Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात गुरुवारी (दि. ११ जून) मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील १४ पोलीस निरीक्षक आणि ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या यादीशिवाय आणखीनही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती आहे. कायदा व सुव्यवस्था, प्रशासकीय निकड आणि काही अधिकाऱ्यांच्या विनंतीचा विचार करून जनहितार्थ हे बदली आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही पदग्रहण अवधी न घेता तातडीने नव्या जागी हजर होऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहराच्या लगतच असलेल्या आढा ओढा परिसरामध्ये एक धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. या भागात एका अज्ञात व्यक्तीचा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आढा ओढा परिसरात एक मृतदेह जळालेल्या स्थितीत पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती तात्काळ संगमनेर शहर पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून संगमनेर शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह अंदाजे पन्नास वर्षे वयाच्या पुरुष जातीच्या व्यक्तीचा असल्याचे दिसून येत आहे. मृतदेह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​संगमनेर: शहरात सातत्याने गंभीर गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराविरुद्ध पोलीस प्रशासनाने अखेर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अकोले नाका परिसरात राहणाऱ्या राहुल भारत सोनवणे (वय २४ वर्षे) या धोकादायक व्यक्तीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. ​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल सोनवणे याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, लुटमार, जबरी चोरी आणि घातक शस्त्रांनी गंभीर मारहाण करणे यांसारखे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस प्रशासनाने यापूर्वी त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, तसेच त्याला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या धडपडीत आजचा माणूस स्वतःचे आरोग्य, नातेसंबंध आणि आनंद हरवून बसत आहे. एव्हरेस्टसारखी यशाची उत्तुंग शिखरे सर केली, तरी आयुष्याच्या प्रवासात माणूस एकटा राहता कामा नये. यशाबरोबरच माणसाला आपल्या आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त आयएएस अधिकारी व नाम फाऊंडेशनचे व्याख्याते इंद्रजीत देशमुख (काका) यांनी येथे केले. पूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पाटणकर यांच्या हस्ते इंद्रजीत देशमुख यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना देशमुख यांनी ईश्वरनिष्ठ संतांच्या मांदियाळीत या सप्ताहाची सुरुवात होत असल्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​येवला: येवला तालुक्यातील बदापूर येथील शेतकऱ्यांसमोर सध्या एक मोठे संकट उभे राहिले आहे. येथील ‘वर्मा कंपनी’कडून गेल्या महिनाभरापासून रासायनिक आणि दूषित सांडपाणी उघड्यावर तसेच शेताच्या कडेला असलेल्या नाल्यांमध्ये सोडले जात आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरातील शेतीचे आणि पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून, संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. ​कंपनीतून निघणारे हे घातक केमिकलचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. हे पाणी आता शेतीसाठी किंवा पिण्यासाठी अजिबात योग्य राहिलेले नाही. दुर्दैवाने, याच विहिरींचे पाणी पिकांना दिल्याने शेतातील पिके जळून खाक होत आहेत, तर सुपीक जमीन सातत्याने नापीक बनत चालली आहे. या दूषित पाण्यामुळे मुख्यत्वे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन घारगाव (संगमनेर): कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील गुळंजवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बोटा येथील पाच भाविक गंभीर जखमी झाले. पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील बोटा (ता. संगमनेर) या आपल्या गावाकडे कारने परतत असलेल्या भाविकांच्या कारला (कार क्रमांक एम एच १४ एन डी ३३७८) समोरून येणाऱ्या दुसऱ्या पिकअप वाहनाने (एम एच २४ बी डब्लू २८६२) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत कारमधील जिजाभाऊ दत्तात्रय शेळके, चालक शिवाजी शांताराम मेंगाळ,…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांतीचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, परंतु कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज पूर्ण होतील. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नवीन लोकांशी झालेल्या ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मानसिक शांतता लाभेल. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी…

Read More

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून स्फोटक पदार्थ वाहून नेत असताना हा स्फोट झाला असून, यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण अकोले परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप उत्तम ताजने (रा. औरंगपूर) हा व्यक्ती आपल्या दुचाकीवरून स्फोटक पदार्थ घेऊन जात होता. औरंगपूर फाट्याजवळ अचानक या स्फोटक पदार्थांचा तीव्र स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट इतका भीषण आणि थरारक होता की, स्फोटाच्या तीव्रतेमुळे संबंधित दुचाकी तब्बल ५० फुटांपेक्षा अधिक उंच हवेत उडाली. धक्कादायक बाब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अध्यात्मावर बोलणे आणि त्याचा उपदेश करणे सोपे असते, मात्र त्यानुसार जीवन जगणे अत्यंत कठीण आहे. अध्यात्माला बदनाम करू नका. जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसेच मानवाचे जीवन अध्यात्माशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते तथा गगनबावड्याचे माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी केले. स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गगनगिरी महाराजांच्या तपश्चर्या, त्याग, योगसाधना आणि लोककल्याणकारी कार्याचा भावपूर्ण आढावा घेत उपस्थित भाविकांचे प्रबोधन केले. नंदकुमार पोवार म्हणाले की, गगनगिरी महाराजांच्या सान्निध्यात येणारा प्रत्येक आत्मा पावन होतो. कृतज्ञता व्यक्त करताना कधीही कमीपणा वाटून घेऊ नये. महाराजांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भास्कर देवराव तनपुरे (वय ५०, व्यावसायिक शेतकरी) आणि सार्थक गणेश निमसे (वय १६, इयत्ता दहावीचा विद्यार्थी) अशी मृतांची नावे आहेत. या दोन्ही मृतांना धार्मिक कार्याची प्रचंड आवड होती. मिळालेल्या माहितीनुसार, जुने भालगाव येथील प्रसिद्ध महादेव मंदिरात दर सोमवारी कीर्तन व भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. सोमवारी या धार्मिक कार्यक्रमाच्या स्वयंपाकात आणि तयारीत दोघांनीही उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघे नदीत पोहण्यासाठी गेले, मात्र ते घरी परतलेच नाहीत. ते कीर्तनासाठी थांबले असावेत असे वाटल्याने रात्रीपर्यंत कोणाच्या लक्षात आले नाही.…

Read More