Author: अनंत पांगारकर
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)- अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील एमबीएचे प्राचार्य डॉ. बी. एम. लोंढे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण व इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल विभागाचे डॉ. जे. बी. गुरव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विविध विभागांना एनबीएचे मानांकन मिळाले असून इंजिनिअरिंग कॉलेजला नॅकचा ‘अ’ दर्जा मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील विविध विभाग हे उच्चतम गुणवत्तेमुळे अग्रमानांकित ठरले आहे. पुणे विद्यापीठातील ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट या व्यवस्थापन शाखेच्या अभ्यास मंडळावर एमबीएचे प्राचार्य डॉ. बी. एम. लोंढे यांची,…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – पुढील महिन्यात संगमनेरातील अर्थकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या संगमनेर मर्चंट बँकेचे निवडणूक होत आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाने प्रयत्न सुरू केले असून चार विरोधी उमेदवारांना सत्ताधाऱ्यांनी सामावून घेतल्यास बँकेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करण्यास तयार असल्याचे बँकेचे विद्यमान संचालक ज्ञानेश्वर कर्पे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना म्हटले आहे. संगमनेर मर्चंट बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसानंतर राखीव जागेवर राजेंद्र वाकचौरे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. उद्योगपती राजेश मालपाणी यांचे प्राबल्य असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत काही पारंपारिक विरोधक देखील आत्तापर्यंत सभासदांनी निवडून दिले आहे. संगमनेर मर्चंट…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या (MIDC) झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. निवडणुकीच्या सुरुवातीलाच शेतकरी विकास मंडळाच्या राखीव जागांवरील सहा उमेदवारांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या होत्या. त्यानंतर सर्वसाधारण गटात सात जागांसाठी तिघा अपक्षांसह दहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निकालानंतर १३ पैकी १२ जागांवर शेतकरी विकास मंडळाने निर्विवाद वर्चस्व मिळविले तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. एमआयडीसीचे विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाचे पॅनल निवडणुकीला सामोरे गेले. सुरुवातीलाच शेतकरी विकास मंडळाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात शांताराम गेनू…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी संगमनेरमधील वकील जनार्दन वाळुंज यांची निवड करण्यात आली आहे. वाळुंज यांनी यापूर्वीही विविध पदांवर काम केले असून 2008 पासून महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनच्या माध्यमातून ते काम करत आहेत. ठाणे येथील राज्यस्तरीय नोटरी कॉन्फरन्समध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनंतराव जगताप यांच्या उपस्थितीत ॲड. वाळुंज यांची निवड करण्यात आली. जगताप व असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास तरटे यांनी वाळुंज यांची निवड जाहीर केली. वाळुंज यांच्याकडे नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार 26 मार्चपासून सोपविला गेला आहे. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ॲड. वाळुंज यांचे महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास तरटे (डोंबिवली), निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. अनंतराव जगताप…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरमधील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 17 जागांसाठी 39 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांचा एकमेव अर्ज असल्याने सत्ताधारी गटाकडून त्यांनी पहिली विजय सलामी दिली असून त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता बाकी आहे. गुरुवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी नंतर 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्यापासून (19 मे) 2 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, दोन पॅनलमध्ये सरळ लढत होते की सत्ताधारी गटाविरोधात काही अपक्ष निवडणूक मैदानात उतरतात…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सर्व सामान्य प्रवाशांची लालपरी असलेल्या आणि राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे (MSRTC) पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी (ता. 17 मे 2023) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. ते 99 वर्षाचे होते. गुरुवारी अहमदनगरच्या अमरधाम मध्ये सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यंदाच्या 1 जून 2023 रोजी पहिल्या एसटीच्या कारकिर्दीच्या प्रवासाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा चालता-बोलता साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्यातील पहिली एसटी बस सेवा 1948 मध्ये अहमदनगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली. सरकारची प्रवासी बससेवा नसल्याने बसस्थानक नव्हते. खासगी बस…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे उपस्थित होते. संस्थानमधील प्रत्येक कर्मचारी हा सेवाभावी वृत्तीने काम करीत असून त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने विचार करण्यात येईल. हे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून या सर्व घटकांच्या पाठीशी…
सह्याद्रीच्या डोंगररांगात मे महिन्यात आंबा, जांभळाच्या सिझन बरोबरच “करवंद” या फळाचा सिझन चालू होतो. करवंदाचे झाड झुडुपासारखे पसरलेले असते. त्याला काटे असतात. डोंगरावर ते नैसर्गिकपणे आलेले असतात. डोंगरावर यांच्या जाळी पसरलेल्या असतात. दाट व घट्ट जाळीत शिरता येत नाही. उन्हाळ्यात डोंगर रांगेतील घाटात त्या भागातील नागरिक झाडांचे पानाची टोपली करून त्यात “करवंदे” ठेवून विकायला बसतात. हे बघून आपण थांबतोच व करवंदे घेतो. माझे वडील तीर्थरूप भाऊसाहेब थोरात व भाऊ बाळासाहेब थोरात आम्हाला मे महिन्याच्या सुट्टीला आलेल्या सर्व मुलांना घेऊन माळशेज घाटात व इतर डोंगरावर करवंद खायला नेत. व करवदांच्या जाळ्यांमध्ये जाऊन आम्ही मोठे मोठे पिकलेले करवंदे खायचो. त्याचा आनंद आम्ही…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सहकारी महिलेचे आक्षेपार्ह फोटो कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकणाऱ्या त्या कृषी पर्यवेक्षकाचे विभागीय कृषी सहसंचालकांनी तात्काळ निलंबन केले आहे. पर्यवेक्षकाच्या निलंबनाच्या आदेश संगमनेर कृषी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. संगमनेरच्या कृषी विभागाला पुरते बदनाम केलेल्या आणि त्याला अनेकदा पाठीशी घातलेल्या या रंगेल कर्मचाऱ्याच्या गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चानंतर कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले होते. व्हाट्सअप ग्रुपवर फोटो टाकले गेल्यानंतर जागा झालेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक र. शा. नाईकवाडी यांनी संगमनेर कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक असलेल्या…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) अन्वये 30 मे 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुक, मतदान, मतमोजणी व जयंती साजरी होणार आहेत. तसेच सभा, महासभा, आंदोलने इत्यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी 17 मे 30 मे 2023 रोजीच्या रात्रीचे 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागु राहतील, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या…
