Author: अनंत पांगारकर

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचीत्यावर शिवसेनेचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि आमदार या मेळाव्याला उपस्थित राहतील, असं कदम यांनी म्हटलं आहे. शिंदे गटाच्या या मागणीमुळे पुन्हा एकदा शिंदे व ठाकरे गटामधील वाद उफाळून येण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले आमदार प्रसाद लाड यांनी नोव्हेंबर २०२२…

Read More

संगमनेर – संक्रांतीच्या पूर्वसंध्येला प्राण घातक ठरू शकणाऱ्या नायलॉन मांजा विक्रेत्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई करत सुमारे साडेसात हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितास इजा होण्याची शक्यता असल्याने याची जाणीव असताना देखील संगमनेरमध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मिळाली होते. त्यांनी आपल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके, महिला पोलीस कॉन्स्टेबल ताई शिंदे यांना संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले. पथकाने बाजारपेठेतील गृह वस्तू भंडाराजवळील तेली खुंट परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता तेथे जहीर रऊप…

Read More

नाशिक – प्रियकर आणि त्याच्या पत्नीच्या जाचाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी संगमनेरमधील पती-पत्नी विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहित महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुक्यातील लोहारे मिरपूर येथील संशयित पती-पत्नी विरोधात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व संशयित एकाच गावातील रहिवासी असून नाशिक रोड येथील बनकर मळा भागात राहणाऱ्या अर्चना प्रविण गोरे (२८) या विवाहीतेने शनिवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली होती. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप फिर्यादी भावाने केला असून पती-पत्नीच्या जाचास कंटाळून आपल्या बहिणीने आत्महत्या…

Read More

मुंबई, दि. १३ – दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे ॲग्रो हब मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभे करावेत. या ठिकाणी सर्व-सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ॲग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करा. पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करा. शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व…

Read More

बीड – बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटून देखील पोलीस तपासा संदर्भात माहिती देत नसल्याचा गंभीर आरोप करत देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत न्यायासाठी आक्रोश केला. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यावर बांगड्या फेकल्या. आंदोलनावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या आंदोलनात गावातील महिला सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. आंदोलनातील महिलांनी मुख्य आरोपी अजूनही मोकाट कसा? त्याला खुनाच्या कलमाखाली अटक का करण्यात आली नाही? असा संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करत महिलांनी एसपी गावात यांच्यावर बांगड्या फेकत देशमुख हत्याकांड…

Read More

संगमनेर – शेतकऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळावी, फॉरेस्ट व गायरान जमिनीचे अतिक्रमित पट्टे अतिक्रमणदारांना कायम करण्यात यावे, वाढीव लाईट विलासह महत्त्वाच्या प्रश्नांवर लढा उभारण्याचा निर्णय कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. शनिवारी (११ जानेवारी) संगमनेरमध्ये शताब्दी वर्षानिमित्ताने संगमनेर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शेतकऱ्यांसह सामान्यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारी धोरणाविरोधात व इतर मागण्यांसाठी निर्णय घेण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अँड. सुभाष लांडे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड डॉ. बन्सी सातपुते यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉम्रेड भिका वाघ, कॉम्रेड अशोक डुबे, कॉम्रेड सयाजी कानवडे, कॉम्रेड लहानू हासे, कॉम्रेड बापू कानवडे, कॉम्रेड दशरथ हासे,…

Read More

नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल तेरा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता हा अपघात घडला. अपघातातील मृत आणि जखमी निफाड तालुक्यातील धारणगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला. दरम्यान अपघातातील मृत आणि जखमींची काही नावे समोर आली आहे… मृतांची नावे …

Read More

शिर्डी – विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यात होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे. तो निर्णय आल्यानंतर या निवडणुका होतील. विधानसभेत विजय मिळवला, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतसुद्धा विजय मिळवायचा आहे, असे फडणवीस म्हणाले. ‘श्रद्धा आणि सबुरी’चा मंत्र भाजपसाठी महत्वाचा आहे. ज्यांना ‘श्रद्धा आणि सबुरी’चा अर्थ समजला नाही त्यांची हालत बुरी झाली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपला विजय मिळाला असल्याचे म्हणत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी…

Read More

शिर्डी : शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते, त्याला २० फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले आहे. तर उद्धव ठाकरेंनी आपल्याशी द्रोह केला होता. २०१९ ला बाळासाहेबांची विचारधारा सोडली, त्यांना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर केला. शिर्डी येथे रविवारी भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी आक्रमक भाषण करीत विरोधकांना लक्ष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा दिला. विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली…

Read More

संगमनेर – छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचा विचार घेऊन या परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी कार्य केले आहे. सहकार व शेती क्षेत्रातील त्यांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान देणारे असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी काढले आहे. यशोधन जवळील मैदानात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ पत्रकार…

Read More