Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी कारखान्याचे मुख्य मार्गदर्शक असलेले राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थोरात यांनी गुरुवारी अनुक्रमे जोर्वे, साकुर आणि उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था या तीन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे. पहिल्याच दिवशी माजी मंत्री थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कारखाना निवडणुकीने पहिल्याच दिवशी वेग पकडला आहे. विरोधकांनी कारखाना निवडणुकीसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली असून यावेळी निवडणूक रंगण्याची…
नवी दिल्ली, दि. ३ एप्रिल – नुकताच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा प्रस्ताव लोकसभेत मांडला. विरोधकांनी या विषयावर त्यांची मते मांडली, आणि अमित शाह यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर, आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक विरोधी खासदार अनुपस्थित होते. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी चर्चेची सुरुवात केली आणि मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान मोदींनी एकदा मणिपूरला भेट द्यावी, अशीही मागणी केली. अमित शाह यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर…
संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी काल (बुधवारी २ एप्रिल) संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाई वीज पडून मृत पावल्या. या घटनेमुळे घुले कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी आज तातडीने घुले कुटुंबीयांची भेट घेऊन याबद्दल दुःख व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, प्राजक्ता घुले आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. जयश्री थोरात यांनी दु:ख व्यक्त करत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. डॉ. थोरात म्हणाल्या, “शेतकरी खूप कष्टाने पिके घेतात. संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. दुधाचा…
संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गावाहिनी-मातृशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि दिव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही शोभायात्रा रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता संगमनेरमधील अभिनवनगर येथील श्रीराम मंदिरातून निघेल. श्रीराम जन्मोत्सव रविवार, ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता साजरा केला जाईल. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व बजरंग दल शाखा, प्रमुख मंदिरे, श्रीराम मंदिरे आणि हनुमान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. शोभायात्रेत भव्य धार्मिक देखावे, अयोध्येतील श्रीरामलल्लांची भव्य मूर्ती, महाबली हनुमानाची भव्य मूर्ती, केरळमधील पारंपारिक नृत्य आणि वाद्ये, श्रीराम…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात बुधवारी (दि. २) दुपारी साडेतीन ते पाच वाजेच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील सावरगाव तळ, निमज, धांदरफळ, नांदुरी दुमाला, पेमगिरी आणि कौठे धांदरफळ या गावांना मोठा फटका बसला. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, उन्हाळी बाजरी, हरभरा, कांदा आणि चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कौठे धांदरफळ येथे निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाईंवर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, ओढे-नाले आणि डोंगर कड्यांवरून पाणी वाहत…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याच्या पठार आणि पश्चिम भागात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या भागातील नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी माजी महसूल आणि कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. हिवरगाव पठार, निमज, नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी मिर्झापूर, धांदरफळ खुर्द या गावांना बुधवारी झालेल्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे डोंगर भागातून पाणी वेगाने खाली आले आणि शेतात साचले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसत…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमणला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युरोपमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याकरिता पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. संगमनेर चे आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून मदतीचा हा धनादेश सोमण कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला आहे.संगमनेरची सायकल पटू असलेल्या प्रणिता सोमण हिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलिंग मध्ये अनेक बक्षिसे मिळवत देशाचे नाव सर्वत्र उंचावले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या प्रणिताचा आमदार अमोल खताळ यांनी नुकताच डॉ. प्रफुल्ल सोमण यांच्या घरी जाऊन सत्कार केला होता. त्यावेळी प्रणिताच्या वडिलांनी युरोपमधील प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याच खताळ यांना सांगितले. खताळ यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शिर्डी, दि. २ एप्रिल – थोरात कारखान्यापाठोपाठ, आता पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी जाहीर केला आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी ९ मे २०२५ रोजी मतदान होणार आहे, आणि १० मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे गुरुवारपासून (३ एप्रिल) ते ९ एप्रिल या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी, शिर्डी यांचे कार्यालय, राहाता प्रशासकीय इमारत (राहाता तहसील कार्यालय) पहिला मजला, राहाता येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील आणि स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता…
शिर्डी, दि. २ एप्रिल – शिर्डीत शनिवारपासून (दि. ५) ते सोमवार (दि. ७) या काळात श्री साईबाबा संस्थानतर्फे ११४ वा श्रीरामनवमी उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, १ लाख ७३ हजार भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या उत्सवात मुंबईच्या व्दारकामाई मंडळाने श्री गजमुख गणपतीचा देखावा सादर केला असून, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सौदी अरेबियातील एका साईभक्ताने फुलांची सजावट केली आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उत्सवात विविध ठिकाणच्या ८७ पालख्या सहभागी होणार आहेत.…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी राजहंस दूध संघाच्या ‘मिशन ५० लिटर’ उपक्रमाअंतर्गत कालवड संगोपन कार्यशाळेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी दूध संघाची स्थापना केली, आज तालुक्यात ९ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन होण्यासाठी राजहंस दूध संघाचा ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाई निर्माण करण्याचा उपक्रम दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी ५० लिटर दूध निर्मिती करणाऱ्या नवीन कालवडी आणि गाईंचे प्रदर्शन झाले. मिशन ५० लिटर अंतर्गत कालवड संगोपन योजना कार्यशाळेत थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते.…
