Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नोकरी निमित्त बाहेरगावी असलेल्या पोलिसाच्या दोन दुचाकी जाळण्याची घटना शहरालगतच्या ढोलेवाडी परिसरात घडली. घराबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञातांकडून शहरात दुचाकी जाळण्याच्या काही घटना घडल्या आहेत. यातील अज्ञात आरोपींचा शोध लावण्यास पोलिसांना अपयश आलेले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांची उकल पोलीस उपाधीक्षकांचे पथक करत असले तरी या पथकालाही दुचाकी जाळणाऱ्यांचा शोध घेता आलेला नाही. सध्या ठाण्याच्या पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या आणि भातसा धरणाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेल्या व संगमनेरच्या ढोलेवाडीमध्ये राहणाऱ्या पोलीस नाईक राजेश सावित्रा माळी यांच्या घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तींनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून स्वीकारण्यात न आल्याने लटके यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने तातडीने या संदर्भातील सुनावणी गुरुवारी निश्चित केली आहे.अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर येत्या 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे त्यासाठी ऋतुजा लटके यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. सुरुवातीला लटके यांनी निवडणुकीसाठी पालिकेकडे मुभा मागितली होती मात्र पालिकेने ती नाकारली. त्यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ठाण्यातून सुरु झालेल्या शिवसेनेच्या महा प्रबोधन यात्रेत पंतप्रधान मुख्यमंत्र्यांवरील टिका शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीची ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल व मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत या तिघांसह पाच जणांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, विनायक राऊत, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते. यावेळी अंधारे व जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती, तर राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. शिवसेना नेत्यांची ही कृती मुख्यमंत्री शिंदे यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पाण्यात वीज प्रवाहाचा धक्का लागून चार मुलांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. बर्डे कुटूंबियांवर यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून या कुटूंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन आमदार डॉ. सुधीर तांबे दिले. तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील वांदरकडा येथे एका छोट्याश्या नाल्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्यात पडलेल्या वीज तारेमुळे शॉक बसून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे येथे घटनास्थळी जात बर्डे कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मालमत्ता धारकांकडून बेकायदेशिरपणे संगमनेर नगरपालिका आकारत असलेल्या शास्तीचा विषय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आता नव्या सरकारच्या नगरविकास मंत्रालयात चर्चीला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार आणि माजी नगरसेवक शिरीष मुळे यांनी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर नगरपरिषदेकडून बेकायदेशिरपणे अनधिकृत बांधकामावरील शास्ती व त्यावर चालु आर्थिक वर्षात लावण्यात येणारी प्रतिमहिना २ टक्के शास्तीचा विषय त्यांच्यासमोर मांडला. यासंदर्भात विखे पाटील यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. संबधीत विषय नगरविकास मंत्रालयाशी संबधीत असल्याने नगरविकास मंत्रालयासोबत बैठक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज विवेक बुध्दीचा वापर न करता बलात्काराच्या याचिकेसोबत आक्षेपार्ह छायाचित्रे जोडल्याप्रकरणी न्यायालयाने एका वकीलाला पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय याचिकेसोबत छायाचित्रे जोडतांना विवेकबुध्दीचा वापर केला नाही म्हणून संबधीत वकीलाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. पतीविरोधातील बलात्काराचा गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आरोपी पतीच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. दाखल याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर यासंबधीची सुनावणी सुरु होती. सुनावणीदरम्यान याचिकेसोबत जोडण्यात आलेली आक्षेपार्ह छायाचित्रे बघितल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकीलांना याबद्दल चांगलेच फटकारले. शिवाय अशा प्रकारची छायाचित्रे जोडणे म्हणजे पक्षकाराच्या गोपनीयतेवर हल्ला असल्याचे सांगत संबधीत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला वेगवेगळ्या नावाने मान्यता मिळाल्यानंतर आता चिन्ह देखील निश्चित झाले आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘मशाल’ तर त्या पाठोपाठ मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला अखेर ‘ढाल तलवार’ हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्र्यांचे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या ‘मशाली’ला ‘ढाल तलवारी’ने प्रत्युत्तर देणार आहे.सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशा नावाने मान्यता देत त्यांना ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले होते. शिंदे गटाने दिलेले चिन्हाचे पर्याय आयोगाकडून नाकारण्यात आल्यानंतर त्यांना आज…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कट्टर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी चिन्हावरुन ठाकरे गटावर निशाणा साधत ‘आपल्याला काय घरांना आग लावायची नाही’ असा उपरोधीक टोला ठाकरेंना लगावला आहे.सध्या ठाकरे-शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या टिकेकडे लक्ष न देण्याचा सल्ला आपल्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र त्यांच्याच गटाचे मंत्री असलेल्या सत्तार यांनी हा सल्ला धुडकावत आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने परवानगी देत त्यांची नांवे निश्चीत केली आहे.ठाकरे गटाला ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे’ हे तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाचे बीडचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी समोर आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जिल्हा हादरला आहे.बियाणी यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे बियाणी यांचे हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात खासदार प्रीतम मुंडे आणि पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी देखील धाव घेतली असून बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष असलेले बियाणी यांचा जनसंपर्क मोठा आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बियाणी यांनी त्यांच्या राहत्या घरात गोळी झाडून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यभार येत्या 8 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यांनी पुढील सरन्यायाधीशपदी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे लळीत यांच्यानंतर चंद्रचूड नवे सरन्यायाधीश असतील.निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस एक महिना आधी करतात. त्यानुसार लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपत असल्याने केंद्र सरकारने त्यांना देशाच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्याविषयी विचारणा केली होती.लळीत यांच्यानंतर चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती असतील. त्यांचा कार्यकाल 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजेच दोन वर्षाचा असेल. ललित यांच्या पाठोपाठ देशाला पुन्हा मराठी सरन्यायाधीश लाभणार आहेत.…

Read More