Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असताना माणसा-माणसातील संवेदना हरवत चालल्या आहे. अशा स्थितीत गावोगावी ग्रंथ मंदिरे उभी राहिल्यास सुसंस्कृत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन पुण्याच्या बार्कलेज या आयटी कंपनीचे मानव संसाधन व्हाईस प्रेसिडेंट प्रीतम देशमुख यांनी केले. स्व. पतिंगराव देशमुख यांच्या स्मृति निमित्ताने देशमुख यांनी जवळेकडलग येथील सावरकर विचार युवा मंच संचलित स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास ग्रंथ भेट दिले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव माऊली देशमुख होते. वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ खंडागळे, उपाध्यक्ष प्रताप कडलग, कार्यवाह सुनील कडलग, दिलीप कदम, श्रीमती प्रणिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जाळ्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – एक रुपयात पीक विमा योजना ही राज्‍य शासनाने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे‌. शेतकऱ्यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्‍ट्र देशातील एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्‍यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. राज्‍य शासनाने खरीप व रब्‍बी हंगामाकरीता सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या रथाचे उद्घाटन महसूलमंत्री विखे पाटील यांच्‍या हस्ते करण्‍यात आले. या रथांना हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण जिल्‍ह्यामध्‍ये शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देण्‍यासाठी हे रथ जिल्‍ह्यामध्‍ये रवाना करण्‍यात आले. याप्रसंगी जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आगामी काळ हा निवडणुकांचा राहणार असून नगरपरिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने व क्षमतेने लढवत गद्दारी करणाऱ्या गद्दारांना घरी बसविण्याचे आवाहन शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संघटक शुभांगी पाटील यांनी केले आहे. संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संगमनेर तालुका महिला आघाडीच्या सक्षमीकरणाअंतर्गत नियोजनासाठी शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पाटील बोलत होत्या. महिला आघाडीच्या उत्तर नगर जिल्हा संपर्क संघटक शुभदा शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सपना मोरे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक आशा केदारी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख / सुरेश पाटील महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय घेऊन राज्यात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३० जून २०२३ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या वर्षभराच्या कालावधीत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी निळवंडे सारखे विविध प्रकल्प, योजना व विकासकामांना गती देत उत्तर अहमदनगर जिल्ह्याचा विकासाचा ध्यास घेतलेला दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पाठबळामुळे वर्षभरात विविध प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. उत्तर नगर पर्यायाने शिर्डीच्या विकासाला चालना मिळाली आहे. या वर्षभराच्या कालावधीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा हा संक्षिप्त आढावा. निळवंडेच्या डाव्या कालव्यातून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – लाखो विद्यार्थी घडविणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे सर डॉ. मो. स. गोसावी यांचे रविवारी पहाटे पावणेदोन वाजेच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 88 वर्षांचे होते. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. मो. स. गोसावी यांनी वयाच्या 23 व्या वर्षी बी. वाय. के. कॉलेजचे प्राचार्य पद भूषविले. त्यानंतर पुढील 37 वर्ष त्यांनी या महाविद्यालयात शैक्षणिक योगदान दिले. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची धुरा गेल्या साठ वर्षांपासून ते सांभाळत होते. डॉ. मो. स. गोसावी यांच्या योगदानातून लाखो विद्यार्थी आज मोठ्या पदांवर, उद्योजक, राजकारणी, वैद्यकीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष / प्रवीण पुरो महाराष्ट्रातील सत्तेच्या पिपासूंचा नंगानाच गेल्या रविवारी सार्‍या जगाने अनुभवला. गेल्या वर्षी याच काळात हा नंगानाच गोहाटीपासून गोव्यापर्यंत आणि गोव्यापासून मुंबईपर्यंत निर्लज्जपणे सुरू होता, जवळपास सर्वांनीच तो ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. माणून नावाचा प्राणी किती निष्ठूर असतो, तो कसाही विकला जाऊ शकतो आणि विकला जाऊनही मालकावर कसा दुगाण्या झाडतो याचं उदाहरण देशभरातल्या जनतेला मिळालं. या नंगानाचाचे खलनायक होते अर्थातच देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी राज्याच्या राजकरणाचा बाजार करण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो आहे. काहीही करा सत्ता ताब्यात घ्या, या त्यांच्यातल्या हवरटपणाने राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला आहे. सत्तेसाठी आजवर माणसं फोडली जायची. आता थेट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शुक्रवारी (ता. 7 जुलै) संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावात एक नंबर कांद्यास सर्वाधिक 1801 रुपयांचा तर टोमॅटो 1400 रुपये प्रति कॅरेट बाजार भाव मिळाला आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी बाजार समितीमध्ये आपला माल विक्रीस आणत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. गुंजाळ म्हणाले, शुक्रवारच्या लिलावामध्ये बाजार समितीत एकूण 26444 कांदा गोण्यांची आवक झाली. या लिलावामध्ये चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 1500 ते 1801 रुपयांचा, दोन नंबर कांद्याला 1000 ते 1400 रुपये, तीन नंबर कांद्याला 500 ते 900 रुपयांचा भाव मिळाला. तर गोल्टी कांदाही 400 ते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वयात येण्यापूर्वीच दोन महिने अगोदर अल्पवयीन मुलीला कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळवून नेणाऱ्या सारोळे पठार येथील सतीश हरिभाऊ फटांगरे यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे हा प्रकार घडला. आरोपी सतीश फटांगरे याने फिर्यादीच्या अल्पवयीन नातीस कशाचे तरी आमिष दाखवून फिर्यादीच्या राहत्या घरातून गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पळवून नेले, अशा आशयाची तक्रार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल वायाळ तपास करत आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना अखेर मंत्रालयात कार्यालयासाठी जागा मिळाली. पाच दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अजित पवारांना मंत्रालयातील मुख्य इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर शासकीय कार्यालय देण्यात आलं आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांना मंत्रालयात नेमकं कुठलं कार्यालय देणार यावरून राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली होती. आतापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सहाव्या मजल्यावर एकच कार्यालय होते. मात्र, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मधलं कार्यालय देण्यात आलं आहे. पवार यांच्या कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी या दोघांचेही कार्यालय रिकामे करण्यात आले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रमुख जिल्हा व सत्र ‌न्यायाधीश तथा साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला…

Read More