Author: अनंत पांगारकर

अकोले (अहिल्यानगर) दि. २३ मार्च –  महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, महायुती पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम २१०० रुपये करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सरकार स्थापन होऊन १०० दिवस उलटले तरी महिलांना या वाढीव रकमेची प्रतीक्षा आहे. या योजनेबाबत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असून, यावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ती सुरूच राहणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. २१०० रुपये देण्याबाबत सरकार…

Read More

अकोले, दि. २३ मार्च – प्रतिनिधी  महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या अंतर्गत राज्यात ५० ‘उमेद मॉल’ उभारण्याची योजना आहे. अकोले येथे योग्य जागा उपलब्ध झाल्यास येथेही ‘उमेद मॉल’ उभारण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. ‘कळसुबाई’ महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला आमदार किरण लहामटे, पद्मश्री राहीबाई पोपेरे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, तहसीलदार सिद्धार्थ…

Read More

त्र्यंबकेश्वर दि. २३ मार्च – त्र्यंबकेश्वरच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन या आराखड्याचा आढावा घेतला. या आराखड्यात प्रामुख्याने दर्शनासाठीचा कॉरिडॉर, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, कुंडांचे संवर्धन आणि ब्रह्मगिरी पर्वतरांगांच्या नैसर्गिक सौंदर्याचा विकास यांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “त्र्यंबकेश्वरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण अध्यात्मिक व्यवस्थेत या तीर्थक्षेत्राला खूप मोठे स्थान आहे. त्यामुळे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसोबतच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, यासाठी ११०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची कामे दोन टप्प्यांत पूर्ण होतील. पहिला टप्पा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होईल. यामध्ये, दर्शनासाठीचा…

Read More

मुंबई, दि. २३ मार्च विशेष प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी पक्षात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानुसार विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल. तसेच, कार्यकर्त्यांना कामाची आखणी २ एप्रिलपर्यंत मिळेल आणि शहर…

Read More

संगमनेर, दि. २३ मार्च – प्रतिनिधी  आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी संगमनेर पोलिसांनी आज रविवारी शहरातून रूट मार्च काढला, अशी माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत काढलेल्या या रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मेन रोड, गवंडीपुरा, सय्यद बाबा चौक, तेली खुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक, माळीवाडा या प्रमुख मार्गांचा समावेश होता. या रूट मार्चमध्ये नवी मुंबई येथील रॅपीड ॲक्शन फोर्सच्या १०२ बटालियनच्या असिस्टंट कमांडर प्रियंकासिंग परिहार, पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते, पोलीस हवालदार दुधाणे यांच्यासह ३२ जवान,…

Read More

संगमनेर, दि. २३ मार्च – प्रतिनिधी कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क अखेर रद्द करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२५ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने बळीराजा चिंतेत होता. केंद्र सरकारने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने परिपत्रक काढून कांद्यावर असलेले २० टक्के निर्यात शुल्क रद्द करून शून्य करण्यात आल्याचे जाहीर केले असून हा निर्णय १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सुमारे…

Read More

गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये घडलेल्या घटनेची दखल आता सर्वदूर घेतली जाऊ लागली आहे. राज्य आणि केंद्र सरकार या दंगलीकडे एकांगाने पाहणार हे अगदी स्पष्टपणे दिसू लागल्याने यामागच्या डोक्याची चिरफाड करणं अत्यंत गरजेचं आणि तितकंच आवश्यक बनलं आहे. सरकार पुरस्कृत दंगल कशी असते हे नागपूरच्या घटनेने दाखवून दिलं. सरकारी पक्षाची लोकं भाजपचे नेते आणि यंत्रणा या दंगलीनंतर ज्याप्रकारे आग ओकण्याचं काम करत आहेत, ते पाहिलं तर ही दंगल सरकार पुरस्कृतच आहे, असं चित्र आहे. सरकारला विकली गेलेली माध्यमं आणि शासकीय यंत्रणांकडून यातलं खरं काय ते कळू देलं जात नाही. तरी समाजमाध्यमांनी केलेला पोलखोल सारं काही सांगून जात आहे. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत समाज…

Read More

नाशिक, दि. २२ मार्च जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या कर्जवाटपात अनियमितता झाल्यामुळे २५ माजी संचालक आणि त्यांच्या वारसांवर निश्चित केलेल्या आर्थिक जबाबदारीच्या प्रकरणात सहकार विभागाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. यात राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह सत्ताधारी पक्षांचे चार विद्यमान आमदार आणि काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा समावेश आहे. एक काळ असा होता, जेव्हा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा देशात नावलौकिक होता. परंतु, संचालकांच्या मनमानी कारभारामुळे ही बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. आज शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे आणि ठेवीदारांना पैसे परत करणेही बँकेला जड जात आहे. बँकेचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी बँकेच्या…

Read More

शिर्डी, दि. २२ मार्च –  संत साहित्य आणि विचारांमधून समाजात एकतेचा संदेश दिला जातो. संतांची भूमिका नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी असते. संत साहित्य जोपर्यंत जिवंत राहील, तोपर्यंत समाजातील विषमता नष्ट होईल आणि एकता निर्माण होईल. संत विचारांमध्ये समाजाला एकत्र ठेवण्याची ताकद आहे, असे राज्याचे जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला शिर्डी येथे सुरुवात झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,…

Read More

मुंबई, दि. २२ मार्च –  राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने शुक्रवारी ‘प्रत्यय’ ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू करत महसूल विभागाने महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ‘प्रत्यय’(PAPERLESS RIVISION & APPEALS IN A TRANSPERANT WAY) प्रणालीचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव संतोष कुमार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे,…

Read More