Author: अनंत पांगारकर
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले एक विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आहे. खासदार राऊत यांच्या विधानावरून त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खासदार राऊत हे ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या विवाह समारंभासाठी नासिक मध्ये आले होते. याच विवाह समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने याच दिवशी अंतिम निकाल जाहीर केला होता. दुपारी साडेबारा वाजता च्या दरम्यान हा निकाल आला आणि त्यानंतर सायंकाळी चार…
कर्नाटक सरकार मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेणार पाच महत्त्वाचे निर्णय; राहुल गांधींनी दिले संकेत
नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) मतदारांनी बहुमताने कर्नाटक काँग्रेसच्या हाती सोपविल्यानंतर काँग्रेसने सरकार येताच आपल्या आश्वासनपूर्तीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. ज्या पाच वचनांच्या बळावर काँग्रेसला सत्ता सोपविले गेली त्या पाच वचनांची पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्तता करण्यासाठी मंजुरी दिली जाणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने एकहाती मोठा विजय मिळवत भाजपला सत्तेत येण्यापासून रोखले आहे. काँग्रेस सत्तेत येण्यासाठी त्यांनी दिलेल्या पाच घोषणा कर्नाटकमध्ये महत्त्वपूर्ण ठरल्या आहे. यामध्ये सखी योजनेअंतर्गत कर्नाटकमधील सर्व महिलांना मोफत बस प्रवास, गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत घरातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये, युवा निधी अंतर्गत कर्नाटकातील बेरोजगार पदवीधारकांना दरमहा तीन हजार रुपये, बेरोजगार…
रविवार विशेष लेख महाराष्ट्रातल्या 2021मधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निवाड्यानंतरही शिंदे गट आणि भाजपने साजरा केलेला आनंदोत्सव म्हणजे ‘आयजीची खाट आणि बायजीचा थाट’ असा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सारी पिसं उपटूनही आपणच जिंकल्याचं आणलेलं उसनं अवसान म्हणजे लाज कोळून पिण्याचा प्रकार होय. प्रचंड लत्ताप्रहार होऊनही शिंदे गट आणि भाजपने साजरा केलेला आनंदोत्सव पाहाता आजचे सत्ताधारी लाज कोळून पिणारे सत्तापिसाटच म्हटले पाहिजेत. महाराष्ट्रात अस्तित्वात आलेली सत्ता ही बेकायदा आणि घटनेची सारी तत्व गुंडाळून आलेलं सरकार होय, असं स्पष्ट मत व्यक्त होऊनही कोणी आनंदोत्सव साजरा करत असेल तर त्यांच्या बुध्दीची तपासणीच करायला हवी. काहींना आनंद साजरा करण्यात असुरी असते. तीच असुरी…
शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोपरगाव तालुक्यात डिसेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तालुका प्रशासनाच्यावतीने नऊ ठिकाणी ‘गुलाबी मतदान केंद्र’ उभारण्यात आले होते. या उल्लेखनीय उपक्रमांची राज्य निवडणूक आयोगाच्या ‘निवडणूक वार्ता’ गृहपत्रिकेत दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने दर सहा महिन्यांनी ‘निवडणूक वार्ता’ ही गृहपत्रिका (न्यूज लेटर) प्रकाशित करण्यात येते. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या निवडणूक वार्ताच्या सहामाही अंकात पृष्ठ क्रमांक ९ वर कोपरगाव तालुका प्रशासनाने राबविलेल्या ‘गुलाबी मतदान केंद्र (पिंक बूथ)’ या उल्लेखनीय उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे. कोपरगावचे तहसीलदार विजय बोरूडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. डिसेंबर २०२२ मध्ये तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूका पार पडल्या. यात शिंगणापूर…
कोपरगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोपरगाव तालुक्यातील जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेर कडे जाताना या दांपत्याचा अपघात झाला. अशोक विठ्ठल गुंड (वय 58 वर्ष) व शोभा अशोक गुंड (वय 53 वर्ष रा. जळगाव, ता. राहाता, जि. अहमदनगर) हे दांपत्य शनिवारी (ता. 13 मे) सकाळी संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे नातेवाईकांकडे दुचाकीवरून जात असताना साडे आठ वाजण्याच्या दरम्यान जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातामध्ये अशोक गुंड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी शोभा गुंड या…
