Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज, शिर्डी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत विश्वासघाताचे राजकारण केले आहे, अशा विश्वासघाती राजकारणाला भारतीय जनता पक्षात अजिबात थारा नसल्याने भाजप व ठाकरे पुन्हा एकत्र येण्याबाबत शंका असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आलेले बावनकुळे शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, जाहीर सभेत एखाद्या विषयावर टीका करण्यास हरकत नाही मात्र आम्ही कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही. जाणीवपूर्वक टीका टिप्पणी योग्य नाही. शरद पवार, अजित पवार सरकारवर टीका करतात तो त्यांचा अधिकार आहे. भाजप आणि शिवसेनेचे काम बघून २०२४ मध्ये अनेकजण आमच्याकडे उड्या मारतील. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी सभागृहात अर्थसंकल्प वाचत होते, त्यावेळी विरोधकांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येमध्ये भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे, प्रभु रामाच्या आशीर्वादाने आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळालं असल्याचं सांगत यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय वेगळे नसल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला आहे. नांव न घेता राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंनी टीका केली. ते म्हणाले, देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही आहेत. आपलं सरकार नसतं तर साधूंच्या जीवाला धोका असता. अयोध्या दौऱ्याला नावं…
महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अदानी उद्योग समूहाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य करत असताना अदानी उद्योग समूहाच्या कथित गैर कारभाराबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात असताना आता पवार यांच्या समर्थनार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदाणी यांचा एकत्र फोटो ट्विट करत पवारांवर टीका केली होती. त्यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत जोरदार टीका केली आहे. लांबा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो ट्विट केला आहे. “भित्रे, स्वार्थी लोक स्वत:च्या…
रविवार विशेष लेख उध्दव ठाकरे बोलले काय आणि राज्याचे गृहमंत्री त्यावर उत्तरले काय? भलताच कॉन्फिडन्स गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा आलेला दिसतो आहे. मंत्री म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव कोण्या नेत्याने एका फालतू शब्दाने करून दिली म्हणून थेट काडतूसं घालण्याची भाषा गृहमंत्र्याने वापरावी? महाराष्ट्र इतका खाली आलाय? पोलीस आपल्या हातात असल्याचा असा फायदा कोणाला घेता आला नाही. फडणवीसांनी तो गेल्या काही वर्षांमध्ये घेतला. ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे सार्या देशाने पाहिलं. इतकं करून ते थांबत नाहीत आपल्या कृत्याची उघड भलामणही ते करतात आणि त्या निमित्ताने एखाद्याला खंडणीखोर आणि दुसर्याला देशद्रोहीही संबोधतात. सत्ता बेफाम सत्तेतला गृहमंत्री असा बेदरकार झालेला कोणी कधी…
महाराष्ट्र संवाद न्यूज | शिर्डी अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेली शिर्डी विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधाची चाचणी शनिवारी (८ एप्रिल) रात्री यशस्वी झाली. २११ प्रवासी घेऊन दिल्लीहून निघालेले इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या प्रवासी विमानाने रात्री ८ वाजून १० मिनिटांनी शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग केले. त्यानंतर रात्री नऊ वाजता २३१ प्रवाशांना घेऊन या विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रयाण केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नाईट लॅडिंग सुविधेची आज खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली असल्याचे मानले जात आहे. येत्या पंधरा-वीस दिवसांत या विमानतळावर नाईट लँडिंगची नियमित सेवा सुरू होणार आहे. २३२ प्रवासी क्षमता असलेल्या या विमानात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला. शिर्डी…
सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे, ‘आधार’ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गोसावी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रसिद्धी प्रमुख राजाभाऊ भिलारे, मनेश भालेकर, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तहसीलदार अमोल निकम तसेच राजेन्द्र वाकचौरे व मित्रपरिवारामुळे अजय प्रेमानंद कोल्हे, रा. संगमनेर, जि. अहमदनगर या आजोबांच्या राहण्याचा व उपचारांचा प्रश्न लागला मार्गी लागला महाराष्ट्र संवाद न्यूज अजय प्रेमानंद कोल्हे वय 52 हे ‘अर्धांगवायू’ या जीवघेण्या आजाराने पीडित आजोबा… अनेक वेदना अन यातनांनी निकामी झालेले बरेच अवयव… अशातच मायेच्या माणसांनीच दुरावा धरल्याने आलेले असहाय एकाकीपण, यामुळे जगण्याची आशा अन मार्ग अंधुक झालेल्या या आजोबांना युवकांच्या प्रयत्नांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र युथ सॉफ्टबॉल स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या संगमनेर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी अजिंक्यपद मिळवत सुवर्णपदकावर मोहर उमटविली. संघात आजी-माजी खेळाडूंचा सहभाग होता. अंतिम सामन्यात बलाढ्य ठरलेल्या जळगाव मनपा संघासोबत झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये ८-४ च्या धाव संख्येने मोठा विजय मिळविला. अजिंक्यपद मिळविणाऱ्या या मुलांच्या संघात पवन गुंजाळ, आकाश कातोरे, अभिषेक सोनवणे, वैभव मुठे, स्वप्निल पथवे, सौरभ कानवडे, साईराज परचंडे, निखिल शिंदे, वैभव नेहे, गणेश साबळे, हनुमंता शिंदे, युवराज गुरव यांचा समावेश होता. पवन गुंजाळ याने पिचरची महत्त्वाची भूमिका पार पाडत प्रतिस्पर्धी संघाचे १५ गडी बाद केले तर बॅटिंग करताना आकाश कातोरे, अभिषेक सोनवणे, साईराज परचंडे यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सह्याद्री पतसंस्थेला ३१ मार्च अखेरीस १ कोटी १९ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश गुंजाळ यांनी दिली. ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेकडे ३० कोटी ३४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने २७ कोटी २४ लाख रुपयांचे सभासदांना कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा राखीव निधी ६ कोटी ४९ लाख तर संस्थेचा स्वनिधी १ कोटी ३५ लाख रुपये आहे. संस्थेचे भाग भांडवल ७ कोटी ४१ लाख आहे. संस्थेची २० कोटी ११ लाख रुपये गुंतवणूक असून ३१ मार्च अखेर १ कोटी १९ लाख रुपये…
महाराष्ट्र संवाद न्यूज वर्ल्ड क्रिएटिव्हिटी फोरमच्यावतीने भारतीय हिंदी कवयित्री, कादंबरीकार मनीषा खटाटे यांच्या ‘मरुस्थल’ या काव्यसंग्रहावर नेपाळमधील नेपाळगंज शहरात समीक्षात्मक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. तत्वज्ञानात्मक परिभाषेत हिंदी साहित्यात एका स्त्रीने लिहिलेले हे पहिले आणि रांगेय राघवच्या ‘मेधावी’नंतरचे हे दुसरे खंडकाव्य आहे. एप्रिलच्या प्रारंभी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मरुस्थळच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन देखील भाषा आयोगाचे सदस्य, कवी, लेखक डॉ. अमर गिरी, नेपाळ भाषा आयोगाचे सदस्य, कवी, लघुकथा लेखक गोपाळ अश्क यांनी केले. यावेळी नेपाळचे ज्येष्ठ साहित्यिक सनत रेग्मी, डॉ. राजेंद्र खटाटे उपस्थित होते. मराठी भाषिक हिंदी स्री साहित्यिकास नेपाळमध्ये असा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कार्यक्रमामुळे भारतीय साहित्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुलाने गायांचा चारा कापण्याचे मशीन विकण्यास विरोध केला, शेत जमीन दुसऱ्याच्या नावे केल्याने विकता येत नाही, या कारणावरून वडिलांनी मुलाचा खून केल्याच्या आरोपातून संगमनेर न्यायालयाने वडिलांची निर्दोष मुक्तता केली आहे. दत्तात्रय रामचंद्र हुलवळे (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) असे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात दत्तात्रय रामचंद्र हुलवळे यांच्या विरोधात त्यांचा मुलगा प्रवीण दत्तात्रय हुलवळे याने दिलेल्या तक्रारीवरून भाऊ अंकुश याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० जून २०१९ रोजी वडगाव पान येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले होते. फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी,…
