Author: अनंत पांगारकर
प्रवीण पुरो | मो. 8169135253 देशातील लोकसभा निवडणुका जसजशा पुढे येत आहेत तसतसं देशातील राजकारण कोणतंही वळण घेऊ शकतं. विरोधकांच्या इंडिया आघाडीचे प्रवर्तक नितीश कुमारच आघाडी सोडून भाजपला जाऊन मिळत असतील, तर इतर कोणत्याही गोष्टींची चर्चा ही खूजीच. देशाच्या या विचित्र राजकीय परिस्थितीपासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी विरोधी पक्षांनी प्रामाणिक हालचाली सुरू ठेवल्या असल्या आणि या प्रयत्नाला अनेकांनी वरकरणी पाठिंबा तसंच आघाडीत सामील होण्याचा प्रयत्न केला तरी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. महाराष्ट्र हे देशाला वळण देणारं राज्य मानलं जातं. सर्वार्थाने देश आपल्या राज्याकडे आदर्श म्हणून पहात असे. पण गेल्या काही वर्षांपासून विशेषत: राज्यात भाजपप्रणित राज्यसत्ता निर्माण झाल्यापासून…
थोरातांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदोत्सवात उजव्या कालव्याचे जलपूजन महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणाचे डाव्या आणि उजव्या कालव्यातून येणारे पाणी पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे ठरणार आहे. धरण आणि कालव्याच्या कामासाठी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा करत सरकारकडून निधी मिळविला. अनेक अडचणींवर मात करून हे धरण पूर्णत्वास गेले. आता धरणातून पाणी आपल्यापर्यंत पोहोचले असल्याने या कामाचा मोठा आनंद आणि समाधान असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण आणि कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. हिवरगाव पावसा येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, आर. बी. राहणे, उत्तमराव…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून घर बांधण्यासाठी माहेरच्यांकडून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरमध्ये समोर आला असून या संदर्भात विवाहितेच्या तक्रारीवरून पती सासू-सासर्यांसह चार जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, हल्ली संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे असलेल्या सुवर्णा संजय भुसारी (वय ३४ वर्ष) हिचा विवाह वीरगाव येथील संजय यशवंत भुसारी याच्यासोबत झाला होता. मात्र विवाहितेच्या माहेरच्यांनी लग्न व्यवस्थित केले नाही, लग्नात हुंडा दिला नाही तसेच विवाहितेला शेती काम करता येत नाही अशी कारणे पुढे करत तिने माहेरच्यांकडून घर बांधण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात ‘रामलीला’ नाटक सादर करणे अंगाशी आले आहे. सादर करण्यात आलेल्या या नाटकात श्रीराम आणि सीता यांच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद वापरण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे नाटक बंद पाडले होते. दरम्यान या प्रकरणी पुण्याच्या चतु:शृंगी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या या नाटकात सीतेचे आक्षेपार्ह पात्र दाखविण्यात आल्याने या नाटकावरून मोठा गदारोळ उडाला होता. नाटकातील संवादाच्या काही क्लिप्स देखील समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने त्याचे देखील पडसाद उमटल्याचे दिसून आले. पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर (नाशिक) – शुक्रवारी दुपारी सिन्नर औद्योगिक वसाहतीतील आदिमा ऑरगॅनिक या केमिकल कंपनीला शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी अग्निशामक बंबाच्या सहाय्याने शर्तीचे प्रयत्न सुरू होते. सिन्नरच्या मुसळगाव एमआयडीसीत हा प्रकार घडला. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या या भीषण आगीमुळे आकाशात सर्वदूर अनेक किलोमीटर पर्यंत आगीचे तसेच धुराचे लोळ दिसत होते. कंपनीमध्ये पंधरा ते वीस कामगार काम करत मात्र आग लागल्याचे दिसताच ते बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीमुळे स्फोटाचे आवाजही येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे एमआयडीसी परिसरात एकच घबराट उडाली. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही. दरम्यान आगीची माहिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणासह डाव्या आणि उजव्या कालव्याची कामे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधूनच पूर्ण झाली आहेत. निळवंडे धरणाच्या माध्यमातून डाव्या व उजव्या कालव्यातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविणारे थोरातच खरे ‘जलनायक’ असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. तालुक्यातील निमगाव खुर्द येथे उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत माजी आमदार डॉ. तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते. तांबे म्हणाले, आमदार थोरात यांनी १९९९ मध्ये प्रथमताच राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर निळवंडे धरणाच्या कामाला चालना दिली. त्यानंतर त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कार्यारंभ आदेश निघूनही प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात होत नसल्याने रखडलेल्या म्हाळूंगी नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी, घोडेकर मळ्याकडे जाणारा पूल भरभक्कम करावा या मागणीसाठी शुक्रवारपासून म्हाळूंगी पूल बनाव कृती समितीच्यावतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा कारणावरून हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. तसेच पुलावरील शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तातडीने शिफ्ट करण्यासंदर्भात देखील पाहणी केली. सुरुवातीला घोडेकर मळ्याकडे जाणाऱ्या पुलाची दुरुस्ती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दुष्काळी परिस्थिती असतानाही सन २०२४-२४ या हंगामात सहा लाख मेट्रिक टन उस गाळपाचा टप्पा पार केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली. चालू हंगाम हा अत्यंत अडचणीचा व दुष्काळजन्य परिस्थितीचा आहे. कारखान्यावर सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही चालू हंगामात ६ लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा टप्पा कारखान्याने पार केला. हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर -चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये भारताच्या प्रगतीची प्रशंशा करताना फुदान विद्यापीठातील सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीचे संचालक झांग जियाडोंग यांनी भारताचा जगात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असा उल्लेख करत ‘भारत खरंच एक मोठी शक्ती’ असं म्हटलंय. वेगाने विकसित होणाऱ्या या भारतातील म्युच्युअल फंड उद्योगानेही ५० लाख कोटींचा टप्पा नुकताच पार केला असून या उद्योगाची भविष्यकालीन वाटचाल येत्या तीन ते चार वर्षात शंभर लाख कोटींची होईल, असा आशावाद कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी व्यक्त केला. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व मानद सचिव राजेंद्र अहिरे यांच्या पुढाकाराने नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) सिन्नर आयोजित “नव्या युगाचे आर्थिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून तिरंगा होत असल्याचा कारणावरून शुक्रवारपासून (ता. २ फेब्रुवारी) स्वामी समर्थ मंदिरापाशी नागरिक साखळी उपोषणास प्रारंभ करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला या पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तत्कालीन एका कामाच्या चुकीमुळे म्हाळूंगी नदीवरील पूल कोसळला होता. संगमनेर शहरातील अनेक विभागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाची बांधणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी होती. पूल कोसळल्याने अनेकांची मोठी गैरसोय निर्माण झाली. मात्र पालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्याने या पुलाच्या…
