Author: अनंत पांगारकर
संगमनेर – प्रतिनिधी बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे खंडणी प्रकरणातील आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक, संगमनेर) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक, संगमनेर) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी खंडणी प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व यामुळे त्यांचे वैवाहिक जिवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखिल तिघा जणांनी त्यांचे जुने…
संगमनेर दि. १३ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्याच्या तहसील कार्यालयाचे विभाजन करून आश्वी बुद्रुक येथे नवे अपर तहसील कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. अनेक गावांसाठी गैरसोयीचा असलेला हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी मागणी होऊन देखील सरकार जर ऐकणार नसेल तर सरकार विरोधात जन आंदोलन उभे करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रस्तावित असलेल्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात अनेक ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतर देखील या प्रस्तावात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाही. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार पूर्वीचाच प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रभावित गावातील नागरिक व जेष्ठ विधीज्ञांची बैठक माजी…
विशेष प्रतिनिधी / प्रवीण पुरो मुंबई – ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही. निधी पाहिजे, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही, असा दम आणि आगाऊपणाची भाषा राज्याचे वादग्रस्त मंत्री नितेश राणे यांनी वापरली आहे. नितेश राणे यांच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे का? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्या विधानावरून उपस्थित केला आहे. भाजपच्या ओरोस मंडलचा कार्यकर्ता मेळावा ओरोस येथे भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री…
विशेष प्रतिनिधी / मुंबई अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईने संकटात सापडलेले शिवसेनेचे कोकणचे कट्टर सैनिक राजन साळवी यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकला. मात्र हे करताना त्यांनी एसीबी कारवाईविषयी ब्र न काढता पक्ष सोडण्याला विनायक राऊत कारणीभूत असल्याचं सांगत आपली कातडी वाचवली आहे. सुमारे चार कोटीच्या बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचं निमित्त करत एसीबीने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवरही कारवाईची टांगती तलवार उगारली होती. एकीकडे बेहिशेबी मालमत्तेचं प्रकरण डोक्यावर असताना विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच त्यांनी बुधवारी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत ठाकरेंची…
अहिल्यानगर दि. १३ – अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अहिल्यानगर, दि. १३ – शिर्डी शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या नगर-मनमाड रोडवरील वाढत्या ट्रॅफिकमुळे आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि शहरातील नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अतुल चोरमारे यांनी शिर्डी शहरातील अवजड व तत्सम वाहतूक दि. ११ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२५ या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. लक्ष्मीनगर टी पॉईंट, अहिल्यानगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) ते आर.बी.एल. बँक चौक, नगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) जाणारी अवजड वाहतूक हॉटेल ऋषिकेश, १८ मीटर रिंगरोड ते आर.बी.एल. बँक चौक १८ मीटर रिंगरोड या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. नगर-मनमाड हायवे (पश्चिम बाजू)…
संगमनेर, दिनांक १३ – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच ठेवण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली असून, या संदर्भात दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथील लोकसभा सचिवालय येथे भेट घेतली. या भेटीत सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. रेल्वेमंत्री यांनी संगमनेर मार्गेच हा रेल्वे मार्ग जाईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. आमदार खताळ यांनी या भेटीत रेल्वे मंत्र्यांना पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच जावा याबाबतचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रात त्यांनी या मार्गाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या…
संगमनेर – दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढणाऱ्या आरोपी अकबर युनूस शेख याच्या गावात पीडितेला न्याय मिळावा तसेच जिहादी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी आरोपीच्या पुतळ्याचे दहन केले. अनुसूचित जातीच्या एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शेजारीच राहणाऱ्या आरोपी अकबर युनूस शेख याने घराच्या छतावर जाऊन, पीडित मुलगी आंघोळ करत असतानाचा व्हिडिओ काढल्याचे घटना मंगळवारी घडली होती. आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन पीडितेला याची जाणीव होताच तिने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी घरात असलेले आई-वडील धावत मुलीकडे आले. त्यावेळी या प्रकाराचा उलगडा झाला. परंतु घटनेनंतर गावातील काही बड्या नेत्यांनी सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र…
अहिल्यानगर, दि. १२ फेब्रुवारी – संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूलच्या पथकावर झालेल्या हल्ला प्रकरणातील दोघा मुख्य आरोपींना पकडण्यात आहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींना पकडून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विशाल हौशीराम खेमनर (वय ३३, रा. अंभोरे, ता. संगमनेर) व सागर गोरक्षनाथ जगताप (रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी पकडलेल्या दोघा आरोपींची नावे आहे. हे दोघेही प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जाते. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाचे रात्रगस्तीपथक रविवारी रात्री प्रवरा नदीपात्रात कनोली येथे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. येथे पथकाला जेसीबीच्या सहाय्याने वाळू…
संगमनेर, दि. ११ फेब्रुवारी – वारकरी परंपरेचे सामाजिक समतेसाठी मोठे योगदान राहिले आहे. वारकरी संतांचे कार्य सामाजिक जडणघडणीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. खऱ्या अर्थाने वारकरी धर्माने मराठी मनाची मशागत केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. साहित्यिक पठारे यांच्या हस्ते ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित ‘होय होय वारकरी’, व डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्या संत एकनाथ महाराजांवरील विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. संगमनेर तालुका वारकरी संघटना, श्री विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज आणि सांदिपनी गुरुकुल, घुलेवाडी यांच्यावतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाच्या जनसखा भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…
