Author: अनंत पांगारकर
संगमनेर: अखिल भारतीय किसान सभा आणि ‘सिटू’च्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला ‘लॉग मार्च’ आता अत्यंत आक्रमक वळणावर पोहोचला असून, अहिल्यानगर लांब आहे, आता लोणी हेच आंदोलनाचे केंद्र असेल, अशी गर्जना डॉ. अजित नवले यांनी केली आहे. गुरुवारी हा मोर्चा संगमनेर येथून निझर्णेश्वरच्या दिशेने रवाना झाला असून, शुक्रवारी (दि. २७) मागण्या मान्य होईपर्यंत थेट पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर (वाडा) मुक्काम ठोकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे एकेकाळी पुणतांब्यातून ऐतिहासिक शेतकरी संप सुरू झाला होता, त्याच धर्तीवर आता आहार कर्मचारी आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप लोणीतूनच सुरू केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. रेल्वेचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत ऐतिहासिक फेरबदल करण्यात आले असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सुनेत्रा पवार यांची निवड होणे निश्चित मानले जात होते. वरळी डोम येथील सभागृहात पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने आणि हात उंचावून पाठिंबा दर्शवला. या निवडीनंतर प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांना एका खऱ्या सेनापतीची उपमा दिली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेरच्या तहसील कार्यालयातील लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात पकडले. अवघ्या आठवडाभरात महसूल विभागात झालेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. समजलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला त्यांच्या मालमत्तेचा वाटप पत्राचा आदेश करून हवा होता. यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण असतानाही, लिपिक कैलास खाडे याने या कामासाठी १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही खाडे लाचेच्या मागणीवर ठाम होता. अखेर कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, गुरुवारी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४…
संगमनेर, प्रतिनिधी – प्रशासकीय राजवटीच्या कालखंडानंतर नव्याने पदभार स्वीकारताच संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात अनेक दिवसांपासून रखडलेल्या सुमारे १५०० दाखल्यांचे विशेष मोहीम राबवून तातडीने वितरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातून आणि बाहेरगावावरून येणाऱ्या अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासकीय कामकाजाला गती मिळाली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरवासीयांना दर्जेदार सुविधा देण्याचे धोरण आखले आहे. प्रशासकीय काळात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल, मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, पण संवादात स्पष्टता ठेवा. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस उत्तम आहे. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचे विचार मनात येतील, मात्र अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊल उचलू नका. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मिथुन: आजचा दिवस धावपळीचा राहण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल, परंतु सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळावे. मुलांच्या प्रगतीमुळे…
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पात पालकमंत्र्यांनी मोडता घालू नये; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा घणाघात
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे रेल्वे सर्व मार्गे होण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे मात्र बदल करण्यात आलेला प्रकल्पाच्या माध्यमातून पालकमंत्री संगमनेर आणि अकोले या दोन तालुक्यांमध्ये वादाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप करत पालकमंत्र्यांनी या मार्गामध्ये मोडता घालण्याचे काम करू नये असा घणाघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. बुधवारी (२५ फेब्रुवारी) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेली रेल्वेची आखणी तांत्रिकदृष्ट्या योग्य होती. पालकमंत्र्यांनी या प्रश्नावर जनतेची दिशाभूल करणे थांबवावे आणि हा प्रकल्प मूळच्या सरळ मार्गानेच…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांना स्व. राधावल्लभ कासट, स्व. कुंदनसिंग परदेशी आणि स्व. कैलास (आप्पा) केसेकर यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन पालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या एकमेव नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आज (बुधवारी) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना दिले आहे. निवेदनानुसार, या तिन्ही नेत्यांनी संगमनेरच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी राबविलेले विविध उपक्रम आणि सामाजिक कार्याचा ठसा आजही जनमानसात उमटलेला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीसमोर राहावा आणि त्यांच्या…
मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीच्या कोट्यातून ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत थोरात यांच्या नावावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यांच्या नावामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला दिल्लीच्या राजकारणात मोठी संधी मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया २६ मार्चपासून सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. या जागेसाठी सुरुवातीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा झाली होती, तर शिवसेनेनेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसने आपला उमेदवार देण्याचा विचार सुरू…
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अलाईनमेंटवरून (मार्ग निश्चिती) सुरू असलेला तांत्रिक पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. हा रेल्वे प्रकल्प कोणत्याही अनावश्यक वळणाशिवाय मूळ आराखड्यानुसार सरळ मार्गानेच व्हावा, या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अधिवेशनात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि तांत्रिक बाजू तपासण्यासाठी केंद्रातील तज्ज्ञ सल्लागारांची एक विशेष उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे. ही समिती पुढील ३ ते ४ महिन्यांत आपला सविस्तर अभ्यास अहवाल सरकारला सादर करेल. पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख औद्योगिक शहरांना जोडणारा हा प्रकल्प…
संगमनेर, प्रतिनिधी – साखर कारखानदारी हा राज्याच्या आणि केंद्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा स्तंभ आहे. या माध्यमातून सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळतो. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार या क्षेत्राला दर दहा वर्षांनी नैसर्गिक किंवा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा कठीण काळात सरकारने कारखानदारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. सरकारने साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, एमएसपी (आधारभूत किंमत) ४ हजार रुपये करावी, बिगरव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि पेट्रोलला सक्षम पर्याय असलेल्या इथेनॉलला योग्य भाव द्यावा, अशा विविध प्रोत्साहनपर योजना तातडीने राबवाव्यात, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…
