Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वाळू तस्करी करणारा डंपर पकडल्यानंतर त्याची माहिती मिळूनदेखील कारवाई न करता उलट तस्करांबरोबर संधान साधणाऱ्या धांदरफळचे तलाठी मुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनसेवा समता युवक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव वलवे यांनी करताच प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने वलवे यांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार अमोल निकम यांना तलाठी मुळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना यासंदर्भात वलवे यांनी शुक्रवारी एक निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले की, वलवे गुरुवारी सायंकाळी त्यांच्या गावी जात होते. यावेळी ६ वाजून ४० मिनीटांनी त्यांना भोकनळ वस्तीपासून धांदरफळकडे वाळू तस्करी करणारा एक डंपर जातांना दिसला. त्यांनी याची माहिती प्रांताधिकारी डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क किरकोळ भांडणातून सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याचा प्रकार नासिकमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जामीनावर हा आरोपी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. अक्षय उत्तम जाधव असे होऊन झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान अंबड परिसरातील महालक्ष्मी नगरमध्ये किरकोळ भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमध्ये नाशिक पोलिसांनी तन्मय मनोज गोसावी आणि आकाश अनिल साळुंखे या दोघा संशयतांना सापळा रचून अटक केली आहे. तर मृत अक्षय उत्तम जाधव याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, शासकीय नोकऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यांसारखे १५ गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर अंबड…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्य सरकारने मोठा गाजावाजा केलेल्या सर्वात मोठ्या पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून या बहुचर्चित पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४९५६ पदांसाठी ही भरती होणार होती. आता या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात ही भरती थांबविण्यात आली असली तरी ती निश्चित केव्हा होणार याबाबत अनिश्चितता आहे. भरती संदर्भातील निर्णय सरकार पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झाली नव्हती. त्यामुळे अनेक इच्छुक तरुणांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री असताना ज्यांनी ”मातोश्री”चा उंबरठा ओलांडला नाही ते उद्धव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याची नाटके करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकटातील शेतकऱ्यांना किती मदत दिली याचा हिशोब द्यावा आणि मगच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नगर (उत्तर) जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हुशार आहे. ती उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाला बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गोंदकर यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना घरकोंबडा मुख्यमंत्री अशी पदवी जनतेने दिली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना अनेकदा अतिवृष्टी , गारपीट यासारख्या संकटांना तोंड द्यावे…
उपजिल्हाप्रमुख पदी मुजीब शेख; शिर्डी लोकसभा जिल्हा संघटक आप्पा केसेकर; तालुका प्रमुखपदी भाऊसाहेब हासे यांच्या निवडी जाहीर महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांची पाचव्यांदा तर उपनगर शहर प्रमुखपदी प्रसाद पवार यांची दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उप जिल्हा प्रमुखपदी मुजीब शेख, शिर्डी लोकसभा जिल्हा संघटक आप्पा केसेकर, तालुका प्रमुखपदी भाऊसाहेब हासे यांच्या देखील निवडी जाहीर झाल्या आहेत. संगमनेरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी बदलण्यासाठी अंतर्गत वारे वाहत होते. यासाठी अनेकांनी देव पाण्यात टाकले, मात्र नव्या निवडी जाहीर झाल्याने या सर्वांच्या पदरी निराशा पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेत राहून देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्याशी सलगी ठेवणाऱ्या तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांची तालुकाध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली आहे. आहेर यांच्या जागेवर उपजिल्हाप्रमुख असलेल्या भाऊसाहेब हासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून एक मोठा गट घेऊन बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाले. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने हा लढा थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव देखील तात्पुरत्या स्वरूपात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठविले गेल्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते देखील दोन गटात विभागले गेले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय सैन्य दलाच्या तोफखाना केंद्राच्या २८५ मिडीयम रेजिमेंटचे लान्सनायक आणि नाशिकचे भूमिपुत्र संतोष विश्वनाथ गायकवाड यांना आसाममध्ये वीरमरण आले आहे. सर्वत्र दीपावलीचा सण उत्साहात व आनंदात साजरा होत असताना गायकवाड कुटुंबीयांसह नाशिकवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकवाड यांचे पार्थिव नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात रात्री बारा वाजेपर्यंत येण्याची शक्यता लष्कराने वर्तवली आहे. शहीद गायकवाड यांच्या लहवित गावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वीरमरण आलेले गायकवाड सिक्कीमच्या उत्तरेला आसाम राज्यातील होजाई जिल्ह्यात लंका शहराजवळ बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असताना रक्त गोठविणाऱ्या थंडीमुळे त्यांना अचानक मेंदूमध्ये त्रास झाला. त्यांना रेजिमेंट कडून तात्काळ कोलकत्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाभारताचे युद्ध पांडवांनी जिंकले याचे कारण त्यांचा सल्लागार कृष्ण होता. आपल्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनासाठी आणि आपले ध्येय प्राप्त करण्याकरता तज्ज्ञ सल्लागार असेल तरच ते ध्येय साध्य होईल, असे प्रतिपादन आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले. येथील औद्योगिक वसाहतीमधील सह्याद्री ऍग्रोव्हेेटतर्फे कामगारांच्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शन मेळावा म्हणून ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ हा उपक्रम राबवण्यात आला. त्यावेळी कडलग बोलत होते. अध्यक्षस्थानी सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे होते. व्यासपीठावर धनश्री हासे, टीव्ही अभिनेते सुरेश डोंगरे आदी उपस्थित होते. कडलग म्हणाले, जीवनामध्ये सल्लागाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या जीवनात मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न, आपली सेवानिवृत्ती आणि जीवनामधील अल्पकालीन व दीर्घकालीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान तक्रारदारा विरोधात आणखी गुन्हे दाखल आहेत का याची चौकशी करून न्यायालयात अहवाल देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश अनंतराव पाटील यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पाटील यांच्या विरोधात नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील तक्रारदाराविरोधात २०२० मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.न्यायालयाने या तक्रारदारा विरोधात आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिविक्षा अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शहरालगतच्या समनापुर बायपासवर शहर पोलिसांनी एका संशयास्पद टेम्पोमधून सुमारे दोन लाखाचे गोमांस ताब्यात घेतले आहे. टेम्पो आणि गोमांस असा सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून ऐन दिवाळीतही शहरातील कत्तलखाने सर्रासपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संगमनेरातील गोहत्या थांबणार कधी? असा प्रश्न गो प्रेमींनी उपस्थित केला आहे. गोवंश कत्तलीचे संगमनेर हे राज्यातील सर्वाधिक मोठे केंद्र म्हणून समोर येत आहे येथील बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये सर्रासपणे जनावरांचे हत्या करून त्यांचे मांस राज्यासह देशाच्या विविध भागात पाठविले जाते. वारंवार होणाऱ्या पोलिसांच्या कारवाया आणि यातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात हाती लागणारा मुद्देमाल, यामुळे येथील कत्तलखाण्याची महती लक्षात येते.…
