Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर दि. १० – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे आणि यश संपादन करावे, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. ‘आनंददायी परीक्षा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. बालपणापासून केलेल्या शिक्षण साधनेची ही परीक्षा असून अशा महत्त्वाच्या प्रसंगी आई-वडिल, शिक्षक आणि राज्यशासनही विद्यार्थ्यांसोबत असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जिल्हाधिकारी म्हणतात, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी लेखनातील मुद्देसूदपणा, एकाग्रता आणि अभ्यासातील सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर परीक्षा आनंददायी बनवावी. आवृत्ती, पाठांतर आणि अखंड स्मरणाच्या आधारे परीक्षेला सोपे करून घ्यावे. प्रत्येक विषयाच्या परीक्षेला सामारे जातांना…
सोमवार दि. १० फेब्रुवारी – वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या नामांकित डॉक्टरच्या पत्नीने राहत्या घरात आतून दरवाजा लावून घेत छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये घडला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी डॉ. सुशील कबाडी यांच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सायली सुशील कबाडी (वय ३३, रा. सिद्धिविनायक कॉलनी, शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर पत्नीचे नाव आहे. यासंदर्भात सायली कबाडी यांचे वडील चंद्रकांत हरिश्चंद्र परब यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून डॉ. सुशील जगन्नाथ कबाडी, सासरा व सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
सोमवार, दि. १० फेब्रुवारी – घरकुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विटा बनविण्याकरिता गावानजीकच्या नाल्यातून माती उत्खनन करणाऱ्या तक्रारदाराच्या नातेवाईकाचा ट्रॅक्टर, मजूर आणि तक्रारदारावर वनविभागाच्या वनपालाने गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखवत मातीसाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टर घेऊन गेला. प्रकरण मिटविण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तसेच लाचलुचपतच्या कारवाई दरम्यान प्रकरण मिटविण्यासाठी दुसऱ्या वनरक्षकाने ३५ हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तिघांवर लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी ममता नामदेव राठोड, वनपाल मारुती संभाजी गायकवाड आणि वनरक्षक गणेश उत्तम राठोड अशी कारवाई करण्यात आलेल्या तिघा लोकसेवक आरोपींची नावे आहे. एकाच वेळी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्गम…
सोमवार, दि. १० फेब्रुवारी – प्रतिनिधी या-ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असलेल्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नासिक-पुणे मार्गावर लुटमारीचा नवा प्रकार समोर आला आहे. ट्रक चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत शेतीसाठी असलेल्या औषधांचे ५ लाख १२ हजार २१४ रुपयांचे १८१ बॉक्स आणि बॅग ट्रकमधून अज्ञात दोघे अनोळखी व्यक्तींनी पळविले आहेत. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील माहुली घाटामध्ये गेल्या आठवड्यात ही घटना घडली असून ट्रक चालकाच्या तोंडाला रुमाल लावून त्याला बेशुद्ध करून पिस्तूलचा वापर करीत लुटमार केल्याची घटना घडली. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीलगत पुणे जिल्ह्याचे सीमा असल्याने अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे या परिसरात मोठी वर्दळ असते. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे या प्रकरणामुळे…
अनंत पांगारकर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय साम्राज्याला हादरा देत संगमनेरकरांच्या लोकप्रतिनिधीपदी आरूढ झालेले नवे आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरात मोठा गाजावाजा करत अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. मात्र या मोहिमेला काही तास उलटत नाही तोच हटविलेली अतिक्रमणे पुन्हा जैसे थे होऊ लागली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी समाज माध्यमात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेले अमोल खताळ हेच शहराला, अधिकाऱ्यांना, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना वठणीवर आणू शकतात, असे सांगत माजी मंत्री माजी आमदार थोरात यांच्या नावाने खडे फोडत सोशल मीडियावरील अति उत्साही समर्थकांनी रंगविलेले चित्र फक्त समाज माध्यमात चघळण्याचा विषय ठरले आहे. संगमनेर शहरात नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग,…
संगमनेर, ९ फेब्रुवारी – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरात शिवसेना-महायुतीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या सेवेचा वारसा पुढे न्यावा आणि पक्षाचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदतीचा हात म्हणून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, असा उद्देश होता. शिवसेनेचे खरे बळ म्हणजे पक्षासाठी अखंड निष्ठा…
अहिल्यानगर, दि. ०९ फेब्रुवारी दूध डेअरीची १७ लाखाची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना फिर्यादीला लुटणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी तब्बल २ महिन्यानंतर जेरबंद करण्यात अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ऋषीकेश उर्फ पप्पु अनिल कुसळकर (वय २१, रा. राजलक्ष्मी निवास, बाळकृष्ण नगर, पेठ रोड, पंचवटी नाशिक) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पकडलेल्या आरोपीला राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास राहुरी पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली. फिर्यादी अनिल मुरलीधर बनसोडे (वय ५१, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) हे दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी मुळा अँग्रो प्रोडक्ट लि. ब्राम्हणी, ता. राहुरी या कंपनीची १७ लाख रुपयांची…
शिर्डी, रविवार दि. ०९ – सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व राज्य शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार काशीनाथ दाते, सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष उदय जोशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फिडरेशन…
संगमनेर, दि. ०९ फेब्रुवारी – लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून संगमनेर तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनेकरिता सुमारे ८०० कोटी रुपये निधी मंजूर करून काम सुरू केले. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय हेतू ठेवून अनेक कामे बंद पडली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असून चंदनापुरी, झोळे व हिवरगाव पावसा जलजीवन योजनेतील पाणीपुरवठा योजनेचे बंद असलेले काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सरपंच भाऊराव राहणे यांनी केली असून तातडीने काम न सुरू झाल्यास आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत चंदनापुरीचे सरपंच भाऊराव राहणे, यांनी ज्येष्ठ नेते आर. बी. राहणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन…
रविवार, दि. ९ फेब्रुवारी – दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तळीरामाला पुण्याच्या शिवाजीनगर मोटर वाहन न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. ३ ऑगस्ट २०२४ रोजी कोथरुड वाहतूक विभागाने रब्बीन रमजान शेख (वय २९, रा. जनवाडी, पुणे) याच्या विरोधात दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये खटला दाखल केला होता. बुधवारी (५ फेब्रुवारी) या खटल्याचा शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयातील न्यायाधीश बिराजदार यांनी निवाडा केला. न्यायालयाने शेख याला ५ दिवसांची साधी कैद आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
