Author: अनंत पांगारकर
रविवार विशेष लेख (महाराष्ट्र संवाद न्यूज) भारतीय राजकारणात काही व्यक्ती इतक्या बनेल झाल्यात की त्यांची तुलनाच कोणाशी होऊ शकणार नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही असेच व्यक्तीमत्व बनलं आहे. जगज्जेते आणि सर्वव्यापी असल्याने त्यांनी केलेली कोणतीही कृती ही दैवी देणगीच जणू. ते कोणालाही काहीही बोलले तरी ते शब्द फुलोरे आणि त्यांना कोणी काही बोललं तर तो द्रोह, त्या म्हणजे लाखोल्या. त्यांनी कसंही वागलं तरी तो दैवी चमत्कार, इतरांसाठी मात्र तो व्यंग ठरतो. त्यांच्या अवगुणांवर कोणी बोट ठेवलं की जणू देवावरचाच हल्ला. यामुळे इतरांनी पंतप्रधानांवर टीका करू नये. तो अधिकार केवळ आणि केवळ मोदींचा आणि त्यांच्या पक्षाच्या वाचाळांचाच. कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सध्या देशात धर्माच्या नावावर सुरू असलेले राजकारण लोकशाहीला घातक आहे. काँग्रेसचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. देशात व राज्यात आगामी काळात सत्ता बदल निश्चित असून महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. याचबरोबर काँग्रेस पक्षात युवकांसाठी मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी डॉ. जयश्री थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे व रामहरी कातोरे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल पापडेजा आदींसह युवक पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले,…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन करावे. निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्यादा दराने निविष्ठा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जागरूकपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,…
अहमदनगर जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करा: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) येत्या पंधरा दिवसात अहमदनगर जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करा, शासन आपल्या दारी उपक्रमात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम तसेच जिल्हा विकास पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर शहरातील ज्योतिष व पौरोहित्य क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून योगदान देणाऱ्या प्रमोद बेल्हेकर (गुरु) यांना बेंगलोरच्या ‘नॅशनल इन्स्टिट्युट फॉर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपेंट’च्यावतीने ज्योतिष व रत्नशास्त्रातील योगदानासाठी ‘नॅशनल ॲस्ट्रोरत्न अवार्ड’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल इन्स्टिट्युट फॉर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपेंटचे चेअरमन व भारत सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य सनदी अधिकारी डॉ. शिवप्पा यांच्या हस्ते तसेच हिंदी व दक्षिणात्य चित्रपट निर्माते भोलाराम मालवीय यांच्या उपस्थितीत ए. डी. ए. रंगमंदिर, बेंगलुरू येथे रविवारी (ता. ६ मे) हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रतिवर्षी विविध क्षेत्रात योगदान, सेवा देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान ह्या संस्थेमार्फत केला जातो. बेल्हेकर गुरु म्हणून परिचित असणाऱ्या प्रमोद…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांचीदेखील बदली झाले आहे. त्यांना अद्याप नव्या नियुक्तीचे ठिकाण मिळाले नसून त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर वाशिम येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शैलेश हिंगे यांचे नियुक्ती झाली आहे. मंगरुळे गेल्या चार वर्षापासून संगमनेर मध्ये कार्यरत होते गत विधानसभा निवडणुकीपासून संगमनेर मध्ये कार्यरत असलेल्या मंगरूळे यांचा येथील कार्यकाळ लौकिकास्पद ठरला आहे. विविध निवडणुकांसह कोरोना काळात त्यांनी केलेले काम लक्षवेधी ठरले होते. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अजित थोरबोले यांना दापोलीचे उपविभागीय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. श्रीमती ज्योती कावरे यांची…
पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) पुण्यातील वाघोली येथे एका गोडाऊनला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. भीषण आगीमध्ये तिघांचाही कोळसा झाला असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. या धक्कादायक घटनेने पुणे हादरले आहे. वाघोलीच्या उबाळे नगर येथे शुक्रवारी रात्री लग्नाच्या सजावटीचे सामान असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. रात्री पावणे बाराच्या सुमारास लागलेल्या आगीत चार सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे भीषण आग लागली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बऱ्याच वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या भीषण आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती…
पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) महिलेसोबत अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असलेल्या निलेश अष्टेकर यांच्या विरोधात पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अष्टेकर काही वर्षांपूर्वी पुणे शहर पोलीस दलामध्ये नेमणुकीस होते. सध्या ते गुप्त वार्ता विभागात कार्यरत आहेत. पोलीस दलातील वड्या आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मूळची धुळ्याची असलेली ही 31 वर्षीय महिला सध्या ठाण्यामध्ये कळवा येथे राहावयास आहे. विधवा असल्याने धुण्याभांड्याची कामे करून ती आपला उदरनिर्वाह करते. अष्टेकर यांनी या महिलेच्या फेसबुक अकाउंटवर 19 फेब्रुवारी 2023 रोजी…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) वाळू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्वखर्चाने ग्राहकांच्या इच्छित स्थळी वाळू पोहोच केली जाणार आहे. ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायरपर्यंत असणारे टिप्पर टैम्पो व इतर ) यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगरचे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले आहे. राज्य शासनाने वाळू तस्करी थांबविण्यासाठी नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे या धोरणाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात वाळू उत्खनन वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन अशा स्वरूपाच्या निविदा मागविण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता वाहतूकदारांना नोंदणी करावी लागणार आहे. वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे. ग्राहकांना…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) घरीच झालेल्या प्रसूतीनंतर पोट दुखत असल्याने ती ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आली. तिची शरीरयष्टी बघता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांकडे रुग्णाच्या आधार कार्डची मागणी केली आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. संगमनेर तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाची घटना पोलीस ठाण्यात पोहोचली असतानाच त्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यातील ही दुसरी घटना समोर आली आहे. यामुळे संगमनेरमध्ये बालविवाहाचे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या घटनेतील पीडित बालिका संगमनेर तालुक्यातील असून तिचे सासर देखील संगमनेर तालुक्यातच आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या पालिकेच्या तक्रारीवरून तिचा नवरा सासू-सासरे आणि आई-वडिल…
