Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी-  जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने काल, (२० जून) संगमनेर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ३५ लोकांवर कारवाई केली आहे. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेरमध्ये थेट पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या मोठ्या कारवाईनंतर आता संगमनेरमधील अन्य अवैध धंद्यांकडे लक्ष लागले आहे. स्थानिक पोलीस, एलसीबी हे अवैध धंदे बंद करण्यात यश मिळवितात की हे धंदे सुरूच राहतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अशा कारवाया करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजता तेलीखुंट…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सह्याद्री विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, एकविरा फाउंडेशन आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 4000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले. ते म्हणाले, योगामुळे शरीर लवचिक होते, त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगासने करावीत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही आरोग्याला जपण्याचा मंत्र दिला होता. दररोज किमान वीस मिनिटे योगाभ्यास करणे आवश्यक…

Read More

मुंबई, २१ जून, २०२५:  महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील खटले मागे घेण्यासंदर्भात शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन शासन निर्णयानुसार, ३१ मार्च, २०२५ पर्यंत ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाली आहेत, ते खटले आता मागे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी, शासनाने ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत दोषारोपपत्रे दाखल झालेल्या खटल्यांसाठी हे धोरण लागू केले होते. मात्र, ती मुदत संपल्याने आणि त्यानंतरही काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाल्याने, खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भात, गृह विभागाने यापूर्वी २० सप्टेंबर, २०२२, १० नोव्हेंबर, २०२२, १४ सप्टेंबर, २०२३, १२ फेब्रुवारी, २०२४,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी आर्थिक व्यवहारापोटी दिलेला धनादेश न वटता परत आल्याने यासंदर्भात दाखल खटल्यात संगमनेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मच्छिंद्र सदाशिव नवले याला दोन महिन्यांचा साधा कारावास आणि फिर्यादीला दंडाच्या रकमेसह ३७ लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. रमेश रंगनाथ सातपुते हे हवाई दलातून निवृत्त झालेले अधिकारी असून, सध्या ते संगमनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नातेवाईक असलेल्या मच्छिंद्र सदाशिव नवले यांनी गाळा आणि शेती घेण्यासाठी सातपुते यांच्याकडून सुरुवातीला १६ लाख रुपये आणि नंतर १९ लाख रुपये असे एकूण ३५ लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम सन २०२१ मध्ये घेण्यात आली होती आणि ती २८ फेब्रुवारी २०२२ रोजी परत…

Read More

शुक्रवार २० जून – अहिल्यानगर:  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (शुक्रवारी) केलेल्या यशस्वी कारवाईत राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७) यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून त्यांच्या बाजूने अहवाल पाठवण्यासाठी मुंडे यांनी ही लाच मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. राहुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. तक्रारदार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावरील दोषारोप पत्राचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठवणे अपेक्षित होते. हा अहवाल तक्रारदारांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी स्वतः दहा हजार रुपयांची लाच मागितली आणि आज…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर पुन्हा गुन्हा केल्याने आरोपीला अटक करून ताब्यात घेण्याचे आदेश मिळण्याबाबत केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आंबी खालसा (संगमनेर) येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा, धर्मांतर घडवून आणल्याचा व अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य सहआरोपी युसुफ चौघुले यास यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, यानंतर त्याला मध्यप्रदेशमध्ये ६ गावठी कट्टे व ४ जिवंत काडतुसांसह पकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा गंभीर स्वरूपाचे आरोप वाढले होते. दरम्यान घारगाव पोलीस स्टेशन मार्फत सरकार पक्षातर्फे संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर…

Read More

शुक्रवार 20 जून:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावच्या आकाशवाणी चौक परिसरात दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असून, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय वराडे (रा. जळगाव) असे या व्यक्तीचे नाव आहे, तो एक ठेकेदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचा ताफा आकाशवाणी चौकातून जात असताना, वराडे यांनी अचानक ताफ्यासमोर येत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान…

Read More

गुरुवार 19 जून –  पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे सिगारेट ओढू नको असे सांगितल्याने एका 24 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. रोहिदास काळुराम काटकर (वय 24, रा. कादवे, ता. वेल्हे, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश उत्तम जोगदंड (वय 21), उमेश ऊर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय 21), पांडुरंग भानुदास सोनवणे (वय 19), आकाश सुभाष भिसे (वय 21), आणि भागवत मुंजाजी आसुरी (वय 20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानशेत येथील नंदाबाई कुंभार मावशीच्या हॉटेलसमोर पाच जणांचे एक टोळके सिगारेट ओढत उभे होते. त्यावेळी…

Read More

गुरुवार १९ जून, – अकोले:  मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय झाल्यामुळे अकोले तालुक्यात उत्साहाचं वातावरण आहे. तालुक्यात मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, बुधवारी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे, आंबीत धरणानंतर आता मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण आज (गुरुवारी) पहाटे साडेपाच वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे.  पिंपळगाव खांड धरणातून पाण्याचा प्रवाह आता मुळा धरणाकडे वेगाने झेपावला आहे. मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. या जोरदार पावसामुळे मुळा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ६०० दशलक्ष घनफूट (दलघफू) क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण पूर्ण भरल्याने…

Read More

अहिल्यानगर, प्रतिनिधी:  एका विवाहितेवर घरात घुसून चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी (१७ जून) सकाळच्या सुमारास घडली. पीडित विवाहितेवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पीडितेने बुधवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, चार अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. यातील एका संशयिताने विवाहितेच्या तोंडात कापडी बोळा कोंबला होता. त्यानंतर इतर तिघांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक अत्याचार केला. सध्या पीडितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदविण्यात आला असून…

Read More