Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दोन वर्षानंतर प्रथमत:च मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत असली तरी जास्तीच्या झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकारने त्याच्या पाठीशी उभा राहण्याची गरज आहे. मात्र सध्याच्या सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस सुरू असून प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री थोरात बोलत होते. राज्य साखर संघाचे संचालक आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, डॉ. हसमुख जैन, डॉ. जयश्री थोरात आदी यावेळी उपस्थित होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपांवरुनच बच्चू कडू यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत रवी राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये सुरू असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या दोन आमदारांमधील वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आधी मंत्रिमंडळाचा रखडलेला शपथविधी, आता बहुचर्चित रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जाते. अशा पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यात सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत असलेली नाराजी समोर आलेली नव्हती. मात्र आता गुवाहाटी वरून झालेल्या आरोपामुळे आमदार बच्चू…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नेवासे तालुक्याच्या पाहणी दौऱ्यात राज्याच्या महसूलमंत्र्यांना प्रवरासंगम पासून काही अंतरावरील मंगळापूर गावात चक्क वाळू उपश्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन लोखंडी बोटी आढळून आल्या. मंत्र्यांच्या दौऱ्यातच वाळू तस्करीचा मुद्दा समोर आल्याने संतापलेल्या विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी बोटी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच वाळूतस्करी प्रश्नी लक्ष घातले. विखे पाटील यांच्या भूमिकेमुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंत्री विखे जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह नेवासे तालुक्यातील नुकसानीची पाहणी करत होते या पाहणे दरम्यान त्यांना प्रवरा संगम पासून काही अंतरावर असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकारी तरुणीस पदोन्नतीचे अमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात हा प्रकार घडला. कॉलेज रोड परिसरात असलेल्या एका नामांकित रेस्टॉरंटमधील वरिष्ठ सहकार्याने आपल्या कनिष्ठ सहकारी तरुणीस पदोन्नतीचे आमिष दाखवून हे कृत्य केले असल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून स्पष्ट झाले. गत बुधवारी पीडित तरुणी कामावर असताना आरोपीने तिला गाठून पदोन्नती मिळवून देण्याचे आमिष दाखवत पंचवटीत एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस स्थानकामध्ये आरोपी सागर मधुकर कदम (वय 29 वर्ष) याच्या विरोधात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अस्मानी संकट आल्यावर सरकारचे कर्तव्य असते की, शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचे नाही. मात्र आपल्याकडील निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. शिवसेना फुटीनंतर रविवारी प्रथमतःच औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आणि बांधावरच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. आपल्या दौऱ्यात ठाकरे यांनी दहेगाव आणि पेंढापूर येथे जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, राज्यात एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे. आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेल, या निर्दयी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अखिल भारतीय किसान सभेचे 23 वे अधिवेशन अकोलेमध्ये 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान होत आहे. अधिवेशनाची सुरुवात पहिल्याच दिवशी जाहीर सभेने होणार असून या सभेमध्ये ओल्या दुष्काळा प्रश्न आरपार लढायचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली. सोमवारी 31 ऑक्टोबरला होत असलेल्या या सभेसाठी डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रकाश, माजी आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, आमदार विनोद निकोले, अर्जुन आडे, उमेश देशमुख आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. राज्य अधिवेशनापूर्वी किसान सभेची राज्यभर रीतसर गाव, तालुका व जिल्हा अधिवेशने घेण्यात आली असून जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडलेले ३०० प्रतिनिधी व किसान सभेचे…

Read More

प्रशांत गुंजाळ (लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक असून संगमनेर न्यायालयात वकील आहेत) सन 2014 च्या मे महिन्यामध्ये मी एका पक्षकाराचे घटस्फोटाचे प्रकरण संगमनेरच्या न्यायालयात दाखल करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तत्कालिन न्यायाधीशांनी माझ्या असं निदर्शनास आणून दिले की, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास शंभर घटस्फोटाची प्रकरणे न्यायालयात निवाड्यासाठी दाखल झाली आहेत. माननीय न्यायाधीश साहेबांनी त्यावर चिंता व्यक्त करत एक भिती बोलून दाखविली होती. दुर्दैवाने आता ती भिती आता खरी होताना दिसत आहे. गत दोन दशकांच्या कालावधीत वेगवेगळ्या कारणांनी समाजातील एकत्र कुटूंब पध्दती लयाला गेली. याच काळात एकत्र कुटूंब पध्दती जावून विभक्त कुटूंब पध्दती समाजात निर्माण झाली. याचे धोके आता…

Read More

मुंबई । प्रविण पुरो (लेखक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) प्रिय पवार साहेब, गेल्या काही वर्षांपासून देशातील बदलत्या राजकीय वातावरणाची आपणास पूर्ण जाणीव असेल. विशेषत: महाराष्ट्रात या राजकारणाने घेतलेल्या निचत्तम पातळीने भाजप वगळता आपण सारेच घायाळ झालो आहोत. 2014पासून महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावर आहे. लोकशाही नावाची संकल्पना ही केवळ नावापुरती शिल्लक राहिली असल्याचं आपण आणि आपल्या पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. विरोधकांना जगणं मुष्कील करून ठेवण्याच्या या कृतीची करावी तितकी निर्भत्सना कमीच आहे. हे करतं कोण? घडवतं कोण? हे आपण जाणता. यात आपले कार्यकर्ते असलेले मंत्री अनील देशमुख, नवाब मलिक, सहकारी मित्र असलेले संजय राऊत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी पत्नीने माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, या कारणासाठी तिचा छळ करुन खून केल्याच्या आरोपातून पती सुरेश पंकज बिबवे याच्याबरोबर सर्व आरोपींची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील निमज येथे २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात सुजीत पावसे याच्या तक्रारीवरुन विवाहितेचा पती सुरेश बिबवे, सासरा पंकज लक्ष्मण बिबवे, अमोल पंकज बिबवे, मंगल पंकज बिबवे, अविनाश लक्ष्मण बिबवे, सुरेखा अविनाश बिबवे, वच्छला लक्ष्मण बिबवे आणि लक्ष्मण बुवाजी बिबवे यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अटक करत तत्कालिन पोलीस निरीक्षक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव पुशधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोगाने मृत झालेल्या पशुधनाची संख्या मंगळवारपर्यत ६५ वर गेली आहे. यापैकी ४२ पशुधनाचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले असून उर्वरित प्रस्ताव दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. राज्यात उद्भवलेल्या गो व महिप वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समितीची बैठक संगमनेरमध्ये तहसीलदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक आयुक्त डॉ. जे. के. तिटमे, पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन जोंधळे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ…

Read More