Author: अनंत पांगारकर

सोमवार, १४ ऑक्टोबर मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही तास बाकी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड-एलबीएस, आनंदनगर या टोल नाक्यांवर ही माफी देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातून येणाऱ्या हलक्या मोटर वाहनांना या पाचही टोल नाक्यांवर संपूर्ण टोलमाफी मिळणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारकडून मोठे निर्णय घेतले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला…

Read More

बाळासाहेब थोरातांची शिर्डी विधानसभा मतदारसंघात साखर पेरणी, महाविकास आघाडीची ताकद वाढली सोमवार, १४ ऑक्टोबर संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मालुंजे या गावातील जनसेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ सोडत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा हात हाती घेतला आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप व विखे गटाला मोठे खिंडार पाडण्यात थोरात यशस्वी झाले आहे. अमृतवाहिनी सहकारी बँक येथे मालुंजे येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, शेतकी संघाचे संचालक संतोष नागरे, मार्केट कमिटीचे संचालक संजय खरात, युवक…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  सोमवार, दि. १४ ऑक्टोंबर मेष – शारीरिक थकावट वाटणार आहे. स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवा. नोकरीमध्ये कोणतेही बेकायदेशीर व्यवहार टाळा. व्यावसायिक कर्ज वसुली होईल. बँकेची महत्त्वाची कामे करून घ्या. वृषभ – व्यावसायिकांना उत्साहाच वातावरण असणार आहे. आर्थिक कोंडी फुटेल. तरुणांना नैराश्य घालवणारा दिवस. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनुकूल दिवस असणार आहे. प्रगती होईल. मिथुन – आहार-विहाराचे पथ्य पाळा, कोणाशी हुज्जत घालू नका. मालमत्ताविषयक निर्णय होतील, मात्र व्यवहार करताना ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला निश्चित घ्यावा. कागदपत्रे नियम अटी यांचा विचार नीट करा. कर्क – प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. साहित्यिक व पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींना चांगला दिवस आहे. नातेवाईक…

Read More

रविवार, १३ ऑक्टोंबर जे मनाला येईल ते सांगितले जाते. शब्द दिले जात आहे. फुकट पैसे दिले जात आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष पैसे वाटतील. कारण ते तुमचेच पैसे आहे. इथूनच लुटलेले पैसे आहेत, ते पैसे नक्की घ्या, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मते द्या. महाराष्ट्राची धुरा माझ्या हातात आली की हा महाराष्ट्र दिल्लीसमोर झूकणार नाही आणि तुटणार नाही. आपला अभिमान, स्वाभिमान आपणच जगावला पाहिजे. निवडणुकीनंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच विरोधी पक्षांवर टीका केली आहे.रविवारी ठाकरे गोरेगाव येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले. ठाकरे…

Read More

संगमनेर तालुका दादागिरी करत नाही आणि सहनही करणारही नाही… रविवार, १३ ऑक्टोंबर  सत्ता सामान्य माणसाच्या विकासासाठी असते मात्र याचा विसर पडलेली, सत्ता आणि पैशाच्या जीवावर राजकारण करणारी काही मंडळी सध्या आपल्या तालुक्यात फिरत आहे. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने राज्यभर फिरून काम करण्याऐवजी सध्याच्या महसूल मंत्र्यांचे कार्यक्षेत्र कनोली-मनोली-कनकापूर पुरतेच मर्यादित राहिले आहे, अशी टीका मंत्री विखे यांच्यावर करत संगमनेर तालुक्यात वाईट प्रवृत्ती येऊ देऊ नका, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील निमोण येथे आयोजित एका संस्थेच्या कार्यक्रमात थोरात बोलत होते. युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी,…

