Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याची जोरदार मागणी केली. तसेच, राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करत सर्वांनी एकत्रित येऊन याविरोधात आवाज उठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त संगमनेर बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या संतांना आणि समाजसुधारकांना त्रास देणारी धर्मांध शक्ती आजही समाजात कार्यरत आहे. याच शक्तींनी महात्मा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, शिर्डी: महसूल विभागाने अधिक संवेदनशीलतेने काम करत सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राहाता येथे ‘महसूल सप्ताह – २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी त्यांच्या महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही उपक्रमांची आठवण करून दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या योजनेचा लाभ सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी घेतल्याचं उघड झालं आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरून विरोधक सरकारवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर सविस्तर चर्चा झाली. ज्या पुरुषांनी योजनेचा चुकीचा फायदा घेतला आहे, त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, जळगाव: एका महिला तलाठ्याला 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या नोंदी कमी करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली असून, या प्रकरणी तलाठ्यासह एका रोजगार सेवक आणि एका मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या सात भावंडांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर काही जुन्या नोंदी होत्या. त्या कमी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता. तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम हिने अर्ज स्वीकारला, मात्र पोचपावती दिली नाही. नंतर पाठपुरावा केला असता, तिने कामासाठी 25 हजार रुपयांची मागणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: चारित्र्याच्या संशयातून एका 65 वर्षीय पतीने आपल्या 60 वर्षीय पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव चंद्रकला दगडू खंदारे (वय 60) असून, आरोपी पती दगडू लक्ष्मण खंदारे (वय 65) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली. घारगाव येथे राहणारे दगडू खंदारे हे शेती व्यवसाय करतात. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबाने नेहमीप्रमाणे एकत्र जेवण केले. जेवणाच्या वेळी दगडू खंदारे यांनी पत्नी चंद्रकला यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्यासोबत वाद घातला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: भोजापूर चारीचे पाणी वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी न सोडल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या ३ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षासह ग्रामस्थांनी यासंदर्भात पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून, ग्रामपंचायतीनेही याबाबत ठराव केला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, वडझरी गावातील शेतकरी गेल्या ४० वर्षांपासून निळवंडे व भोजापूरच्या पाण्यापासून वंचित आहेत. भोजापूर चारीचे पाणी नियमानुसार टेलपासून म्हणजे वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी अपेक्षित असताना, जलसंपदा विभागाची यंत्रणा काही विशिष्ट लोकांच्या दबावाखाली चुकीचे काम करत आहे. हे पाणी आडमार्गे इतरत्र वळवले जात असल्याचा आरोप…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानाचा १९ वा शुभारंभ शनिवारी, (२ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता मालदाड येथील कानिफनाथ मंदिर डोंगर येथे होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली २००६ पासून अमृत उद्योग समूह आणि विविध सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: कर्जदाराकडून कोरा धनादेश घेऊन तो कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा करून धनादेशाचा अवमान झाला या कारणासाठी न्यायालयात कर्जदार महिलेविरुद्ध वसुली दावा दाखल करणाऱ्या संस्थेला संगमनेर न्यायालयाने दिलासा न देता कर्जदार महिलेची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. शारदा बाळू जगधने यांनी सन 2019 मध्ये मुंबईस्थित सर्वग्राम फिनकेअर प्रा. ली. या कंपनीच्या संगमनेरमधील कार्यालयाकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची थकबाकी 2,35,241/- रुपये झाली होती. हे कर्ज फेडण्यासाठी आरोपी कर्जदार महिलेने संस्थेला सदरचा धनादेश दिल्याचे तसेच या खटल्यासाठी संबंधित कंपनीने व्यवस्थापकाला प्राधिकार पत्र दिल्याचे सांगत न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: राज्यातील २०११ पर्यंतची सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे ३० लाख अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा मिळेल. या विशेष मोहिमेअंतर्गत ५०० चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमित केली जातील, तर उर्वरित अतिक्रमणांवर बाजारमूल्यानुसार दंड आकारून ती नियमित केली जातील. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. पंतप्रधान आवास योजनेला गती आणि मालकी हक्काचे स्वप्न पूर्ण- या निर्णयामागे पंतप्रधान आवास योजनेतील ३० लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मुख्य हेतू आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी घराची मालकी असणे बंधनकारक आहे. अतिक्रमणे नियमित झाल्याने संबंधित व्यक्तींच्या नावावर जमीन होईल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेटसमोरील हॉटेल स्टेटसजवळील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३८ कोटी रुपये निधीतून साकारत असलेला हा उड्डाणपूल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून अपघातांना आळा घालणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. माझे घर सोसायटी परिसरातील नागरिकांसाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या ठिकाणी होणारे अपघात लक्षात घेता, थोरात यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी निधी मिळवला होता. सुरुवातीला एका बाजूचे काम पूर्ण झाले असले, तरी दुसऱ्या बाजूचे काम काही…
