Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर (नाशिक) – शुक्रवारी दुपारी सिन्नर औद्योगिक वसाहतीतील आदिमा ऑरगॅनिक या केमिकल कंपनीला शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी अग्निशामक बंबाच्या सहाय्याने शर्तीचे प्रयत्न सुरू होते. सिन्नरच्या मुसळगाव एमआयडीसीत हा प्रकार घडला. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या या भीषण आगीमुळे आकाशात सर्वदूर अनेक किलोमीटर पर्यंत आगीचे तसेच धुराचे लोळ दिसत होते. कंपनीमध्ये पंधरा ते वीस कामगार काम करत मात्र आग लागल्याचे दिसताच ते बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीमुळे स्फोटाचे आवाजही येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे एमआयडीसी परिसरात एकच घबराट उडाली. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही. दरम्यान आगीची माहिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणासह डाव्या आणि उजव्या कालव्याची कामे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधूनच पूर्ण झाली आहेत. निळवंडे धरणाच्या माध्यमातून डाव्या व उजव्या कालव्यातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविणारे थोरातच खरे ‘जलनायक’ असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. तालुक्यातील निमगाव खुर्द येथे उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत माजी आमदार डॉ. तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते. तांबे म्हणाले, आमदार थोरात यांनी १९९९ मध्ये प्रथमताच राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर निळवंडे धरणाच्या कामाला चालना दिली. त्यानंतर त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कार्यारंभ आदेश निघूनही प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात होत नसल्याने रखडलेल्या म्हाळूंगी नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी, घोडेकर मळ्याकडे जाणारा पूल भरभक्कम करावा या मागणीसाठी शुक्रवारपासून म्हाळूंगी पूल बनाव कृती समितीच्यावतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा कारणावरून हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. तसेच पुलावरील शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तातडीने शिफ्ट करण्यासंदर्भात देखील पाहणी केली. सुरुवातीला घोडेकर मळ्याकडे जाणाऱ्या पुलाची दुरुस्ती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दुष्काळी परिस्थिती असतानाही सन २०२४-२४ या हंगामात सहा लाख मेट्रिक टन उस गाळपाचा टप्पा पार केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली. चालू हंगाम हा अत्यंत अडचणीचा व दुष्काळजन्य परिस्थितीचा आहे. कारखान्यावर सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही चालू हंगामात ६ लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा टप्पा कारखान्याने पार केला. हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर -चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये भारताच्या प्रगतीची प्रशंशा करताना फुदान विद्यापीठातील सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीचे संचालक झांग जियाडोंग यांनी भारताचा जगात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असा उल्लेख करत ‘भारत खरंच एक मोठी शक्ती’ असं म्हटलंय. वेगाने विकसित होणाऱ्या या भारतातील म्युच्युअल फंड उद्योगानेही ५० लाख कोटींचा टप्पा नुकताच पार केला असून या उद्योगाची भविष्यकालीन वाटचाल येत्या तीन ते चार वर्षात शंभर लाख कोटींची होईल, असा आशावाद कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी व्यक्त केला. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व मानद सचिव राजेंद्र अहिरे यांच्या पुढाकाराने नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) सिन्नर आयोजित “नव्या युगाचे आर्थिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून तिरंगा होत असल्याचा कारणावरून शुक्रवारपासून (ता. २ फेब्रुवारी) स्वामी समर्थ मंदिरापाशी नागरिक साखळी उपोषणास प्रारंभ करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला या पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तत्कालीन एका कामाच्या चुकीमुळे म्हाळूंगी नदीवरील पूल कोसळला होता. संगमनेर शहरातील अनेक विभागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाची बांधणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी होती. पूल कोसळल्याने अनेकांची मोठी गैरसोय निर्माण झाली. मात्र पालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्याने या पुलाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये संगमनेर येथील पत्रकार व शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी लिहिलेल्या ‘शिक्षणाचे परिवर्तन’ व ‘विनोबांची शिक्षण छाया’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवारी (ता. ४ फेब्रुवारी) मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती चपराक प्रकाशनचे प्रमुख पत्रकार घनश्याम पाटील यांनी दिली. प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘परिवर्तनाची वाट’ या पुस्तकाला महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक शिवाजी तांबे यांची प्रस्तावना लाभली आहे. ‘विनोबांची शिक्षण छाया’ या पुस्तकाला संपादक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर, सामाजिक कार्यकर्ते मयूर बागुल व पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. वाकचौरे यांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून ‘संगमनेरी’ काका पुतण्याने सुयोग्य सुरावटींनी सजवून सादर केलेले संगमनेरचे सुपुत्र आणि प्रतिभाशाली कवी मुरारी देशपांडे यांच्या लेखणीतून हिंदीत साकारलेले “कश्मीर बोले शीश उठाकर बोले कन्याकुमारी, सदियो से थी मनोकामना आज पुरी हुई हमारी” असा मुखडा असलेले ‘राम गीत’ आता सातासमुद्रापार पोहोचले आहे. सोशल मिडीयावरील शेअरिंगच्या झपाट्याने दुबई पासून अमेरिका-इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, कानडा, स्वित्झर्लंडसह दक्षिण आफ्रिकेतील भागांमध्येही ‘संगमनेरी’ स्वर घुमतोय. संगमनेरचा नावलौकिक वाढविणाऱ्या या कामगिरीबद्दल येथील अनेक कला रसिकांनी मुरारी देशपांडे व सर्वेश देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे. हे ‘रामगीत’ मुरारी देशपांडे यांनी लिहिले आणि त्याला चालही लावली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाने राज्यातील ५८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांना अद्याप नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नाही. याशिवाय श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचीदेखील छत्रपती संभाजी नगरच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी लातूर येथून वैभव कलुबर्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस सह आयुक्त असलेले व नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ज्यामध्ये विविध स्वरूपाची विविधता आहे. त्या विविधतेमध्ये देखील एकात्मता साधली गेली आहेत. रंग, वर्ण, भाषा, आचरण पद्धती यावरून भारतीय संस्कृती कोणाला विभागत नाही. देशात हजारो वर्षांपासून लोकशाही अस्तित्वात आहे. पूर्वी येथे राजाही लोकांमधून निवडला जायचा. लोकशाही या भूमीला नवीन नाही, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी व्यक्त केले. चाणक्य मंडल परिवारातर्फे संगमनेर येथील गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचे “प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास” व भूषण केळकर संपादित ‘यशोगाथा’ या पुस्तकांचे प्रकाशन खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूर्णा धर्माधिकारी, अनिल नागणे, भूषण केळकर, उपस्थित होते. माजी आयएएस अधिकारी व संचालक अविनाश धर्माधिकारी अध्यक्षस्थानी…