(महाराष्ट्र संवाद न्यूज) राहत्या घराचे कुलूप तोडत घरामध्ये घुसलेल्या अज्ञात चोरट्याने तीन तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड रक्कम लांबविण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील निमोण येथे घडला. विशेष म्हणजे चोरट्याने चांदीचे देवही चोरून नेले आहे. शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी विकास हरिभाऊ मंडलिक (वय 38 वर्ष रा. निमोन, ता. संगमनेर) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडत आतमध्ये प्रवेश मिळविला. चोरट्याने घरातील 29 हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेले. चोरून नेलेल्या दागिन्यांमध्ये कानातील वेल, कानातले, पोत, चांदीचे 12 कॉइन व चांदीचे 2 देव, 1 शिक्का, दोन-तीन हजार रुपये चिल्लर व…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) नवीन वाळु धोरणाच्या अनुषंगाने वाळू डेपोपासून ग्राहकांच्या स्वखर्चाने त्यांच्या इच्छुक ठिकाणी वाळू पोहोच करण्यासाठी सहा चाकीपर्यंत सर्व गौणखनिज वाहतूक धारकांनी नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाळु उत्खनन, वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. नवीन वाळु धोरणानुसार वाळु डेपोपासुन ग्राहकांना स्वखर्चाने त्यांच्या इच्छुक ठिकाणी वाळु पोहोच करण्यात येणार आहे. ग्राहकांना वाळु पोहोच करण्यासाठी सहा चाकीपर्यंत सर्व गौण खनिज वाहतुकदार यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोंदणी करावी. वाहतुकीचे दर प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर यांनी निश्चित केल्यानुसार राहतील याची नोंद घ्यावी. तसेच याबाबतची सविस्तर माहिती www.nic ahmednagar.com या संकेतस्थळावर उपलब्ध…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने होत असलेला काँग्रेसचा विजय हा तेथील जनतेचा विजय आहे. भाजपचे दहशत आणि जातीभेदाचे राजकारण देशातील नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निकालने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देश व राज्यात काँग्रेस सरकारची गरज असून भाजपची घसरण सुरू झाल्याचे या निवडणूक निकालाने समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. थोरात यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने होत असलेला काँग्रेसचा विजय हा तेथील जनतेचा विजय आहे. भाजपचे दहशत आणि जातीभेदाचे राजकारण देशातील नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निकालने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देश व राज्यात काँग्रेस सरकारची गरज असून भाजपची घसरण सुरू झाल्याचे या निवडणूक निकालाने समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. थोरात यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते या…
(महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘द केरला स्टोरी’ या बहुचर्चित चित्रपटाचे धर्म जागृती मोहिमेअंतर्गत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने संगमनेरमध्ये ३ शोचे मोफत आयोजन केले होते. संगमनेरकरांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. “द केरला स्टोरी” हा चित्रपट धर्मांतर व लव्ह जिहाद या विषयावर आधारित असून कट्टरपंथी जिहादी व आतंकवादी संघटना, देश विघातक संस्थाच्या षडयंत्राद्वारे महाविद्यालयीन विदयार्थीनी व अल्पवयीन मुली आपल्या जाळ्यात ओढून सिरिया- अफगाणिस्तान सारख्या देशांत पाशवी बलात्कार व अत्याचार करण्यासाठी पाठविल्या जातात. अश्या धर्मांध वृत्तीपासूनच्या अमानवीय कृत्यापासून हिंदू मुली व महिला भगिनींना वाचवण्यासाठी त्यांचे प्रबोधन म्हणून हा मोफत चित्रपट दाखवण्याचा संकल्प करण्यात आला होता. हिंदू धर्मजागृती मोहीम अंतर्गत विहिंप, बजरंग दल,…
