Author: अनंत पांगारकर

गुरुवार, ४ जुलै  राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (६ जुलै) सकाळी साडेदहा वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी दिली. बैठकीमध्ये ८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन अहवालास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) मार्चअखेर खर्चास मान्यता, सन २०२४-२५ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) व जुनअखेरच्या खर्चाचा आढावाही या बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

Read More

गुरुवार, ४ जुलै भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री ९ वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डॉ.विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसात त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ९६ वर्षीय अडवाणी यांना वयाशी संबंधित आरोग्य समस्या आहेत. काही दिवसांपूर्वी अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांना यावर्षीचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रपती…

Read More

योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत बुधवार, ०३ जुलै  ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर योजनेसंदर्भातील…

Read More

सध्याच्या जागेवर होणार शहीद स्मारक बुधवार, ३ जुलै  गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित ठरलेला आणि संगमनेरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बस स्थानकासमोर उभारणीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम मंजुरी दिली आहे, अशी माहिती विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. राज्यात हायटेक ठरलेल्या बस स्थानकासमोर निर्माण होणाऱ्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे संगमनेरच्या वैभवात आणखी भर पडणार आहे, असे देखील तांबे म्हणाले. तांबे म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा संगमनेरमधील बस स्थानकासमोर व्हावा ही तमाम संगमनेरकरांची मागणी होती. यानुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी सातत्याने…

Read More

बुधवार, ३ जुलै  अनेकदा संगमनेरमधील भेसळयुक्त तेल कंपन्यांविरुद्ध तक्रारी करून निवेदने देऊन देखील शासन स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस या तेल कंपन्या सील करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक सुनील घुले यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर उपोषण सुरू केल्यानंतर भेसळखोरीचा आरोप असलेल्या व्यापाऱ्यांच्या मदतीला त्यांची संघटना तत्परतेने धावली आहे. आरोप असलेल्या व्यापाऱ्यांच्या खुलाश्या अगोदरच संघटना व्यापाऱ्यांना ‘क्लीन’ सर्टिफिकेट देऊन मोकळी झाली. याशिवाय असोसिएशनने माध्यमांवर देखील या तेल व्यापाऱ्यांचा अपप्रचार केल्याचा ठपका ठेवला आहे. श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा या तीन तेल विक्रेत्या कंपन्यांच्या खाद्य तेलाची पुण्यातील एका नामांकित लॅब मध्ये तपासणी केल्यानंतर खाद्यतेलात भेसळ असल्याचे…

Read More

मंगळवार, २ जुलै अंबादास दानवे यांच्या निलंबनावरून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. उपसभापतींनी घेतलेला निर्णय लोकशाही विरोधी आणि मनमानी असून विरोधी पक्ष नेत्यांना एका कटाचा भाग म्हणून निलंबित करण्यात आल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सोमवारी गदारोळ झाला. अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवे यांनी माफी मागावी, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी लाड यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी देखील दानवे यांच्या निलंबनाची मागणी सभागृहात केली होती. त्यानंतर उपसभापती नीलम…

Read More

मंगळवार, २ जुलै | अनंत पांगारकर संगमनेरमधील तीन खाद्यतेल कंपन्यातील खाद्यतेल भेसळीचे प्रकरण समोर आले असून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक सुनील घुले यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज संगमनेरमध्ये किराणा दुकानांवर छापेमारी करत खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतल्याची माहिती समजत आहे. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर मधील बस स्थानक परिसरातील किराणा दुकान तसेच घुलेवाडी परिसरातील एका किराणा शॉपी मधून या तेल विक्रेत्यांकडून विक्रीसाठी बाजारात आलेल्या तेलाच्या नमुन्याची तपासणी सुरू केली असून उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा यांच्याकडून निर्मिती केल्या जात असलेल्या…

Read More

मंगळवार, २ जुलै  पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये दानवे यांनी लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत शिवीगाळ केली, असा आरोप भारतीय जनता पार्टीने करत दानवे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार आमने-सामने आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा आमदार आक्रमक झाले होते. भाजपकडून दानवे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली गेली. त्यानंतर…

Read More

मंगळवार, २ जुलै राज्यातील महिलांना दिलासा देताना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारने “मुख्यमंत्री –  बहिण माझी लाडकी”योजना जाहीर केली. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना सतराशे साठ अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी तर ही योजना नाही ना? असा प्रश्न संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे. राज्यभरातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी भरमसाठ कागदपत्रांच्या जाचक अटी तात्काळ रद्द करुन ही योजना अधिक सोपी व सर्वसमावेशक करावी, तसेच लग्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी कतारी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. राज्य सरकारच्या योजनेनुसार १८…

Read More

शनिवार २९ जून नगर जिल्ह्यातील पोलीस, पोलिसांची पथके यांच्या सततच्या हप्तेखोरीमुळे संगमनेर शहरातले आणि तालुक्यातले मटका अड्डे बंद करण्यात आले असल्याची राळ उठवत छुप्या पद्धतीने आणि मोबाईल ॲपद्वारे साधारण महिनाभर मटका सुरू ठेवल्यानंतर शनिवारपासून नव्या जोमाने धुमधडाक्यात संगमनेर शहर आणि तालुक्यात मटक्याच्या पेढ्या आणि अड्डे सुरू झाले आहेत. पोलीस आणि संगमनेरातल्या मटका किंगमध्ये पुन्हा जुळवाजुळव झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. साधारण महिना भरापूर्वी जिल्ह्यात कुप्रसिद्ध आणि एक नंबरचा अवैध धंदा असणाऱ्या काही मटका चालकांकडून पोलीस आणि पोलीस पथकांच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि सतत हप्ते वाढवून मागण्याच्या जाचामुळे आम्ही मटका धंदा बंद करत आहोत अशी हवा करण्यात आली होती. मटका बंद…

Read More