Author: अनंत पांगारकर

सोमवार दि. ८ एप्रिल, मुंबई  महाविकास आघाडीतील मित्र पक्षांबाबत जे बोलाल ते विचार करून बोला, मित्र पक्षातील नेत्यांची मन दुखावतील असं बोलू नये, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे. थोरात म्हणाले, मित्र पक्षातील कार्यकर्त्यांबाबत राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत, ते योग्य नाही. त्यांनी विचारपूर्वक बोलायला हवं. आघाडीत एकत्र काम करायच आहे. त्यामुळे राऊतांनी काळजीपूर्वक बोलायला हवं. सांगली, भिवंडी, मुंबईसह काही जागांसाठी आमचा आग्रह आजही काय आहे. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे, यासंदर्भात आजच निर्णय होईल. जागावाटपाच्या अंतिम निर्णयासाठी उद्या ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद होणार…

Read More

सोमवार दि. ८ एप्रिल येत्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले तर देशात पुन्हा कधीही निवडणुका होणार नाही. देशाचे संविधान बदलेल. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून द्वेषपूर्ण भाषण करतील. लडाख मणिपूर सारखी परिस्थिती देशभरात सर्वत्र उद्भवेल असे खळबळ जनक विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी केले आहे. परकला प्रभाकर यांचे हे विधान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले असून प्रभाकर यांनी एका यूट्यूब चैनल वरील मुलाखतीत हे विधान केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये तुफान व्हायरल होत असून १ मिनिट ४० सेकंदाच्या या व्हिडिओत नेमकं काय आहे. यासाठी काँग्रेसने हा व्हिडिओ…

Read More

रविवार दि. ७ एप्रिल वडापाव खाण्याच्या बहाण्याने पत्नीने घरी बोलाविलेल्या एकोणवीस वर्षीय तरुणीवर पत्नीच्या मदतीने पतीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कात्रज येथे ३ मार्च रोजी ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शनिवारी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीच्या पीडित तरुणीला वडापाव खाण्यासाठी घरी येण्याचा आग्रह करत आरोपी महिलेने आपल्या घरी बोलावलं होतं. आग्रहाने बोलविल्याने पीडित तरुणी या महिलेच्या घरी गेली होती. थोडा वेळ गप्पाटप्पा झाल्यानंतर कामाच्या निमित्ताने आरोपी महिला घराबाहेर गेली. घराबाहेर जाण्याच्या बहाण्याने तिने घराची कडी बाहेरून लावून घेतली होती. पत्नी घराबाहेर…

Read More

रविवार दि. ७ एप्रिल  ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण, संवर्धन व ग्राहकांच्या समस्याचे निराकरण व्हावे यासाठी जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेवर २१ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहे. अशासकीय सदस्यांमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटक विलास जगदाळे, जिल्हा अध्यक्ष अतुल कुऱ्हाडे, दिनेश थोरात, प्राचार्य शाहुराव औटी, प्रा. अमिता रानु, अशोक शेवाळे, रणजीत श्रीगोड, सुनील रूणवाल, उमा मेहत्रे, गजेंद्र क्षीरसागर, बाबासाहेब भालेराव, प्रा. डॉ. राजेंद्र कळमकर, डॉ. मंगला भोसले, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. विलास सोनवणे, संतोष भुसारी, सुनील दळवी, डॉ. गोरख बारहाते, प्रकाश रासकर, रबाजी सुळ व सुधीर भापकर यांचा…

Read More

रविवार दि. ७ एप्रिल पोलीस आणि संबंधितांशी असलेल्या मधुर संबंधामुळे संगमनेरात अवैध धंदे आता चोरून लपून नव्हे तर थेट उघड्यावर मोकळ्या मैदानात चालू असल्याचे समोर आले आहे. गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नेहमीप्रमाणे कारवाईदरम्यान महिला आरोपी पसार झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे हनुमान नगर परिसरात असलेल्या एका मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह गावठी दारू बनविण्याचे साहित्य आणि रसायन जप्त केले. कारवाईदरम्यान पोलीस पथकाने ही गावठी दारू बनविण्याचे हातभट्टी उध्वस्त करून टाकली. ही कारवाई सुरू असताना…

