Author: अनंत पांगारकर
संगमनेर दि.१४ – प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जनतेला हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्यामुळेच भारताच्या संविधानाचा संपूर्ण जगात होणारा गौरव सर्वांना अभिमानास्पद आहे. देशामध्ये संविधान दिन सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेच्या पवित्र ग्रंथाचे महत्व अधोरेखित केले असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी खुर्द येथे समता युवा संघटनेच्यावतीने तसेच लोणी बुद्रुक येथे जनसेवा युवा प्रतिष्ठाणच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहीक वाचन करण्यात आले. संविधान…
संगमनेर, प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेतील समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या तत्वांचे जतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी. आर. कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विभूतींनी जगाला शांतता आणि समतेचा संदेश दिला. त्यांनी सर्व संत आणि समाजसुधारकांच्या विचारांना एकत्र…
नाशिक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एका २३ वर्षीय तरुणाचा डीजेच्या कर्कश आवाजामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. नितीन रणशिंगे असे मृत तरुणाचे नाव असून तो फुलेनगर, पेठ रोड येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आज आंबेडकर जयंती असल्याने शहरात विविध ठिकाणी मिरवणुका निघाल्या होत्या. नितीन देखील एका मिरवणुकीत सहभागी झाला होता. दरम्यान, डीजेचा आवाज असह्य झाल्याने तो अचानक कोसळला. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळल्यानंतर त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव सुरू झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीनला क्षयरोगाचा त्रास असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याचा…
शिर्डी – शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडात गंभीर जखमी झालेल्या साखरबाई साहेबराव भोसले (वय अंदाजे ६०) यांचा रविवारी (दि. १३ एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा बळी गेला आहे. या दुर्दैवी घटनेत ५ एप्रिल रोजी चोरट्यांनी साहेबराव पोपट भोसले (वय अंदाजे ६५) आणि त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय अंदाजे ३०) यांची हत्या केली होती. त्यावेळी साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या मारेकऱ्यांनी केलेल्या या क्रूर कृत्यामुळे भोसले कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. वडील आणि मुलाचा दशक्रिया…
संगमनेर, दि. १३ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १३३ उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून एका अर्जावरील प्रलंबित निर्णय आता मंगळवारी (दि. १५) होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार छाननी शुक्रवारी (दि. ११) पार पडली. परंतु चार अर्जांवर हरकती आल्यामुळे त्या सदर्भात निर्णय घेण्यात आला असून एका उमेदवाराच्या अर्जावरील निर्णय प्रलंबित असल्याने तो मंगळवारी दिला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. थोरात कारखान्याच्या निवडणुकीतून विरोधकांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत एकूण १३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुरू केलेलं मराठीसाठीचं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर स्वत:च मागे घेतलं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून मराठी तरुणांची राज्यात होत असलेली घुसमट लक्षात घेता असं आंदोलन सुरू होणं ही आता काळ्या दगडावरची रेघ बनली आहे. राज्यात कायद्याचं राज्य राखणं ही दुय्यम बाब बनली आहे. बिहारसारख्या राज्यात निवडणुका असल्याने कायद्याहून निवडणुका जिंकण्याला महत्व अधिक. यामुळे कोणत्याही कारणासाठी महाराष्ट्रात प्रांतीय आंदोलनाची सत्तेला अपेक्षा नाही. यातूनच मुख्यमंत्र्यांनी आंदोलन थांबवण्याचं आवाहन राज यांना केलं आणि राज यांनी ते थांबवलंही. गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मराठी मोहीम सुरू करण्याची हाक दिली होती. मराठी बोलण्यास नकार देणार्यांना थपडेचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक, दि.१२ एप्रिल – नाशिक जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश आर.आर. राठी यांची तडकाफडकी पदमुक्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई झाली असून, जिल्हा सत्र न्यायाधीश न्या. जगमलानी यांनी यापूर्वी या प्रकरणाची चौकशी केली होती. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि.११ एप्रिल) सकाळी जिल्हा न्यायालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले आणि न्यायाधीश राठी यांनी सकाळी १० वाजता कार्यालयात नियमितपणे हजेरी लावली. त्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर, त्यांची प्रमुख जिल्हा न्यायाधीशांशी (Principal District Judge) काही वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांना बदलीचे पत्र देण्यात आले. दरम्यान राठी यांच्या संदर्भात न्यायालयीन कामकाजात काही…
संगमनेर, दि.१२ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित रथाच्या मिरवणुकीत एक ब्रिटिशकालीन अनोखी परंपरा पाहायला मिळाली. परंपरेनुसार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणलेला मानाचा ध्वज रथावर लावण्यात आला. त्यानंतर महिलांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात हनुमान रथाचा दोर धरून ओढण्यास सुरुवात केली. या मिरवणुकीत संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही सहभाग घेतला होता. महिलांनी रथ ओढल्यानंतर काही वेळातच मिरवणुकीत सहभागी असलेल्या ढोल पथकाला रथापुढे ढोल वाजविण्यापासून रोखत रथ पुढे नेण्याचा प्रयत्न झाल्याने निर्माण झालेल्या वादामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले. हिंदू राजा प्रतिष्ठानच्या ढोल पथकातील कार्यकर्ते आणि मिरवणूक आयोजक कार्यकर्त्यांमध्ये…
घारगाव (संगमनेर) – संगमनेर तालुक्यातील घारगाव भागातील एका गावात शुक्रवारी (दि. ११) एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती ‘उडान हेल्पलाईन’ आणि सजग नागरिकांकडून मिळाल्यानंतर घारगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. ‘स्नेहालय’च्या ‘उडान’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत स्थानिक प्रशासन, पंचायत समिती पदाधिकारी व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर कुटुंबीयांची ‘लग्नाची घाई नाही, मुलगी बालग्राममध्ये सुरक्षित आहे, त्यामुळे गैरसमज झाला आहे,’ अशी भूमिका घेत दिशाभूल करण्याचा…
मुंबई : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने तातडीने १२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीमुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात उर्वरित वेतन मंगळवारी जमा होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा केवळ ५६ टक्के भागच जमा झाला होता. यामुळे कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, पूर्ण वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने मंत्रालयात वित्त सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एसटी महामंडळाच्या विविध सवलतींच्या बदल्यात शासनाकडून येणे असलेले १०७६ कोटी रुपये त्वरित…
