Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज | रविवार विशेष आजच्या या तरूणी तरी कुठे आहेत हो… ध्यानावर कायम पडीक पडलेल्या फेसबुक, इन्स्टाग्रामवर घालून टिचभर कपडे मोकाट फिरती गावभर दाखवून… अंगप्रदर्शन सेल्फी काढती ढीगभर काँलेजच्या नावाखाली पोरांसोबत जाती डेटवर उघड्या बोडक्या होऊन हुदंडती खुशाल बीचवर कुणाचं काही ऐकत नाही जुमानत नाही आईबापाला म्हणे आमची लाईफ स्टाईल तुमी मधे पडता कशाला ! क्षणभंगुर सुखासाठी पोरी लागती कुणाच्याही नादाला आंधळ्या प्रेमापायी बावळ्या मुकतात कायमच्या जीवाला बाँयफ्रेंन्ड, गर्लफ्रेंड ट्रेडच्या नावाखाली चाललाय धिंगाणा जाणती असो वा अजाणती बळी पडत आहे भोगांना… संस्कार, संस्कृती विसरून चालल्या वाहवत विनाशाला सगळ्याचं नाही पण बहुतेक लागल्यात वाईट वळणाला … दोष नाही एकट्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर – भारतीय अर्थव्यवस्था सध्या ज्या वेगाने वाढत आहे. जगात या क्रमवारीत भारताने ब्रिटनला मागे टाकले असून आपला देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे प्रतिपादन एमएफडी सुनील कडलग यांनी केले. सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे स्व. सुधाकर पुंजाजी भगत यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवारी (ता.१७) चला अर्थ साक्षर होऊयात या अभियानांतर्गत, ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर कडलग बोलत होते. यावेळी लेखक, अभिनेते प्रा. राजेंद्र उगले व अरुण इंगळे यांच्या ‘माय बापाची कहाणी’ या संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितिन…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथीने सार्यांनाच अचंबित करून सोडलं आहे. राज्याच्या सत्तास्थानी कोण बसेल, मुख्यमंत्री कोण होईल आणि ज्याने राज्यातल्या राजकारणाचा खेळखंडोबा केला त्याच्यावर पश्चातापाची कशी वेळ येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. करावे तसे.. हा वाक्प्रचार या ठिकाणी चपलख बसतो आहे. हा नियतीचा खेळ आहे. नियत बदलली की जसे करावे तसे भरावे. राज्य भाजपच्या आजवर स्वत:ला सर्वेसर्वा समजणार्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या हे संकट ओढावलं आहे. सत्तेच्या सार्या नाड्या आपल्या हाती असताना आज पश्चाताप सहन करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. सत्तेसाठी जे पेरलं तेच उगवू लागल्याचं हे त्यांच्यापुढचं चित्र आहे.…
लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेत सहा महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करणारा नराधम पकडला!
पीडित मुलगी गर्भवती; अकोले तालुक्यातील घटना जर आईच्या घरी गेली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध लावण्यास यश आले आहे. मात्र या दरम्यान पीडित मुलीवर वेळोवेळी केलेल्या अत्याचारामुळे ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आकाश राजू उघडे (वय ३० वर्ष, हल्ली रा. विरगाव, ता. अकोले, मूळ रा. शेळके वस्ती, नांदुरी दूमाला ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलीचा नातेवाईकांच्या मदतीने शोध घेतला असता…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – अहमदनगर जिल्हा ओबीसी समाजाचा मेळावा उद्या रविवारी (ता.१८ जुन) सायंकाळी ५ वाजता श्रीरामपुर येथील फातेमा हाऊसिंग सोसायटीत आयोजित केले असल्याची माहिती अन्वर हाजी शब्बीर तांबोळी यांनी दिली आहे. मुस्लिम ओबीसी समाजाचा अहमदनगर जिल्हा मेळावा ऑल इंडिया ओबीसी अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अहेमद अन्सारी यांचे अध्यक्षतेखाली व नाशिक जिल्हा अध्यक्ष तनवीर तांबोळी, संगमनेर येथील शफीभाई तांबोळी यांचे प्रमुख उपस्थितीत होत आहे.या मेळाव्यात जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे. तसेच मुस्लिम ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मुस्लिम ओबीसी समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही अन्वर तांबोळी यांनी केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रक्तदानाची क्षमता हे माणसाला लाभलेले वरदान आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविता येतात आणि कितीतरी परिवारांना सावरणे शक्य होते. रक्तदानाला आपल्या संस्कृतीत सर्वोच्च दानाचे महत्त्व प्राप्त असून त्याला जीवनदान म्हणूनही ओळखले जाते. आपल्या उद्योग समूहावर नीति आणि सदाचाराचे संस्कार करणार्या दामोदरशेठ यांच्या प्रत्येक स्मृतीदिनी रक्तदानाचा महायज्ञ त्यांच्या स्मृतींना खर्याअर्थी उजाळा देणारा असल्याचे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी केले. मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय दामोदर मालपाणी यांच्या 48 व्या स्मृती दिनानिमित्त अर्पण रक्त पेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून 127 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपना मोरे व उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीबभाई शेख यांच्या सूचनेवरून या निवडी जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये शितल सदाशिव हासे यांना महिला आघाडी तालुका संघटक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. याशिवाय उज्वला कैलास गुळवे (महिला आघाडी तालुका संघटक, साकुर पठारभाग) आशा संदीप केदारी (महिला आघाडी उपजिल्हा संघटक, संगमनेर-अकोले) सुरेखा गुंजाळ (महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस) सुनिता अशोक सातपुते (महिला आघाडी उप तालुका संघटक) सोनाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज पबजी खेळाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झालेल्या ओळखीतून संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारात तरुणी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न असल्याचे घटना समोर आले आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पोलिसांनी पकडलेले दोन्ही आरोपी बिहार राज्यातील आहेत. या घटनेमागे सध्या सुरू असलेल्या लव्ह जिहाद सारखा प्रकार आहे का या दृष्टीनेही संगमनेर पोलीस तपास करत आहे. अकरम शहाबुद्दीन शेख व मोहम्मद नेमतुल्ला मोहम्मद कैसर (दोघे रा. अलीनगर, जि. दरभंगा, बिहार) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व शहर पोलीस ठाण्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज पिंपरी – आम्ही मजबूत असून सरकारची काही काळजी करू नका. असे सांगताना “एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर परिणाम होईल एवढी युती कच्ची नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शुक्रवारी थेरगाव येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार संजय भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती एका विचाराने झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन,…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई :- काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. बावनकुळे म्हणाले, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आणि आता कर्नाटक सरकारला आदेश देऊन त्यांनीच अभ्यासक्रमातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा काढायला लावला. काँग्रेसने कर्नाटकात धर्मांतर बंदी कायदा रद्द केला असून भविष्यात गोहत्या बंदीचा कायदाही रद्द करतील. त्यामुळे काँग्रेसला दिलेलं एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचं कर्नाटक उदाहरण असल्याचे बावनकुळे म्हणाले. कर्नाटकच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी किमान आता तरी उद्धव ठाकरे यांनी लंडनमधून भूमिका स्पष्ट करावी. कर्नाटकमध्ये झालेला प्रकार त्यांना मान्य…
