Author: अनंत पांगारकर
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) वर कमाईला चटावलेल्या आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून सतरा हजाराची लाच घेणाऱ्या विकास सुरेश जोंधळे या अभियंत्याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे काम बघणारा संगमनेर नगर परिषदेतील विकास सुरेश जोंधळे (वय 28 वर्ष, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) याला बुधवारी सतरा हजाराची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ने पकडले होते. जोंधळे यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गुरुवारी न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी बाजू मांडली. न्यायाधीश मनाठकर यांनी लाचखोर आरोपी जोंधळे याला दोन…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी सतरा हजार रुपयांची लाचखोरी करणारा संगमनेर नगर परिषदेतील कंत्राटी अभियंता बुधवारी नाशिक ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहात पकडला. विकास सुरेश जोंधळे (वय 28 वर्ष, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) असे गरिबांसाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी लाचखोरी करणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी लाचखोरीचे ग्रहण लागलेल्या संगमनेरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी तलाठ्यासह एक खासगी इसम छत्तीस हजार रुपयांची लाचखोरी करताना ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यापाठोपाठ बुधवारी दुसरी घटना समोर आली आहे. किरकोळ कामासाठीदेखील नागरिकांना अधिकाऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. शहर पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री दोन वाजता या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी एकरकमी थकीत कर्ज भरून खाते बंद करणा-या लाभार्थ्यास थकीत व्याजात 50 टक्के सवलतीस मुदतवाढ देण्यात आली आहे. योजना ठराविक कालावधीसाठी म्हणजेच 30 एप्रिल 2024 पर्यत राबविण्यात येणार असुन थकीत असलेल्या लाभार्थ्यांनी या शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेवून थकीत असलेले कर्ज एकरकमी भरून थकीत व्याजावर 50 टक्के सवलत घेवुन आपले कर्ज खाते बंद करावे. तसेच कर्ज थकबाकीदारांनी आपल्यावर होणा-या कार्यवाहीबाबत गांभिर्याने विचार करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक दिनेश चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) नवे वाळू धरण अस्तित्वात येण्याच्या पूर्वसंध्येला संगमनेरच्या महसूल विभागाने खांडगावमध्ये केलेल्या कारवाईत जेसीबी आणि वाळू साठा ताब्यात घेतल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, महसूलने पुन्हा एकदा केलेल्या कारवाईत जेसीबीसह ट्रॅक्टर पकडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या घटनांमधून गौण खनिज तस्करांशी संबंधितांची नावे देखील पुढे येऊ लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी खांडगावमध्ये झालेल्या कारवाईमध्ये चेतन साकोरे तर काल रात्री केलेल्या कारवाईत राहुल घुले याचे नाव समोर आले आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू तस्करी, गौण खनिज लूट थांबविण्यासाठी राज्यभरात नवे वाळू धोरण आणले आहे. महाराष्ट्र दिनापासून या नव्या धोरणाची राज्यात विशेष अहमदनगरमध्ये…
अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज) पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कळस बुद्रुकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २० विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. शिष्यवृती परीक्षा २०२३ मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे कंसात मिळालेले गुण: शौर्य सुहास शिंदे (236), कावेरी राजेंद्र खताळ (232), आरुष अंकुश वाकचौरे (220), तनुजा रमेश ढगे (194), आदिती किसन मेंगाळ (190), दर्शन संतोष कातोरे (190), श्रेया माधव कोल्हाळ (190), सनती संदीप ढगे (190), ध्रुव ज्ञानदेव ढगे (180), दिव्या सुखदेव वाकचौरे (180), चैतन्य अरविंद पवार (174), सार्थक सुरेश मेंगाळ (162), साई संतोष ढगे (162), आदिती सुरेश वाकचौरे (162), अक्षरा सुनील शिर्के (154), स्वाती काशिनाथ डोके (146), भाग्यश्री संजय काळे…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी नवे स्वातंत्र्य युद्ध सुरु आहे. यामध्ये पवार यांचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याने त्यांना बाजूला जाऊन चालणार नाही, असं महत्त्वाचं विधान काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर थोरात यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देश सध्या ज्या परिस्थितीतून जातो आहे. अशा अडचणीच्या काळात लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी नवे स्वातंत्र्ययुद्ध सुरू आहे. यामध्ये पवार साहेबांचे मोठे महत्त्व आहे. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लढाई करत…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) एम्पथी फाउंडेशन, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि अधिकारी यांच्या योगदानातून मिशन आपुलकी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सारोळे पठारला सुंदर इमारत उभी राहिली आहे. गुणवत्तेबरोबरच शाळेच्या भौतिक विकासाचे येथील हे मॉडेल राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव विजय चौधरी यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे पठार व धादवडवाडीतर्फे रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वार्षिक स्नेहसंमेलन व मिशन आपुलकी कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या संस्थापिका सुनीता काकड होत्या. मंत्रालय शिक्षण विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल भोर, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय फटांगरे,…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची मोठे घोषणा केली आहे. तसेच या सोबत कोणतीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला असून सामाजिक कार्यात मात्र व्यस्त राहणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला जोरदार विरोध करत पवार जोपर्यंत आपला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत सभागृह न सोडण्याचा पवित्रा…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अनेकांनी हुतात्मे पत्करले. मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा निर्मितीला मोठा इतिहास आहे. देशाच्या विकासामध्ये आपल्या राज्याचा वाटा सर्वाधिक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त थोरात यांच्या हस्ते संगमनेरमध्ये शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले, विविध परंपरेने नटलेल्या महाराष्ट्राचा विकासातील अग्रगण्य राज्य म्हणून देशात लौकिक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे आपण 75 वे तर राज्याच्या निर्मितीचे 63 वे वर्ष साजरे करीत आहोत. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि नवनिर्मित महाराष्ट्राचे…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोवीड संकटानंतर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकरी, कष्टकरी मेटाकुटीला आला होता. सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने सामान्य माणसांचा हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगत राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या निर्णयाची जंत्रीच वाचून दाखवली. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री विखे यांच्या समवेत यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,…
