Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो सत्ताधारी विचारांच्या लोकांची मानसिकता सत्तेची दहा वर्षं पूर्ण होत असतानाही बदलायचं नाव घेत नाहीए. ऐरागैरा कोणीही कशावरही बोलत असतो. कधी कंगनासारखी अभिनेत्री स्वातंत्र्य 2014 ला मिळाल्याचं वक्तव्यं करते तर कधी कोणी देशाला गांडू लोकांचा देश संबोधतो. कोणी जवाहरलाल नेहरूंच्या नावाने शिविगाळ करतो तर कोणी महात्माजींच्या नावाला दोष लावतो. या दोन व्यक्तींना नाव ठेवलं की त्या व्यक्तीचं सत्ताधारी मंडळी पुनर्वसन करत असतात अशी एक प्रतिमा केंद्रातल्या मोदी सरकारची आणि राज्यातल्या महायुती सरकारची झालेली आहे. या सरकारांचे पाठीराखे असलेले मनोहर कुलकर्णी नामक भिडे गुरुजींनी तोडलेले तारे लक्षात घेता त्यांना आता कशाचीच भीती उरलेली नाही…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – “लोकाभिमुख कामांचा करूनी निपटारा, चला करूया महसूल सप्ताह साजरा” या ब्रीदवाक्याने महसूल सप्ताहाचा शुभारंभ केला जाणार असून महसूल खात्याशी संबंधित सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि अर्जासंदर्भात काल मर्यादेत निपटारा व्हावा, जनतेला दर्जेदार व चांगली सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 1ऑगस्टच्या महसूल दिनापासून राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक: दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महसूल सप्ताहाच्या नियोजनासाठी मंत्री विखे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त, प्रांताधिकारी उपस्थित होते. बैठकीत त्यांनी नियोजनाचा आढावा घेतला. विखे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर आता कारवाई करून त्यांची सेवा खंडीत करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागाने घेतली दखल: स्थानिक प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले, महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया केव्हाच संपली आहे. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याची गंभीर दखल आता महसूल विभागाने घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील ७० टक्के जागा यापूर्वी रिक्त होत्या, त्या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना दिल्या निलंबनाच्या नोटीस: परंतू काही ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमधील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांना गुरुवारी (ता.27 जुलै) नवी दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कडलग संगमनेर तालुक्यातील धांदरफळच्या देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त झालेल्या ‘भारताला जी २० चे अध्यक्षपद कसे मिळाले आणि त्याचे सुवर्ण नियम काय असतील’ या विषयावरील राष्ट्रीय कॉन्क्लेव्हमध्ये सामजिक न्याय मंत्री खा. रामदास आठवले, दिल्लीच्या महापौर शैलजा ओबेरॉय, खा. मोहम्मद इम्रान हुसेन, खा. रामनिवास गोयल, मोहम्मद झाकीर, डॉ. शमीम खान यांच्या उपस्थितीत त्यांना अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अमरनाथवरुन परतणारी भाविकांची बस आणि नागपूरवरुन नाशिकला जाणाऱ्या खासगी बसची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही बसचा चुराडा झाला. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर मलकापूर हायवे क्रमांक सहावर लक्ष्मी नगर जवळील उड्डाण पुलावर घडली. या दोन्ही खासगी प्रवासी बस असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. भीषण अपघातात सहा प्रवासी ठार : हिंगोलीच्या दिशेने जाणारी एम एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स बस अमरनाथ येथून तीर्थयात्रा करून परत येत होती. या ट्रॅव्हल्स बसमध्ये 35 ते 40 भाविक होते. तर नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या गाडी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो?…
कृषी सेवकांचे मानधन देखील सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्या पुरते आमच्या सरकार काम करत नसून आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये इर्शाळवाडी येथील घटने संदर्भात माहिती देताना सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिंदे म्हणाले, इर्शाळवाडी दरडग्रस्तांची कंटेनरमध्ये व्यवस्था केली आहे. भूखंड बघितला असून त्यांची कायम सोय करण्यात येणार आहे सिडकोद्वारे त्यांना आम्ही घर बांधून देणार आहोत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्ताने शुक्रवारी (ता. 28 जुलै) तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले. “झाडे लावा, झाडे जगवा” वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरणाचा समतोल याबाबत जनजागृती करून गावात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्षांचे वाटप करण्यात आले. वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रमावेळी आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाचे पदाधिकारी सहदेव कोळगे, माधवराव ठुबे, ज्येष्ठ नागरिक राजाराम बोंबले, संदीप वाकचौरे, ज्ञानेश्वर रेवगडे, अंकुश वाकचौरे, गोरख कदम, शौकत शेख, शैलेश रेवगडे, दत्ता रेवगडे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगावचे मुख्याध्यापक विजय आंबरे, बंडू वाकचौरे, अस्मिता ठुबे, मीनल बिडवे, शेख मॅडम…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी उपस्थित राहणे हा एक संकेत आहे मात्र सध्याच्या सरकारकडून हा संकेत पाळला जात नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरातांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याला अद्याप विरोधी पक्ष नेता मिळालेला नाही. त्यातच विरोधी पक्षनेते विना विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात विरोधी पक्षाचा आवाज बुलंद करण्याचे काम राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात करत असल्याचे दिसते. थोरात दररोज सभागृहात सत्ताधारी पक्षाची कोंडी करताना दिसत आहे. मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधिमंडळात बोलताना थोरात म्हणाले, प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे हा या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये जनसेवा कॅम्पच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या विविध प्रकारचे कार्ड लाभार्थ्यांना काढून देण्यात आले. याशिवाय शिवसेना आणि पक्षप्रमुख ठाकरे यांची भूमिका मुलाखतीच्या माध्यमातून विषद करणाऱ्या ‘दैनिक सामना’च्या अंकाचेही यावेळी वाटप करण्यात आले. संगमनेर शिवसेनेच्यावतीने वाढदिवसाचे औचित्य साधून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या या जनसेवा कॅम्पमध्ये लाभार्थ्यांना आभा कार्ड, आधार कार्ड, नवीन पॅन कार्ड, पॅन कार्ड अपडेट करणे, लहान मुलांचे आधार कार्ड हाताचे ठसे, ई श्रम कार्ड असे विविध कार्ड व शासनाच्या योजनांचा लाभ मोफत मिळवून देण्यात आला. लाभाच्या योजनांचे…
