Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर, दि. २१ मार्च – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या घृणास्पद गुन्ह्यात, विशेष न्यायालयाने आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे (२०, खडांबे खुर्द, राहुरी, अहिल्यानगर) याला २० वर्षे सक्तमजुरीची कठोर शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय, विविध कलमांनुसार त्याला दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी दिली. विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यात एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ही धक्कादायक घटना १७ डिसेंबर २०२२ रोजी घडली, त्यावेळी पीडित मुलगी १२ वर्षे २ महिन्यांची होती. आरोपी अजय उर्फ विनायक…
संगमनेर, दि. २१ मार्च – प्रतिनिधी संगमनेर खुर्द येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला काल (गुरुवारी) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे साम्राज्य पसरले होते. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. संगमनेर खुर्द येथे नगरपालिकेचा कंपोस्ट डेपो आहे. संगमनेर शहर व उपनगरातील सर्व कचरा या डेपोत आणून टाकला जातो. तेथे या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. गेल्या काही दिवसांपासून या डेपोत मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. या डेपोला काल सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि धुराचे लोट परिसरात पसरले. आगीची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिकेच्या…
मुंबई दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी गोहत्या करणाऱ्यांवर यापुढे थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ससाणे नगर येथे फटाके फोडण्यावरून दोन गटात झालेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या घटनेत कुरेशी आणि ससाणे कुटुंबात झालेल्या हाणामारीत ससाणे कुटुंबातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. जगताप यांनी आरोप केला की, कुरेशी कुटुंब हे गो तस्करीमध्ये गुंतलेले असून, त्यांच्या दहशतीमुळे पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. तसेच, आरोपीला अटक होऊनही लगेच जामीन मिळाला. जामिनावर सुटल्यानंतर त्याने…
मुंबई दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधान परिषद आणि विधानसभा सभागृहांमध्ये सभापती आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपाती आणि एकांगी भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. गुरुवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. विधानसभेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात संसदीय परंपरांचे पालन व्हावे, नियमबाह्य कामकाज होऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे केली आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने सभापती आणि अध्यक्षांच्या मनमानी आणि एकांगी कामकाजाची तक्रार राज्यपालांकडे केली. विरोधी पक्ष हा संसदीय प्रणालीतील महत्त्वाचा घटक असून, त्यांची भूमिका सरकारविरोधी नसून सरकारचे निर्णय आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी…
पुणे, दि. २० मार्च – हिंजवडी येथे एका धावत्या मिनी बसने अचानक पेट घेतल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या जळीत कांडात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगण्यात आले, मात्र आता पोलिसांनी केलेल्या तपासात चालकानेच कट रचून या चौघांना जाळल्याचे उघड झाले आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसचा चालक जनार्धन हंबर्डे याने पूर्वनियोजित कट रचून हे कृत्य केले. त्याने गाडीमध्ये एक लिटर बेंझीन सोल्युशन केमिकल आणून ठेवले होते. त्यासोबत कापड्याच्या चिंध्या आणि काडीपेटीही त्याने आधीच गाडीत ठेवली होती. तपासात गाडीमध्ये शॉर्ट…
मुंबई, दि. २० मार्च – विशेष प्रतिनिधी संगमनेर शहरात सुरू असलेली गोवंश हत्या आणि शहरातील मोक्याच्या जागा तसेच तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव येथील देवस्थान जमिनी वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीरपणे नोंदणी झाल्याचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत मांडून राज्य सरकारचे या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील नवीन नगररोडवरील सर्व्हे नंबर १४९ (जुना सर्व्हे नंबर ८०३), क्षेत्र ४ एकर १७ गुंठे या मिळकतीवर तसेच तालुक्यातील घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर १६२ व १७९ येथील कानिफनाथ देवस्थान, सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर १९४ मधील कान्होबा देवस्थान आणि पारेगाव येथील श्री अश्विनाथ महाराज मंदिर या देवस्थानांच्या हक्काच्या संपूर्ण जमिनीवर वक्फ बोर्ड चुकीच्या पद्धतीने…
नाशिक, दि. २० मार्च – नाशिक-पुणे महामार्गावरील बोधले नगरजवळील आंबेडकर वाडी येथे बुधवारी (१९ मार्च २०२५) रात्री ९ ते १० च्या सुमारास दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. उमेश उर्फ मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या सहा तासांत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात वर्चस्व राखण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. क्राईम ब्रांच युनिट १ च्या पथकाने तपास सुरू केला असता, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी आणि हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी सागर गरड आणि त्याचे साथीदार नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील डाळिंब मार्केट येथे…
संगमनेर, दि. २० मार्च – प्रतिनिधी “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आता आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उसासंबंधीची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल,” असे स्पष्ट मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते, तर व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव पा. खेमनर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते…
मुंबई – विशेष प्रतिनिधी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी लवकरच नियमावली तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मध्ये सोशल मीडिया संदर्भात कोणताही उल्लेख नसल्याने, बदलत्या काळानुसार आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पुढील तीन महिन्यांत नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाज माध्यमांच्या वाढत्या वापरावर बंधने नसल्याबाबत सदस्य डॉ. परिणय फुके, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, ज्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा उपयोग जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा. या संदर्भात…
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आता एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिला परपुरुषांशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी लोणी येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेने (वय २९) दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१४ मध्ये विवाह झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने ठीक होते. मात्र, त्यानंतर पतीने तिला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सासू आणि सासरे यांनीही तिला वाईट वागणूक दिली. दीड वर्षांपूर्वी तिला लोणी येथे एका बंगल्यावर नेण्यात आले, जिथे एका अनोळखी व्यक्तीने तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध केले. या कृत्याची वाच्यता केल्यास फोटो…
