Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी सहकाराचे मोठे वलय लाभलेल्या संगमनेर तालुक्यात पतसंस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात भक्कमपणे विणले गेले आहे. या पतसंस्थांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल तालुक्यात होत असते. घुलेवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने मावळत्या आर्थिक वर्षात मोठे यश मिळविले आहे. संस्थेने आर्थिक वर्षांमध्ये १३ कोटी १२ लाख ६२५ रुपयांची उलाढाल करत ९ लाख ११ हजार रुपयांचा नफा मिळवला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मावळत्या आर्थिक वर्ष अखेर पतसंस्थेकडे १० कोटी ४८ लाख ४० हजार ३०३ रुपयांच्या ठेवी असून, ८ कोटी २३ लाख ५८ हजार ७०० रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच…
संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरमधील टोमॅटो व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहेत्रे यांची राजस्थानमधील ललित रामचंद्र चंदावनी या टोमॅटो व्यापाऱ्याने सुमारे १९ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी चंदावनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब मेहेत्रे यांनी संगमनेरमधून टोमॅटो खरेदी करून ते राजस्थानमधील राम ट्रेडिंग कंपनीला (मालक: ललित रामचंद्र चंदावनी, रा. जोधपूर, राजस्थान) वेळोवेळी पुरवले. मात्र, चंदावनीने या टोमॅटोचे पैसे मेहेत्रे यांना दिले नाहीत. त्यामुळे मेहेत्रे यांचे १९ लाख २२ हजार ४३३ रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी भाऊसाहेब मेहेत्रे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ललित रामचंद्र चंदावनी यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर…
संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम पुण्याच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. विधानसभेपाठोपाठ आता संगमनेरमध्ये कारखान्यासाठीच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संगमनेरमध्ये निवडणूक ज्वर बघावयास मिळेल. निवडणूक कार्यक्रमानुसार ११ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १२ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११…
संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी गोवत्स परमपूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संगमनेर येथे ९ दिवस श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या निमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मंगळवारी सकाळी निघालेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि सनई चौघड्याच्या सुरांनी संगमनेर शहर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. शेकडो संगमनेरकर महिला पुरुषांसह या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम यादेखील सहभागी झाल्या होत्या. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे १ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या शुभारंभानिमित्त संगमनेरमधील चंद्रशेखर…
महाराष्ट्र संवाद न्यूज मंगळवार, दि. १ एप्रिल येवला तालुक्यातील सावखेडा येथे दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ३१ मार्च रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास सावखेडा येथील समाधान गोरे यांच्या शेततळ्यात शुभम शांताराम गोरे आणि साई संदीप कुमावत (वय १२) ही दोन मुले अंघोळीसाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येवला तालुका पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, मतदारसंघात पुन्हा…
मुंबई, दि. १ एप्रिल – राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर आर्थिक संकटाचे भयावह चित्र समोर आले आहे. जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे अशक्य होत असताना, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कठोर परिपत्रक जारी करून खर्चावर नियंत्रणाचे आदेश दिले आहेत. फुकट अनुदान योजनांना पूर्णपणे आळा घालण्याच्या सूचना दिल्याने, ‘लाडकी बहीण’ योजनेतील वाढीव २१०० रुपये मिळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना मर्यादित निधीचा सुयोग्य वापर करून अनुत्पादक अनुदान योजना बंद करण्याचे आणि उत्पादक भांडवली खर्च वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने लोकप्रिय…
संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी “भारत हा विविध धर्म, पंथ आणि जातींचा देश असला तरी, मानवता आणि भारतीयत्व या दोन गोष्टी आपल्याला एकत्र जोडतात. रमजान ईद हा पवित्र सण, एक महिन्याच्या उपवासानंतर साजरा केला जातो. जगभरातील मुस्लिम बांधव हा सण मोठ्या आनंदात आणि पवित्र भावनेने साजरा करतात, ज्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीची मुख्य बाब आहे आणि रमजान ईद हा बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देतो,” असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.…
संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी आज रमजान ईदच्या निमित्ताने संगमनेर येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मगुरु अब्दुल रकीब अब्दुल वहाब पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी वक्फ बोर्डाविरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून हाताला काळ्या फिती बांधून नमाज पठण केले. नमाज पठणानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले. या सामूहिक नमाज पठणाला संगमनेर तालुक्यातील अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. दरम्यान काळ्या फिती लावून करण्यात आलेल्या नमाज पठणाविषयी विचारणा केली असता धर्मगुरु पिरजादे म्हणाले, “केंद्र सरकारने वक्फ बोर्डाविरोधात घेतलेला कायदा मुस्लिम समाजाच्या हितासाठी धोकादायक आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजाला नाहक…
शिर्डी, दि. ३१ मार्च – शिर्डी एमआयडीसीमध्ये सुरू होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे, तसेच रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सावळीविहीर खुर्द येथील शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टरअंतर्गत ‘निबे ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड’ (शेल फोर्जिंग) कंपनीच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, निबे प्रायव्हेट लिमिटेडचे गणेश निबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, शिर्डी एमआयडीसीमध्ये डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून नवीन औद्योगिक पर्व सुरू होत…
अहिल्यानगर, दि. ३१ मार्च – ‘लाडकी बहीण योजने’च्या पात्रतेचे निकष डावलून लाभ घेणाऱ्या महिलांवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल १५०० हून अधिक महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची नावे महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आली असून, त्यांचा ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या कठोर भूमिकेमुळे ‘लाडकी बहीण योजने’तील अपात्र लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १२ लाखांहून…
