Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी : राज्यात भाकड जनावरे आणि वासरांचा प्रश्न गंभीर बनल्याने, शिव आर्मी शेतकरी संघटनेने आज (मंगळवारी,१३ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शेतकरी आपली भाकड जनावरे घेऊन सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आणि नंतर थेट प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांनी भाकड जनावरे आणि वासरांच्या सरकारी खरेदीची मागणी केली आहे. सध्या अशा जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे थांबली आहे, त्यामुळे ती शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहेत. या जनावरांचे योग्य संगोपन करण्यासाठी सरकारने गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावीत, अशीही मागणी आंदोलकांनी केली. तसेच, शासनाकडे जमा केलेल्या जनावरांच्या बदल्यात शेतकऱ्यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ संगमनेरने जालना येथे झालेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्लबने तब्बल सात मानाचे पुरस्कार पटकावत जिल्ह्यामध्ये आपली छाप पाडली. या सोहळ्यात क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पीडीजी मोहन पालेशा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेशजी साबू, निर्मला साबू, डीजी सुधीर लातूरे, रो. जयेशभाई पटेल, रो. क्षितिज झावरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ९२ क्लबमधून रोटरी क्लब ऑफ संगमनेरची निवड झाली. क्लबला बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट सीपीआर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सायटेशन अवॉर्ड,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा राज्यात अग्रेसर बनवला. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. या तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र नवीन लोकप्रतिनिधीने आठ महिन्यात एक रुपयाचा निधी न आणता राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करून दुर्दैवी राजकारण केले असल्याची टीका संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर यांनी केली असून मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी केलेल्या या उद्योगाने तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.  तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अकोले: आपल्याच मित्राच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहून त्याची नियत फिरली आणि त्याने वेशांतर करून चोरी केली. मात्र, राजूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास करून आरोपी मित्राला अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या सुमारे साडेचार लाख रुपयांच्या दोन सोन्याच्या चेन जप्त करण्यात आल्या आहेत. मौजमजा करण्यासाठी ही चोरी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सागर दिगंबर पवार (रा. राजूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचा मित्र विष्णू रामभाऊ हेकरे यांच्याच घरात रविवारी मध्यरात्री चोरी केली होती. पहाटेच्या सुमारास विष्णू हेकरे रात्री झोपले असताना, त्यांच्या दरवाजावर थाप मारण्यात आली. त्यांनी दरवाजा उघडताच तोंडाला रुमाल बांधलेला एक तरुण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून, २७ वर्षीय मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील काळाचौकी येथे पोलीस ठाण्यात या संदर्भात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी सुमारे १४ वर्षे नऊ महिन्यांची आहे. गेल्या वर्षी १ ऑक्टोबर रोजी १७ वर्षांच्या एका अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीसोबत जवळीक साधली. त्यानंतर तो तिला २७ वर्षीय आरोपीच्या घरी घेऊन गेला, जिथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही केले. नंतर या आरोपींनी पीडितेला धमकावून अश्लील व्हिडिओ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेरच्या आश्वी बुद्रुक येथे समोर आल्याचे वृत्त समोर येऊन काही तास उलटत नाही तोच तालुक्यातील जाखुरी येथे महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. संगीता भारत मोरे (वय ४०, रा. नादनठाण, ता. वैजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती भारत मोरे याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. संगीता मोरे, त्यांचे पती भारत मोरे आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती जाखुरी येथील जावई सोमनाथ सुरशे यांच्या घरी मुक्कामी आले होते. रविवारी रात्री सर्व कुटुंबियांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त (२७ सप्टेंबर) ‘आय लव्ह संगमनेर’ संस्थेने पोलीस भरती, आर्मी भरतीसह इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष अभियानाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात तरुणांना मार्गदर्शन, सराव परीक्षा आणि शारीरिक चाचण्यांची तयारी करून घेतली जाईल. या माध्यमातून संगमनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आमदार सत्यजीत तांबे हे तरुणांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कार्याचा एक भाग म्हणून ‘आय लव्ह संगमनेर’ या संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. यासंदर्भात माहिती देताना स्पर्धा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर, प्रतिनिधी: घुलेवाडी (संगमनेर) येथील रहिवासी राजू मनोहर थोरात यांनी १५ ऑगस्टला प्रांताधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ट्रक चालकाने घरात झोपेत असताना कुटुंबाला चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या घटनेत थोरात यांच्या कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले असून घराचेही मोठे नुकसान झाले होते.  त्यानंतर थोरात यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे वारंवार मदतीची मागणी करूनही अद्याप कोणतीही चौकशी न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराला कंटाळून थोरात यांनी हा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासन यापासून काय पावले उचलते याकडे लक्ष लागले आहे. राजू मनोहर थोरात, (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन माहेराहून २० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने आमदार रोहित पवार यांनी समाजाने यातून कोणताही धडा घेतला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा झेंडगे आणि विशाल यांचा विवाह गेल्या वर्षी २ मे २०२४ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी स्नेहाकडे कंपनी चालवण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. या पैशांसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. https://x.com/RRPSpeaks/status/1954558051442434467?t=uA3sdevQQ7sWZSaRCYw82A&s=19 छळाला कंटाळून स्नेहाने याआधीही पोलिसांत तक्रार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: जे काम पन्नास वर्षांत सर्व सत्तास्थानांवर असूनही तुम्हाला जमलं नाही, ते पोरं-बाळांनीच करून दाखवलं आणि पाणी आणल्याचं सिद्ध केलं, असा टोला लगावत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर नाव न घेता जोरदार टीका केली. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या निळवंडे डाव्या कालव्याचं पाणी अखेर संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथे पोहोचलं आणि त्याचा जलपूजन सोहळा नुकताच पार पडला. या ऐतिहासिक क्षणी डॉ. विखे बोलत होते.  डॉ. विखे म्हणाले की, निळवंडे डावा कालवा योजना गेल्या ३०-४० वर्षांपासून केवळ कागदावर होती. या काळात अनेक बैठका झाल्या, आश्वासनं दिली गेली, पण पाण्याचा एक थेंबही गोरक्षवाडी किंवा संगमनेरमध्ये पोहोचला…

Read More