Author: अनंत पांगारकर
मुंबई @ प्रवीण पुरो (9869991868) मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बॅकफुटवर गेलेल्या भाजपने दोन समाजात तेढ निर्माण करून स्वत: मात्र पध्दतशीर नामेनिराळं राहण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा मोर्चांची राळ सुरू होती तेव्हाही भाजपने मराठा समाजाला इतरांच्या अंगावर सोडून स्वत:ला वेगळं ठेवलं. तेव्हा मराठा समाजातील भाजपला मानणारे याला कारणीभूत होते. आता महायुतीच्या सरकारमध्ये बसलेले मंत्री छगन भुजबळ जबाबदार ठरत आहेत. आपल्यावरचं संकट इतरांवर टाकण्यासाठीची ही खेळी भाजपने पध्दतशीरपणे खेळली आहे. यासाठी त्याने आता छगन भुजबळ यांचा उपयोग करून घेतल्याचं दिसतं. भुजबळ यांच्या या खेळीमागे ओबीसींवरचं प्रेम वैगेरे काहीही नाही. सत्तेत राहूनही अटकेचं संकट टाळणं हेच यामागचं कारण होय. मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देण्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याच्या सुनावणी प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत शनिवारी (२ डिसेंबर) मालेगाव न्यायालयात उपस्थित झाले. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला. आता या खटल्याची सुनावणी ३ फेब्रुवारीला होणार आहे. गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणी बदनामी केल्याच्या कारणावरून मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. भुसे यांनी दाखल केलेल्या या दहाव्याच्या सुनावणीत खासदार राऊत आत्तापर्यंत दोनदा न्यायालयात गैरहजर राहिले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना वॉरंट काढले होते. राऊत शनिवारी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांच्या…
अमृतवाहिनी सहकारी बँकेची ऑनलाइन प्रणाली कौतुकास्पद महाराष्ट्र संवाद न्यूज बँकिंग हा विषय आज प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा झाला आहे. ग्रामीण भागातील नागरी व सहकारी बँकांनी सर्वसामान्य माणसाला मोठा आर्थिक आधार दिला. आता बदलत्या काळात नवीन तंत्रज्ञान आणि ऑनलाईन प्रणालीचा वापर अनिवार्य ठरला असून या क्षेत्रात अमृतवाहिनी सहकारी बँकेने केलेले काम कौतुकास्पद ठरल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्यावतीने संगमनेरमध्ये ‘असोसिएशन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. तांबे बोलत होते. प्रशिक्षक लेखापरीक्षक अक्षय भाटे, उद्योजक राजेश मालपाणी, असोसिएशनचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र संवाद न्यूज गावठी कट्टा आणि दोन राऊंड सोबत बाळगत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या श्रीरामपूरमधील व्यक्तीला संगमनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टा आरोपीने जवळ बाळगण्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. अज्जू उर्फ अजीम अन्वर पठाण (वय 26 वर्ष, रा. वार्ड नंबर 1, मिल्लतनगर, श्रीरामपूर असे पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी वडगाव पान ते समनापुर दरम्यान ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज गुरुवारी शनिशिंगणापूर दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या संगमनेर पोलिसांनी परिसरातील हॉटेल, लॉजिंगची तपासणी व नाकाबंदी सुरू केली असताना त्यांना यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले असून बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे – ???? अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. ???? झोपडीधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. ???? राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्याचा निर्णय़ झाला आहे. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. ???? मराठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज पर्जन्य छायेमुळे सातत्याने दुष्काळ, पाण्याची कमतरता असतानादेखील काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील सहकारी संस्थांच्या माध्यमातून साधला गेलेला ग्रामीण विकास आणि तालुक्यातील सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक प्रगती या सहकारातून साधलेल्या पॅटर्नचे नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. नाबार्डच्या मुंबई विभागीय शाखेतील अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटाने शनिवार व रविवारी अमृत उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या विविध सहकारी संस्थांना भेटी देत पाहणी केली. मुंबई मुख्यालयाचे डेप्युटी जनरल मॅनेजर राकेश सिंग, विजय तिरूमला, मंगला श्रॉफ, वंदना वेणुगोपाल, गीता यादव, विवेक खानोलकर आदींचा साठ अधिकाऱ्यांचा या अभ्यास गटात समावेश होता. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, जोर्वे…
महाराष्ट्र संवाद न्यूज देशाच्या स्वातंत्र्यात व राष्ट्र उभारणीत मोठे योगदान असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विधिमंडळ पक्षनेते व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत राहता तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दंडवते, नितीन सदाफळ, विनायकराव मते, प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ, मुन्ना फिटर, अमोल आरने, अमोल बनसोडे आदी उपस्थित होते. यांचा झाला प्रवेश: याप्रसंगी निलेश यादव, रामदास गिधाड, नवनाथ गिधाड, सौरभ भाकरे, रविंद्र भाकरे, संजय गिधाड, हरीश गिधाड, प्रमोद गिधाड, विठ्ठल…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई येथील मराठा मंदिर साहित्य शाखेच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पारितोषिक 2022 ची घोषणा करण्यात आली आहे. वैचारिक साहित्य प्रकारांमध्ये संगमनेरमधील लेखक संदीप वाकचौरे यांच्या ‘सृजनाची वाट’ या पुस्तकाला पारितोषिक जाहीर करण्यात आल्याची माहिती शाखेचे कार्याध्यक्ष प्रदीप विचारे यांनी दिली. वाकचौरे यांच्या सृजनाची वाट या पुस्तकाला वैचारिक साहित्य प्रकारातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषक जाहीर करण्यात आले आहेत. सनय प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेले ‘सृजनाची वाट’ हे शिक्षण विषयावरचे पुस्तक आहे. मराठा मंदिर साहित्य शाखेच्यावतीने कादंबरी, कथा, काव्य, प्रवास, समीक्षा, संशोधन, चरित्र, बाल वांड:मय, ललित वांड:मय, वैचारिक साहित्य अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये साहित्य पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. वाकचौरे यांनी सृजनाची…
लवकरच येतोय ‘धर्मवीर-२, मुक्काम पोस्ट ठाणे’, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चित्रीकरणाचा झाला शुभारंभ!
महाराष्ट्र संवाद न्यूज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर-२, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्तसोहळा सोमवारी पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे आता लवकरच 2024 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या २०२२ साली आलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केली. आनंद दिघे यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे या सिनेमात पाहायला मिळाले. त्यानंतर धर्मवीर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. आता या चित्रपटाचा पुढील भाग येत असून…
