Author: अनंत पांगारकर
अनंत पांगारकर संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी – संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन व विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ एक कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा खोटी ठरली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या संबंधीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे ही बाब उघड झाली. तांबे यांनी बैठकीत घोषणा केल्याप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने एक कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी तांबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असा निधी देता येत नाही त्यावर…
मुंबई दि. ०४ फेब्रुवारी – विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने निवडणुकीच्या काही महिने आधी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेची घोषणा करत या योजनेचा बहिणींना लाभ देणे सुरू केले होते. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे या योजनेचं मोठ योगदान असल्याचं सांगितलं जातं. मात्र सत्तेमध्ये येतात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचं आता सरकारला वाटत आहे. तशा तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडल्याचं सांगितलं जातं. तो कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली…
कोल्हार (ता. राहाता) येथे जनसेवा फाउंडेशनच्यावतीने संक्रांतीनिमित्त खास महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व धनश्री विखे यांचा सहपत्नीक ग्लॅमरस रॅम्प वॉक, ज्याने उपस्थितांना विशेष आनंद दिला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण विषयक चर्चा तसेच पारंपरिक पोशाखातील रॅम्प वॉकने कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. विखे पाटील दांपत्याने उपस्थित महिलांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत महिलांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि महिला सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
अहिल्यानगर दि. ०४ – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जाहीर केल्याप्रमाणे पुतळ्यासाठी तातडीने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तांबे यांनी समितीच्या बैठकीत केली असता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी समितीच्या माध्यमातून अशा प्रकारचा निधी देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या संदर्भात काय उपाययोजना करता येऊ शकते यासाठी सरकारकडे देखील मार्गदर्शन मागविल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संगमनेर मध्ये बस स्थानकाच्या जागेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय सध्या राजकारणात अडकल्याचे दिसत आहे. नुकत्याच पालकमंत्री राधाकृष्ण…
मुंबई, दि.३ : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. महायुती सरकार जुन्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभालीकरीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मृद व जलसंधारण विभाग आणि संबंधित विविध संस्था आणि संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सचिव गणेश पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव अश्विनी भिडे, नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, टाटा मोटर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जुने आणि अर्धवट राहिलेले जलसंधारणाचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची योजना मांडली आहे.…
मुंबई, दि. ०३ : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे), सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अखिल…
संगमनेर दि. ३ फेब्रुवारी : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तोडलेली झाडे, वन्यजीव यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हा्वेस्टिंग ही कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे व त्यानंतर ४ महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करावे असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले आहेत. या मार्गावर ३९,५०० वृक्षांची लागवड होणार असून त्याचे पाच वर्षांसाठी संगोपन देखील ठेकेदार करणार आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २०१४ साली उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांनी पुणे-नाशिक रस्त्याच्या…
शिर्डी दि. ३ फेब्रुवारी – शिर्डीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचे प्रमाण खूप वाढले आहे. आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तासाच्या आत शिर्डीत साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घृणपणे संपवल्याची घटना घडली आहे. तर तिसऱ्या घटनेतील गंभीर जखमी असलेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोमवारी पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याने साईबाबांची शिर्डी या गुन्हेगारी कृत्यामुळे हादरून गेली आहे. या घटनेत सुभाष साहेबराव घोडे, नितीन कृष्णा शेजुळ या दोन साई संस्थान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर…
अहिल्यानगर दि. ३ फेब्रुवारी – महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत घालणं दोन पैलवानांना चांगलेच महागात पडलं आहे. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर कुस्ती परिषदेकडून कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली. शिवराज राक्षेने पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ देखील मारली. हेच कृत्य शिवराज राक्षेला महागात पडलं ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारत शिवीगाळ केली. यानंतर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – शनिवारी सायंकाळी वॉकिंग करून घराकडे परतणाऱ्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दागिने चोरांचा तपास लावण्यात संगमनेर पोलीस अपयशी ठरल्याने चोरांची मजल वाढली असून आता चोरटे दिवसाढवळ्या गुन्हे करू लागले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात शनिवारी रात्री संबंधित महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस स्थानकासह शहराच्या विविध भागात दागिने चोर, घरफोड्या करणाऱ्यांनी, दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला आहे. या चोरट्यांना पकडण्यात संगमनेर पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने गुन्हेगार…
