाज माध्यमात दिलेल्या माहितीमध्ये खताळ म्हणाले, संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून छोट्या-मोठ्या जागा घेतल्या आणि हक्काची घरे उभारली. मात्र, नगरपरिषदेने त्यांना अनधिकृत बांधकामांचे कारण सांगत शास्तीकर आणि २% व्याजासह मोठी रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ही रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी…
मुंबई, दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. न्यायदंडाधिकारी समितीने नुकताच या प्रकरणाचा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे सादर केला आहे. या अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या अहवालामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, विरोधकांनी गृह मंत्रालय आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायदंडाधिकारी समितीच्या अहवालानुसार, सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत असताना गंभीर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याचे विधान केले होते.…
अहिल्यानगर, दि. २१ मार्च – राज्यातील जुन्या वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार, १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या सर्व नवीन वाहनांसाठी एचएसआरपी पाटी बंधनकारक आहे. तसेच, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठीही ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. यासाठी शासनाने पूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मात्र वाहनधारकांचा प्रतिसाद अपेक्षेइतका नसल्याने ती वाढवून ३० जून २०२५ करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबरप्लेटसाठी अर्ज मोटार वाहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://transport.maharashtra.gov.in)…
मुंबई, दि. २० मार्च २०२५: परभणीतील आंबेडकरी चळवळीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप असतानाही, पोलिसांनी ‘आकस्मिक मृत्यू’ असा अहवाल देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातही मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, हे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तरीही फडणवीस सरकार दोषी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करत नाही, हे दुर्दैवी आहे. परभणीतील घटना अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – सातारा, दि. २१ मार्च राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलेने गोरे यांच्याकडे हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी एक कोटी रुपये स्वीकारताना तिला सातारा पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी या महिलेने माध्यमांसमोर येत जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. महिलेने गोरे यांच्यावर नग्न फोटो पाठवल्याचा आरोप केला होता. हा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आरोप करणाऱ्या महिलेलाच खंडणी प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.…
