Author: अनंत पांगारकर

मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus) – आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा आव्हानात्मक असू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा. मिथुन (Gemini) – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोक प्रभावित होतील. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मकता दिसेल. कर्क (Cancer) – आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल. जुने वाद मिटू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला (SEC) जोरदार फटकारले आहे. न्यायालयाने राज्यातील या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिले असून, ही शेवटची मुदतवाढ असल्याचेही स्पष्ट केले आहे.  यापूर्वी, २०२२ मध्ये न्यायालयाने जे. के. बांठिया आयोगापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी जागा पूर्ववत करून चार महिन्यांत म्हणजेच ऑगस्ट २०२५ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्देशांचे पालन न केल्याने न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून त्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्याचे…

Read More

संगमनेर –  सोमवारी पहाटे पुणे-नाशिक महामार्गावर रायतेवाडी फाटा येथे एक भरधाव वेगातील कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने हॉटेल मालक बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून पुण्याकडे जात असलेल्या एका भरधाव कंटेनरच्या (क्रमांक HR 55 AT 2926) चालकाला झोपेची डुलकी लागली. यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट महामार्गालगतच्या ‘हॉटेल दिव्यांका’ मध्ये शिरला. हा अपघात पहाटे ५ ते ५:१५ च्या सुमारास घडला. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी हॉटेलचे मालक दत्तात्रेय मांडेकर हॉटेलच्या आत झोपले होते. मोठा आवाज झाल्याने त्यांना जाग आली आणि समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरडा…

Read More

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी रात्री दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अवघे ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कायदेक्षेत्र आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू असलेले सिद्धार्थ शिंदे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी होते, मात्र त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहे. सोमवारी कामकाजासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले असता अचानक त्यांना चक्कर आली. त्यानंतर तातडीने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे उत्तम आकलन, तसेच संविधानाचे सखोल ज्ञान…

Read More

हे राशीभविष्य सर्वसाधारण असून, प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार त्यात बदल होऊ शकतो. मेष (Aries)- आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला संयम बाळगावा लागेल. कामात काही अडथळे येऊ शकतात, पण तुमच्या मेहनतीने तुम्ही त्यावर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन (Gemini)- तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कर्क (Cancer)- आज तुम्ही भावनिक होऊ शकता. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. वैयक्तिक संबंधात गोडवा राहील. सिंह (Leo)- आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन…

Read More

मुंबई –  राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देत, एकत्रित ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’ अंतर्गत नवीन २,३९९ उपचारांचा समावेश करण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय, पाच लाखांपेक्षा अधिक खर्च असलेल्या अवयव प्रत्यारोपणासारख्या गंभीर उपचारांसाठी वेगळा ‘कॉर्पस निधी’ (Corpus Fund) निर्माण करण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व महिला व…

Read More

अहिल्यानगर –  जिल्ह्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच, धोका असलेल्या भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, विखे पाटील यांनी प्रशासनाला पूर्णपणे सतर्क राहण्यास सांगितले आहे. प्रशासनाने पाच आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांतील गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये पारनेर (३), पाथर्डी (३), श्रीगोंदा (८) आणि कर्जत (५) या तालुक्यांतील मंडळांचा…

Read More

अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,६२७ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १०३२ क्युसेक, ओझर बंधारा ६१८ क्युसेक, मुळा धरणातून…

Read More

नवी दिल्ली –  देशभरातील फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, आता त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ (Dr.) ही उपाधी लावता येणार आहे. आरोग्य सेवा महानिदेशालयाने (DGHS) या संदर्भात यापूर्वी काढलेला आदेश मागे घेतला आहे. हा निर्णय फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक मोठा विजय मानला जात आहे. यापूर्वी, ९ सप्टेंबर रोजी डीजीएचएसच्या संचालक डॉ. सुनीता शर्मा यांनी एक पत्र जारी केले होते. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले होते की, फिजियोथेरेपिस्ट्स त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी वापरू शकत नाहीत. यामागचे कारण देताना त्यांनी म्हटले होते की, यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि बोगस डॉक्टरांच्या वाढीला चालना मिळू शकते.  ‘डॉक्टर’ ही उपाधी फक्त…

Read More

संगमनेर – राज्याचे मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाच्या सचिवालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या जागेच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार असून, शहरातील जुनी आरक्षणे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. तांबे म्हणाले, यामुळे संगमनेर शहरातील इंदिरानगर, वकील कॉलनी, मालदाड रोड, पद्मनगर, अभंग मळा, स्टेडियम परिसर, गुंजाळ आखाडा यांसारख्या भागांतील हजारो कुटुंब आणि वसाहती या निर्णयामुळे कायदेशीर अडचणीतून बाहेर पडतील आणि त्यांना हव्या असलेल्या नागरी सुविधा मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. १९८० च्या शहर विकास आराखड्यानुसार, शहरातील काही भागांत शेतजमिनी होत्या. या जमिनींवर गार्डन, खेळाचे मैदान, शाळा अशा विविध कारणांसाठी आरक्षण टाकण्यात…

Read More