Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : जगाचे सर्वोच्च टोक असलेले माउंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग व येथील रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष ऋषिकेश सतिष मोंढे यांना मानव विकास संस्थेचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लातूर येथील दयानंद सभागृहात ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मानव विकास संस्थेचे संस्थापक वसंत घोगरे यांनी दिली. याप्रसंगी जेष्ठ नेते सहकार महर्षी दिलीप देशमुख, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पद्मश्री तात्याराव लहाने उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज हिरालाल पगडाल साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील पालगड येथे झाला. आयुष्यभर अज्ञान, विषमता, पारतंत्र्य याच्याविरोधात संघर्ष करणाऱ्या गुरुजींनी ११ जून १९५० रोजी स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केले. साने गुरुजी क्रांतिकारक होते, लढवय्ये होते, व्यक्तिमत्वाला अनेक पदर होते पण त्यांचे व्यक्तिमत्त्व रणझुंजार असतांना, करुणा वात्सल्य नम्रता प्रेम या चौकटीत गुरुजींची प्रतिमा बंदिस्त करण्यात येथील व्यवस्थापती यशस्वी झाले. साने गुरुजी म्हंटले की सगळ्यात अगोदर समोर येते ती म्हणजे श्यामची आई. याच श्यामची आईमुळे साने गुरुजींची प्रतिमा मातृहृदयी अशी निर्माण झाली. आजही मराठी सारस्वतात श्यामची आई हेच सर्वाधिक लोकांनी वाचलेले पुस्तक आहे. आचार्य अत्रेंनी १९५२ साली श्यामची आई…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | ज्ञानेश्वर गायकर देशाचे नेते शरद पवार यांनी शनिवारी दोन महत्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन कार्यकारी अध्यक्ष मिळाले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल आणि संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांची नियुक्ती करण्यात आली. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देऊन अन्य खासदारांना काय जबाबदारी देता येईल, याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवली असली तरी, संघटनात्मक जबाबदारीमध्ये अजित पवार यांना कोणतेही स्थान मिळाले नाही. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी ह्या सर्व बाबींचे स्वागत केले आहे. पुढे अजितदादाच राज्याचे मुख्यमंत्री असणार हेही पवारसाहेबांनी अधोरेखित केले. याबद्दल मीडिया, अंध भक्त आणि घाणेरडा आयटी सेल…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो, मुंबई सारं काही माझ्यामुळेच घडतं. विश्वाचा निर्माता मीच, अशा अहंकारात वावरत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार बालासोरच्या भीषण रेल्वे अपघाताने लोप पावला तर चांगलंच. पण घमेंडी माणसाची देहबोली तसं होऊ देत नाही. शाबासकी घ्यायची असेल तर मी आणि संकट आलं की दुसर्याला पुढे करण्याची हिकमत मोदींनाच शोभते. इतरांच्या ती अंगलट आली असती. स्वातंत्र्यानंतर आजवरच्या भीषण अपघातातील एक अशा बालासोरच्या तिहेरी रेल्वे अपघाताने हाह:कार माजला नसता तर नवलच. या घाताने भारत सरकारचा, सरकार चालवणार्या भाजपचा आणि भाजपचं नेतृत्व करणार्या मोदी-शहांच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाटला. तरी निर्लज्जासारखी ही माणसं लोकांना फसवताहेत. भाजप सत्तेच्या…
नासिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यात सुरू असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत तरुणांना विनंती केली आहे की… बघा व्हिडिओ
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जोर्वे गावातील युवकांवर एका समाजाकडून हल्ले झाल्यानंतर शब्दाचीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याऱ्या आ. बाळासाहेब थोरात यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर दंगल घडविण्याचा केलेला आरोप हा अतिशय दुर्दैवी असल्याचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सतीश कानवडे, अमोल खताळ, गोकुळ दिघे, राहुल दिघे, राहुल भोईर, बापूसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जोर्वे आणि पंचक्रोशीतील गावांमधून संगमनेर शहरात येणाऱ्या शेतकरी, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना होत असलेल्या त्रास तसेच संगमनेर मध्ये सुरु असलेले लव्ह जिहाद प्रकरणे, लँड जिहाद, पोलिसांवरील हल्ले, नुकतेच जोर्वे गावातील शेतकरी यांच्यावर झालेला हल्ला या त्रासाची स्वाभाविक प्रतिक्रिया…
महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या काही वर्षात संगमनेर गांजा विक्रीचे प्रमुख केंद्र म्हणून समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी नगर-कल्याण हायवेवर ओतूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका बोलेरो कारमधून गांजाची वाहतूक करताना संगमनेरातील दोघांना पकडले आहे. यातून गांजाचे पुन्हा एकदा संगमनेर कनेक्शन समोर आले. सिद्धार्थ किशोर टेकाडे (वय ३१ वर्ष, रा. वाडेकर गल्ली, संगमनेर) आणि संतोष दत्तात्रय जऱ्हाड (वय ३७ वर्ष, रा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाजवळ, संगमनेर) अशी पोलिसांनी गांजासह पकडलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. नगरच्या दिशेकडून कल्याणकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती ओतूर पोलिसांना समजली होती. आळेफाटा पास झाल्यानंतर संशयित बोलेरो कल्याणच्या दिशेने मार्गस्थ…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने राजरोसपणे सुरूच आहेत. याच कत्तलखान्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे सहाशे किलो गोमांस वावी (नाशिक) पोलिसांनी नासिक-पुणे महामार्गावर गोंदे फाटा शिवारात पकडले. समृद्धी मार्गाने हे गोमांस जाण्यापूर्वीच पोलिसांनी पकडत दोघांना ताब्यात घेतले. संगमनेरमधून मुंबईच्या दिशेने एका आलिशान कारमधून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांना मिळाली होती. नाशिक-पुणे महामार्गावरून सिन्नर जवळील गोंदे फाटा येथील टोल नाक्यावरून समृद्धी महामार्गाने ही कार जाणार होती. मात्र तत्पूर्वीच समृद्धी महामार्गावर चढणाऱ्या रस्त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन जगताप, प्रवीण आढांगळे, भास्कर जाधव, एन. सी. मैंद, रत्नाकर तांबे, शैलेश शेलार आदींनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीमध्ये मोठी पक्षीय घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करत त्यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी पवार यांनी सोपविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवी दिल्लीमध्ये वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिन सोहळ्यात पवार यांनी ही घोषणा केली. कार्यकारी अध्यक्षपदी दोघांची निवड करताना या दोघांकडे त्यांनी वेगवेगळ्या राज्याची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रासह पंजाब आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे तर मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंड या राज्यांची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पक्षात भाकरी फिरविण्याचे संकेत देणाऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज सोलापूर – समाज माध्यमात अथवा एखाद्या ठिकाणी धार्मिक अथवा जातीय ते निर्माण होईल अशा पोस्ट वायरल केल्यास अथवा वक्तव्य केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड विधान कलम १५३ (अ), २९५ (अ) आणि कलम ५०५ व ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन संबंधितास किमान तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना विशेषतः तरुणांना अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या राज्यात सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा काही अपप्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर असून सायबर पोलिसांकडूनही संशयास्पद व्यक्तींच्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवरील खात्यांवर वॉच ठेवला जात आहे. सोशल…
