Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता राहाता तालुक्यातील गणेशनगर येथून एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करून, लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करत त्याचा खून करण्यात आला. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात स्कोडा गाडीच्या डिकीत टाकून दिला. या घृणास्पद कृत्याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत युवकाचे नाव प्रतीक वसंत सदाफळ (वय १९) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १२) रात्री सुमारे ११ वाजता गणेशनगर येथील निर्मळ रुग्णालयासमोरून त्याचे अपहरण झाले. संशयितांनी त्याला सिल्व्हर रंगाच्या स्कोडा गाडीच्या डिकीत टाकले आणि अज्ञात स्थळी नेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी, शहरातील नामांकित डॉक्टर अमोल कर्पे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपलेली गुरुवारी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविवारी (६ एप्रिल) संगमनेरमध्ये रामनवमी उत्सवाची धामधूम सुरू असताना हा संतापजनक प्रकार समोर आला होता. डॉ. कर्पे याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीला पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या टेरेसवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. व कोणाला काही सांगू नको, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी गेल्याचे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील तलाठी अक्षय ढोबळे आणि खासगी व्यक्ती पत्रकार रमजान नजीर शेख हे ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली असून एसीबीच्या जाळ्यात सापडलेला शेख नेमका कशाचा पत्रकार आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. खडी वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी आणि ती सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ व १२ प्रमाणे घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या नाशिक युनिटने आणि घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर-अकोले तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमीन व गृह तारण कर्ज योजनेअंतर्गत कर्ज देण्याचे आमिष दाखवून मंजूर कर्जापैकी अल्प रक्कम कर्जदारांना देत उर्वरित रक्कम संस्थेचे व्यवस्थापक व संचालक मंडळाने कर्जदारांच्या खात्यातून परस्पर इतरांच्या नावे वर्ग केल्याचा आरोप करत संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला या बेकायदेशीर कर्ज प्रकरणांसंदर्भात कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी संस्थेने काय माहिती दिली हे अद्याप समजू शकले नाही. प्राप्त माहितीनुसार, कर्जदारांनी संस्थेने नियमबाह्य कर्ज व्यवहार करून गैरप्रकार केल्याचा आरोप केला असून, याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि अन्य शासकीय न्यायिक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर परिसरातील उद्योग आणि व्यवसायासाठी आधारस्तंभ ठरलेल्या संगमनेर मर्चंट बँकेने आपल्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असल्याचे उद्योजक राजेश मालपाणी यांनी म्हटले आहे. बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा पाचव्यांदा राजेश मालपाणी यांची एकमताने निवड झाली आहे, तर व्हाईस चेअरमन म्हणून मधुसूदन नावंदर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक संतोष कोरे आणि सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांच्या देखरेखेखाली बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात बुधवारी (१६ एप्रिल) चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी अनुक्रमे राजेश मालपाणी आणि मधुसूदन नावंदर यांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पिंपरी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक निलेश सुरेश बोडखे (वय ३८ वर्षे, पुणे) यांच्यावर तक्रारदाराकडून तीस हजार रुपये लाच मागणी केल्याप्रकरणी व मागणी दरम्यान तडजोडीअंती वीस हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराचे वाहन सोडवण्यासाठी पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, पडताळणीमध्ये बोडखे यांनी २०,०००/- रुपये लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-मोहोळ, अपर पोलीस अधीक्षक गिरीश सराफ, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर सामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी या मुद्द्यावर विधिमंडळात आणि शासनाकडे सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या पाठपुराव्याला शासनाने काहीसा दिलासा दिला असला, तरी अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर माफीबाबत अद्याप स्पष्ट निर्णय न घेतल्याने तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २१ डिसेंबर २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात आणि १६ मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शास्ती कर रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच, ८ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी विधिज्ञ ॲड. जगन्नाथ वामन, उपाध्यक्षपदी ॲड. प्रसाद भडांगे, महिला उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता सस्कर यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीची पुन्हा फेरनिवड करण्यात आले आहे. १५ एप्रिल, २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वकील संघाचे कार्यकारिणी निवडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये निवडणूक कार्यक्रम न लावता सद्यस्थितीत काम करणाऱ्या, गेल्या वर्षभरात वकिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच वकिलांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची दखल घेत कार्यकारिणीलाच सन २०२५ ते २०२६ या वर्षांच्या कालावधीसाठी संधी देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. त्यामुळे जुन्याच कार्यकारिणीकडे नव्या वर्षासाठी ची सूत्रे सोपविण्यात आली. अध्यक्षपदासाठी ॲड. वामन, उपाध्यक्षपदी भडांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल, तर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असलेल्या एका अनधिकृत दर्ग्याच्या उर्वरित बांधकामावर आज पहाटेपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, यात तीन ते चार पोलीस जखमी झाले असून पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अनधिकृत दर्गा ट्रस्टला आपले म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत आज, १५ एप्रिल रोजी संपली. यानंतर नाशिक महानगरपालिकेने (NMC) मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून उर्वरित बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. यापूर्वी याच दर्ग्यावर कारवाई करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी कोणतीही अनुचित…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई | विशेष प्रतिनिधी राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीच्या नगराध्यक्षांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचे महत्त्वपूर्ण अधिकार आता थेट निवडून आलेल्या सदस्यांना मिळणार आहेत. यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण तरतुदींना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहेत. यापूर्वी, कोणत्याही नगराध्यक्षांना पदावरून दूर करायचे असल्यास, निवडून आलेल्या एकूण सदस्यांपैकी किमान पन्नास टक्के सदस्यांच्या सह्या असलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाई. त्यानंतर, शासनाच्या स्तरावर या प्रस्तावावर विचार होऊन अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया पार पडत असे.…