Read More

प्रवीण पुरो विश्‍वगुरू व्हायला निघालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर भारत देशाचे नवे अवतार निघाले. स्वत:मागे असंख्य उपाध्या लावणार्‍या मोदींना त्यांच्या समर्थकांनी इतकं चढवलं की ज्याचं नाव ते. हजार पापं करूनही एखाद्याला साव मानलं जातं तेव्हा पापं करणारा सुटतो. खोटं बोलतो. होत्याचं नव्हतं करतो. मोदींचं तसंच झालंय. सत्ता मिळाल्यापासून हे विश्‍वगुरू देशाचे कर्दनकाळ ठरू लागले आहेत. ना खाऊंगा, ना खाने दुंगा! या पंक्तींचा पुरेपूर वापर करत स्वत:ला स्वच्छ छबीची उपमा देणार्‍या मोदींनी स्वत: खाल्लं नाही, असं कोणीही सांगत असेल तर त्याला तपासावं लागेल. या देण्या-घेण्यापासून मोदींनी स्वत:ला असं दूर ठेवलं की कोणीही त्यांच्यावर पापभिरू म्हणून विश्‍वास ठेवावा. प्रत्यक्षात मात्र त्यांनी…

Read More

शनिवार दिनांक ६ एप्रिल  शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी मी इच्छुक होतो. मात्र माझ्या उमेदवारीला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत विरोध केल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा कॅफे कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केला. शिर्डीच्या जागे संदर्भात आठवले म्हणाले, मी शिर्डीतून लढण्यास तयार होतो. निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा दाखला देत भाजपने शिवसेनेच्या (शिंदे गट) अनेक नेत्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून कोणाला उमेदवारी द्यावी, याच्या सूचना भाजप नेतृत्वाने त्यांना केल्या. निवडणूक जिंकू शकणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी हा प्रमुख…

Read More

शनिवार दि. ६ एप्रिल, अहमदनगर  जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, मात्र बदल्या होऊन देखील वर्षभराचा कालावधी उलटूनही या कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अद्यापही कार्यमुक्त न केल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत. अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली होती. शेख यांनी केलेली तक्रार गंभीर स्वरूपाचे असल्याने यासंदर्भात नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहे. बदली होऊन देखील या सतरा कर्मचाऱ्यांना पुन्हा स्थानिक गुन्हे…

Read More

शुक्रवार दि. ५ एप्रिल, अहमदनगर  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकून पकडलेला ७३ लाख २४ हजार ५०० रुपयांपैकी ६९ लाख ४४ हजार ५०० रुपयांच्या रकमेचे योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने ही रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा वित्त अधिकारी तथा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. आयकर विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे ही रक्कम सोपविण्यात आली तर उर्वरित ३ लाख ८० हजार रुपयांसंदर्भात योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने हे रक्कम बोल्हेगाव (नगर) येथील संबंधित व्यक्ती विजय कृष्णा भगत यांना सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. यादरम्यान नगरच्या स्थानिक…

Read More

शुक्रवार दि. ५ एप्रिल लोकसभा निवडणुक प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चार दिवस अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघात चार दिवस कोरडा दिवस (ड्राय डे) पाळण्याचे आदेश दिले आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजेच ११ ते १३ मे या कालावधीत व मतमोजणीच्या दिवशी ४ जूनला पूर्ण दिवस कोरडा पाळण्याचा आदेश लागू राहणार आहे. जिल्ह्याच्या सीमेसह लगतच्या इतर जिल्ह्यातील पाच किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्रासाठी हे आदेश लागू राहतील. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये व मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ चे कलम १४२ च्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश लागू केले आहे.…

Read More