Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी | मुंबई अनेक अडथळे पार करत मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू पाहणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे नवाच अडथळा निर्माण झाला आहे. फडणवीस यांच्या विरोधात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शडडू ठोकला आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपलं आंदोलन पुन्हा सुरु होईल, अशा शब्दात जरांगे यांनी फडणवीस यांच्यापुढे आव्हान उभं केलं आहे. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यावरून आक्षेप नोंदवला असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावाची घोषणा व्हायला उशीर होत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम – राज्यात महायुतीने एकहाती सत्ता स्थापन केली असली तरी मुख्यमंत्रिपदावरून अजूनही पेच कायम आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा…
शुक्रवार २९ नोव्हेंबर – संगमनेर विधानसभा निवडणूक होताच संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पराभवाची मिमांसा करत नव्या जोमाने कामाला लागतानाच निष्क्रिय आणि गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी करणारा ठराव शिवसैनिकांच्या बैठकीत करण्यात आला आहे. चिंतन बैठक – विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. थोरात यांची पारंपारिक विरोधक असलेली ठाकरेंची शिवसेना यावेळी थोरात यांच्या सोबत असतानादेखील थोरात यांचा पराभव आत्मचिंतन करण्यास लावणारा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष आदेशाशी गद्दारी करत मतदार संघात विरोधी काम केले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संगमनेरमध्ये शिवसैनिकांची चिंतन बैठक पार…
शुक्रवार, २९ नोव्हेंबर – संगमनेर देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल को जनरेशन २००२४ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण केली आहे. ऊस गाळपाबरोबर कारखान्याने वीज निर्मितीमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्यावतीने स्पेशल…
विशेष प्रतिनिधी | मुंबई महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या त्यानुषंगाने महाविकास आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाची नौतिक जबाबदारी घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस श्रेष्ठीनी फेटाळून लावला आहे. निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र याला भाजपची बदमाशी कारण असल्याचं सांगत पटोलेंचा राजीनामा फेटाळण्यात आला. पटोले दिल्लीला – राज्यात एकीकडे सत्तास्थापनेची गडबड सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले. राजीनामा – त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली. या भेटीत नाना…
विशेष प्रतिनिधी | मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झालं, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के कसं झालं असा सवाल प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाला विचारला आहे. व्हिडिओ फुटेज जाहीर करा – ही वाढ चक्क ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसने…
गुरुवार २८ नोव्हेंबर – अहिल्यानगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुक्रवारपासून अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्र व जमावबंदी आदेश लागू केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र आदेश लागू – मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये २९ नोव्हेंबरपासून १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र हे आदेश लागू करण्यात आले आहे. यांना वगळले – जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्नाच्या मिरवणुका, प्रेतयात्रेच्या जमावास, याशिवाय पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह परवानगी घेतलेल्या मिरवणुकांना हे आदेश लागू राहणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. आदेशाचा भंग केल्यास कारवाई – उर्वरित सर्व ठिकाणी हे आदेश लागू असून या…
महाराष्ट्र संवाद – गुरुवार, २८ नोव्हेंबर नाशिक – लासलगावच्या दत्तनगरमधील अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अतिष दगडु ढगे (वय २४ रा. टाकळी विंचुर, ता. निफाड, जि. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश बा. द. पवार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती बंगले यांनी काम बघितले. ६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीच्या घरामध्ये अनाधिकाराने प्रवेश करत फिर्यादीच्या १७ वर्षीय वयाच्या मुलीस ‘तू तुझ्या मित्र-मैत्रिणींसोबत का फिरते, अशी विचारणा करत यावरून वाद घालत कुरापत…
बुधवार, २७ नोव्हेंबर – संगमनेर नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवशी आयोजित करण्यात आलेल्या संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयी सभेत अज्ञात चोरट्याने अहिल्यानगरमधील व्यावसायिकाची ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसात तक्रार दाखल – दरम्यान या संदर्भात हिंगणगाव जि. अहिल्यानगर येथील दीपक रामभाऊ सोनवणे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालपाणी लॉन्सवर घटना – संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांचा वाढदिवस होता. संगमनेरमधून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची विजयी सभा आणि विखे…
बुधवार २७ नोव्हेंबर – मुंबई मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना आता त्यात पुन्हा एका नव्या वादाची भर पडली आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद सुरू झाल्याचे समोर येत आहे. पालकमंत्रीपदावरून ठिणगी – राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील चार दिवस उलटून गेले तरी सत्ता स्थापन करण्यात अपयश आले आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू असतानाच आता पालकमंत्री पदावरून देखील वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाची पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्री पद कायम ठेवण्यात यावे अशी मागणी शिवसेना आमदारांकडून केली जात आहे. मंत्री ठरण्याआधीच पालकमंत्री – महायुती…
बुधवार २७ नोव्हेंबर लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसची पडझड झाल्याने काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहे. पटोले राजीनामा देणार देशमुख नवे प्रदेशाध्यक्ष – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीत अगदी काठावर निवडून आलेले नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून त्यांच्या जागी अमित देशमुख यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पटोले यांचा राजीनामा स्वीकारला जाणार असल्याची मोठी बातमी समोर येत असून काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. देशमुख लातूरहून विमानाने दिल्लीला – अमित देशमुख यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस हाय कमांडच्या आदेशाने…
