Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर खुर्दमधील प्रसिद्ध ‘हॉटेल रंगीला पंजाब’वर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या हॉटेलचा मद्यविक्रीचा परवाना (एफएल-३ परवाना क्रमांक ११५६) ३० दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले असून, प्रशासनाने हे हॉटेल तातडीने बंद केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर-१ विभागाच्या दुय्यम निरीक्षकांच्या पथकाने या हॉटेलची अचानक आणि सविस्तर तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अनेक गंभीर त्रुटी आणि बेकायदेशीर बाबी आढळून आल्या. यामध्ये प्रामुख्याने विहित नमुन्यातील मद्यविक्रीच्या नोंदवह्या वेळेवर अद्ययावत न ठेवणे, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नोकरांचे अधिकृत नोकरनामे व माहिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ठाणे: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, विधीमंडळाचे कामकाज सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी त्यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. त्यांना व्हायरल फिव्हर आणि अतिताणाचा त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने देखरेख ठेवून असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांत राज्यातील वेगवान राजकीय घडामोडी आणि सततच्या धावपळीमुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून अत्यंत वैभवशाली व सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडून भारनियमनाच्या नावाखाली सातत्याने अनियमित आणि खंडित वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून शहरासह ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी शुक्रवारी संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. हे आंदोलन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, अर्चनाताई बालोडे, निखिल पापडेजा,…
आजचे राशिभविष्य मेष – आज तुमच्या घरातले वातावरण अतिशय सकारात्मक राहील. एखादी आनंदाची बातमी समजल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलू शकेल. मुलांचे शिक्षण किंवा त्यांच्या भविष्याविषयी असणाऱ्या चिंता परस्पर संवाद आणि समजुतीतून दूर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. निर्णय घेताना मात्र अहंकाराला मध्ये येऊ देऊ नका. आरोग्याच्या बाबतीत आज थोडी काळजी घेणे फायदेशीर ठरेल. वृषभ – नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी आज रोजगाराची नवीन संधी चालून येऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये प्रामाणिकपणा आणि संयम राखणे ही आज तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. अनोळखी व्यक्तीवर अतिविश्वास ठेवणे आज अजिबात शहाणपणाचे ठरणार नाही. सासरच्या…
विशेष प्रतिनिधी | मुंबई: विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर ठरू शकणाऱ्या ‘स्टिंग’सारख्या उच्च कॅफिनयुक्त ऊर्जा पेयांच्या विक्रीवर शाळांच्या ५०० मीटर परिसरात बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यात घेण्यात आला आहे. हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी विधानपरिषदेत ठाम भूमिका घेत आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या संपूर्ण मुद्द्यावर बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी वारंवार विधानपरिषदेत स्पष्टपणे मांडले की शाळा परिसरात अशा प्रकारच्या ‘हाय कॅफिन’ आणि आकर्षक पॅकेजिंग असलेल्या पेयांची सहज उपलब्धता ही विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. “शालेय वयातील मुलांमध्ये अशा पेयांचे वाढते सेवन चिंताजनक असून, यावर तातडीने निर्बंध आवश्यक आहेत,” अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात घेतली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि…
आजचे राशिभविष्य मेष- आज नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा मोठे पद मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात घेतलेले छोटे निर्णय देखील भविष्यात मोठा नफा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणांमध्ये धावपळ होऊ शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. वृषभ- तुमचे नम्र वागणे आणि गोड बोलणे यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी भेट झाल्यामुळे मन आनंदी होईल. एखादा लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे, जो लाभदायक ठरेल. कौटुंबिक वातावरण सुखाचे राहील, मात्र कायदेशीर किंवा प्रशासकीय कामांमध्ये निष्काळजीपणा करू नका. मिथुन- आज घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सध्या समाजात वाढलेली नकारात्मकता दूर करून मानवता आणि आनंदाची निर्मिती करण्यासाठी संपूर्ण जुलै महिना ‘मंथ ऑफ काइंडनेस’ (दयाळूपणाचा महिना) म्हणून राबवण्याचा एक अनोखा संकल्प प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सोडला आहे. या मोहिमेत प्रत्येकाने दररोज किमान एक चांगली कृती करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जगभरात अशा प्रकारची संकल्पना पहिल्यांदाच संगमनेर तालुक्यात राबवली जात असून, या संदर्भात यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जागतिक युद्ध, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि नकारात्मक बातम्यांमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे, ज्याचा विपरीत परिणाम पुढील पिढीवर होत आहे. हे…
विशेष प्रतिनिधी / मुंबई “देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्षचोरी केली जाऊ लागली, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागलं आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क आणि अधिकार नाकारले जात आहेत, म्हणून वेळीच सावध व्हा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आवाज बुलंद करा,” असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणाच्या प्रभारी मीनाक्षी नटराजन यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे “लोकशाही वाचवा निर्धार सभा” आयोजित करण्यात आली होती.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: अवैध मुरूम आणि माती वाहतुकीबाबत जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला झाला असून, यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात ही धक्कादायक घटना घडली. समजलेल्या माहितीनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असलेले फिर्यादी संदीप घुगे (वय ४३) हे रात्री जेवण करून घराबाहेर शतपावली करत असताना, दोन मोटारसायकलवरून सहा जण तेथे आले. त्यातील एका गाडीवर विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे), प्रवीण ठकाजी पुणेकर व सुदर्शन शिवाजी श्रीराम (दोघे रा. डिग्रस) हे होते. विशाल व प्रवीण यांनी घुगे यांना पाहताच पिस्तूल उपसून ‘तुझा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने रविवारी (५ जुलै) सायंकाळी सहा वाजता एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यापारी असोसिएशन हॉल येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ‘तापलेल्या पृथ्वीची गोष्ट’ या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. गुरुदास नुलकर प्रकाश टाकणार आहेत. हवामान बदलाचे चटके संपूर्ण जगाला बसत असताना, या संकटाची दाहकता आणि त्यामागील शास्त्रीय कारणे समजून घेणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने आयोजित या व्याख्यानात डॉ. नुलकर हे सामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनात कशी भर घालता येईल, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करतील. सत्यशोधक विचार मंच आपल्या प्रबोधनपर उपक्रमांसाठी ओळखला जातो. मंचाचे समन्वयक संदीप…
