Author: अनंत पांगारकर
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अज्ञात व्यक्तीने संगमनेरच्या बालगृहातून नऊ वर्षीय वयाच्या बालकाला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. संगमनेर शहरामध्ये बीएड कॉलेज जवळ बालगृह असून या बालगृहात असलेल्या नववर्षीय मुलाला काहीतरी फुस लावून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराच्या रखवालीतून पळवून नेण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान घडला. या संदर्भात बालगृहाचे कर्मचारी बाळकृष्ण दिगंबर आंबरे यांनी रविवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची राज्यपाल रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे. सोनवणे यांच्याकडे पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्र कुलगुरूपदाचा पदभार होता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू असलेले डॉ. सोनवणे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नववे कुलगुरू आहेत. कुलगुरूपदासाठी राज्यभरातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. सोनवणे यांची कुलगुरूपदी निवड करण्यात आली. डॉ. सोनवणे यांनी आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मुक्त अध्ययन प्रशाळेचे प्रमुख आदी जबाबदार्या पार…
रविवार विशेष लेख विद्यमान राज्य सरकारच्या काळात सभ्य चेहर्याच्या खंडणीखोरांची चलती आहे. या खंडणीखोरांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला असेल, त्यांना आत टाकण्यासाठी मदत केली असेल, त्यांच्या सरकारला बदनाम केलं असेल तर अशा बदमाशांचं पुनर्वसन करण्याची या सरकारची तयारी दिसते आहे. सत्तेच्या विकृतीचा हा परिपाक होय. अशाच चेहर्यातील समीर वानखेडे यांचा उपद्व्याप आपण पाहातोच आहोत. या वानखेडेंविषयी आपण पुढे लिहिणारच आहोत. अशा सभ्य चेहर्यामागचा आणखी एक खंडणीखोर या राज्यात उजळ माथ्याने वावरत होता. परमवीर सिंग असं त्याचं नाव. असंख्य प्रकरणांमागचा मास्टरमाईंड असलेला आणि विविध गुन्ह्यांचा पाठिराखा म्हणून ओळखला जाणारा म्हणून परमवीर राज्याच्या पोलीस खात्यात कार्यरत होता, हेच या राज्याचं दुर्देवं…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरात आता बिबट्यांच्या अवयवाच्या तस्करीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघा तस्करांना पकडण्यात संगमनेरच्या वनविभागाला यश आले आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. संगमनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन एच. लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शनिवारी (ता. १९ मे) नासिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ दुचाकीवरून येणारे काही लोक बिबट्याच्या दात सुळे नखे आणि मिशांची विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजली होती. या माहितीच्या आधारे वनक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी या परिसरात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. संशयित व्यक्ती या ठिकाणी आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयतांसोबत बोलणी…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) आज शनिवारी नाशिक दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यातील महत्वाचे मुद्दे : ✓ नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर हि वेळ आली नसती. ✓ २ हजार रु. च्या नोटा आणल्या तेव्हा त्या ATM मध्ये भरल्या पण जात नव्हत्या, म्हणजे साधी तपासणीही केली नव्हती. म्हणजे कोणताही पूर्वनियोजन नव्हतं. असं काय सरकार चालतं का? ✓ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत कि जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो. ✓…
कोपरगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज) वाळू वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या वाहनावर महसूल विभागाने कोणतीही कारवाई करू नये यासाठी, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या सांगण्यावरून २० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या खासगी इसम गुरमीत सिंग दडियाल (वय ४० वर्ष, रा. कोपरगाव) याला नासिक एसीबीने रंगेहात पकडले. दडियाल आणि तहसीलदार विजय बोरुडे यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरगावमध्ये थेट तहसीलदारांवरच एसीबीचा ट्रॅप झाल्याने जिल्ह्यातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. कोपरगाव येथील तक्रारदार यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये याकरीता, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे (वय ४४ वर्षे, रा. कोपरगाव) यांनी वीस हजार रुपये लाचेची…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाची संस्था म्हणून परिचित असलेल्या विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच राखीव जागांवरील सहा उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील उर्वरित अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. सुमारे 105 कोटी रुपयांच्या ठेवी असलेली ही संस्था वर्षभरात कोणतीही सुट्टी न घेता सलग सातही दिवस सुरू असते. महिला बचत गट आणि सामान्य नागरिकांना कर्ज पुरवठा करणारी संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक राहिला आहे. बँकिंग क्षेत्रातील अनेक सामाजिक आणि शासकीय पुरस्कार प्राप्त संस्थेचा आर्थिक कारभार अन्य संस्थांसाठी दिशादर्शक राहिला आहे. संस्थेच्या संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुरुवातीलाच…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातील आश्वीच्या शिबलापूरसह सर्व जागांवर आमदार थोरात समर्थकांनी मोठा विजय मिळवला आहे. यामुळे तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींवर पोट निवडणुकीच्या माध्यमातून आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवण्यात थोरात यशस्वी झाले आहे. तालुक्यातील शिबलापुर, पिंपळगाव देपा, पोखरी हवेली, नांदुरी दुमाला या गावांमधील पाच जागांकरता पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये आश्वी गटातील शिबलापूर ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत आमदार थोरात गटाच्या गितांजली संदीप मुन्तोडे व करुणा सागर मुन्तोडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर पिंपळगाव देपामधून नाना बाळशीराम गांजवे, पोखरी हवेलीमधून घुले संचिता दिनकर व नांदुरी दुमाला येथून वैशाली अमोल कराळे विजयी झाले आहेत. हे…
नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) २ हजार रुपयांच्या नोटे संदर्भात आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. ही नोट चलनातून बाद करण्यात आली असून ३० सप्टेंबर पर्यंत नोटा बँकेत जमा करून दुसऱ्या चलनाद्वारे बदलून घ्याव्या लागणार आहे. नोटा बदलताना एकावेळी फक्त दहा नोटा बदलून मिळतील. यामुळे ऐन उन्हाळ्यात पुन्हा एकदा बँकांसमोर भल्या मोठ्या रांगा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट परत करण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. या नोटेची कायदेशीर निविदा राहील, परंतु ती चलनातून बाहेर काढली जाईल. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे तात्काळ थांबवण्याचा सल्ला दिला आहे.…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचा सातत्याने पाठलाग करत गुरुवारी सकाळी भर रस्त्यात तिचा हात पकडत ‘मैं तुझसे प्यार करता हूं’ असे म्हणत तिने विरोध करताच तिला मारहाण व छेडछाड करणाऱ्या फरहान सय्यद याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात फरहान सय्यद याच्या विरोधात पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. शहरात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपासून कुठेही दिसत नसलेले शहर पोलिसांचे दामिनी पथक पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित तरुणी एम.एस.सीचे शिक्षण घेत असून गेल्या महिनाभरापासून शहरातीलच फरहान सय्यद नावाचा तरुण तिचा वारंवार…