Read More

देशातील सव्यासाची उद्योगपती, देशाभिमानी रतन टाटा यांची दोनच दिवसांपूर्वी एक्झीट झाली. देशासाठी सारंकाही करण्याची उमेद असलेला टाटांसारखा उद्योगपती झाला नाही होणार नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया सर्वसामान्यांची आहे. तरूणांचं व्यासपीठ समजल्या जाणार्‍या सोशल मिडियावर नव्वदीतला हा उद्योगपती सामान्यांच्या सुख दु:खात सहभागी होतो. प्रचंड संपत्तीचा मालक असलेल्या या महायोग्याला श्रीमंतीचा माज नाही की प्रसिध्दीचा सोस. या महान उद्योगपतीची एका विशीतल्या तरुणाशी दोस्ती होणं हे कल्पनेबाहेरील सत्य आहे. हीच दोस्ती भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतीला सोशल मीडियावरचा स्टार बनवून गेली.  शंतनू नायडू हे त्या तरूण दोस्ताचं नाव. शंतनूनेच टाटांना सोशल मिडियाच्या जगाशी जोडलं. या तरुणाच्या आग्रहामुळेच टाटा अखेरच्या काही वर्षांत सोशल मीडियावर तरूणाईच्या गळ्यातील…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  रविवार, दि. १३ ऑक्टोंबर मेष – संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. नियमांचे पालन करा, वादविवादाचे प्रसंग टाळा. दुरचे नातेवाईक यांच्याशी संपर्कात राहाल. वृषभ – आपण घेत असलेल्या परिश्रमांचा मोबदला व्यवस्थित मिळेल, अपेक्षित यश मिळू शकते. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, मात्र रागावर नियंत्रण ठेवा. कोणालाही जामीन राहू नका. मिथुन – कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान प्राप्त होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल, आर्थिक बाजू सावरता येईल. विवाहेच्छुक व्यक्तींना जोडीदारांची साथ मिळण्याची शक्यता राहील. कर्क – इच्छित गोष्टी साध्य करता येतील. ग्रहांची साथ मिळणार असल्याने योजना कार्यान्वित होतील. आर्थिक बाजू…

Read More

शनिवार, १२ ऑक्टोंबर  अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण केली. प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन केले, त्यासाठी स्वतःची जमीन दिली. मात्र शेजारच्यांनी गुंठाभरही जमीन दिली नाही. आपल्याला नाव ठेवणाऱ्यांचे निळवंडे साठी कवडीचेही योगदान नसल्याचे स्पष्ट करत निळवंडेचे काम कोणी केले हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात तळेगाव दिघे येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. थोरात म्हणाले, निळवंडे धरणाचे पाणी खालच्याला द्यायचे तसे वरच्या नाही द्यायचे ही आपली भूमिका आहे. मध्यप्रदेश मधील हरिपुरासारखा पॅटर्न राबविण्याचा आपला प्रयत्न असून बोल घेवड्यांच्या मागे न राहता काम…

Read More

शनिवार, १२ ऑक्टोंबर १९८५ च्या निवडणुकीने संगमनेर तालुक्यात नव्या इतिहासाला सुरुवात झाली. तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली. सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका राज्यातील प्रगतशील तालुका बनला असून आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण इकडे येतील निवडणुकीमुळे मन्या दूषित करण्याचा प्रयत्न करतील परंतु अशांना वेळच रोखत राजकारणाचे चांगली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या हस्ते शनिवारी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या ऐतिहासिक शाळा गडावर विजयादशमीच्या दिवशी पारंपारिक वाद्य, सनई चौघडे, ढोल ताशांच्या गजरात, सूर आणि…

Read More

शनिवार १२ ऑक्टोंबर  मका तोडण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर अचानकपणे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ३५ वर्षीय महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी ऐन दसऱ्याच्या दिवशी शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या थोरात यांनी तात्काळ राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करत नरभक्षक बिबट्याला मारण्यासंदर्भात मागणी करत वन विभागाचा हलगर्जीपणा विषद केला. मुनगंटीवार यांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लगेचच नरभक्षक बिबट्याला तात्काळ करण्याचे आदेश देत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देत असल्याचे थोरात…

Read More