Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | संगमनेर संगमनेर शहर पोलिसांनी दोन पिकअप वाहनांवर केलेल्या कारवाई सुमारे सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमात हस्तगत केला आहे. ६ जिवंत गोवंश जनावरांसह सुमारे दोन लाख रुपयांच्या गोमांसाचा यात समावेश आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असला तरी देखील संगमनेरमध्ये मात्र या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन सुरूच आहे. याला स्थानिक पोलिसांचे देखील पाठबळ मिळत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेकडोने टाकलेल्या छाप्यानंतर देखील येथील बेकायदा कत्तलखाने अद्याप बंद झालेले नाहीत. वारंवार टाकले जाणारे छापे आणि या छाप्यामध्ये निष्पन्न होणारे तेच तेच आरोपी यामुळे पोलिसांची कार्यपद्धतीच संशयास्पद बनली आहे. प्रत्येक कारवाईमध्ये आरोपी फरार असल्याचे दाखविले जाते. त्यामुळे पोलीस अशा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  नाशिक / अहमदनगर  नाशिक पदवीधर मतदार संघासाठीच्या जाहीर प्रचाराचा तोफा शनिवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या आहे. पदवीधर साठी येत्या सोमवारी (ता.३०) तारखेला नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान होत आहे. निवडणूक प्रचारामध्ये सोशल मीडियाचा यावेळी मोठा बोलबाला दिसून आला. काही माध्यमातील एकतर्फी बातम्या पदवीधरांनी फारशा गांभीर्याने घेतल्या नसल्याचे दिसून आले. पेड नावाचा विकृतीचा राक्षस याही निवडणुकीत दिसून आल्याच्या भावना मतदारांनी व्यक्त केल्या. सोशल माध्यमातून अनेक पदवीधरांनी आपली भूमिका जाहीरपणे व्यक्त केली. या निवडणुकीतील मतदार हा संपूर्णतः सुशिक्षित आणि पदवीधर असल्याने चांगल्या-वाईटाची जाण या मतदारांमध्ये दिसून आली. नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये 16 उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | पुणे पुण्याच्या न्यायालयाने शुक्रवारी एक महत्त्वाचा निवाडा केला आहे. मोहसीन शेख या तरुणाची हत्या केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई व संघटनेच्या २० जणांची निर्दाेष सुटका केली. सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तेव्हा धनंजय देसाईने चिथावणीखोर भाषण केले होते. त्यानंतर शेख हा त्याचा भाऊ व मित्रांसह हडपसर येथील एका मशिदीत जात होता. तेथे बाईकवरून काहीजण आले. शेखच्या डोक्यावर टोपी होती. एवढ्या एका कारणावरुन शेख व त्याच्या मित्रांवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. शेखला बॅटने मारहाण झाली. या मारहाणीत शेखचा मृत्यू झाला. हडपसर येथे २ जून २०१४ रोजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : देशाच्या सुरक्षेसाठी ज्याप्रमाणे लष्कराचे जवान प्राणाची बाजी लावतात, त्याचप्रमाणे औद्योगिक सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत महत्त्वाची असते. सुरक्षा विभागाच्या अचूक कामगिरीमुळे उद्योगधंदे, कारखाने सुरक्षित राहून प्रगती करु शकतात. त्यामुळे दरवर्षी प्रजासत्ताक दिनी मालपाणी उद्योग समूहातील सुरक्षा जवानांचा विशेष सन्मान करण्याची पद्धत आपण जोपासली. आजच्या दिवशी आपण देशातील सुरक्षा यंत्रणांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतांनाच आपला देश प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी यांनी केले. प्रजासत्ताक दिनी मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये त्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यवस्थापक रमेश घोलप, मानव संसाधन विभागाचे प्रमुख शिवाजी आहेर, उत्पादन विभागाचे प्रमुख…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच ते माझे नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना कोणताही आदेश देऊ शकत नाही. मात्र त्यांच्याशी झालेल्या संभाषणानुसार ते पक्षासोबत आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय आहे याबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा जाहीर केलेला नसताना काँग्रेसकडूनही थोरात यांची भूमिका अशा पद्धतीने स्पष्ट करण्यात आली आहे. प्रत्यक्षात थोरात यांनी मात्र अद्याप नाशिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : बोली भाषेचा वापर कमी होऊ लागल्याने गेल्या काही वर्षात बोलीभाषा लोप पावत चालल्या आहेत. अशावेळी भाषेचा विचार मनामनात आणि घराघरात रुजविण्याची आवश्यकता असून मराठी भाषा संवर्धनासाठी आणि मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. असल्याचे प्रतिपादन राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना समितीचे सदस्य संदीप वाकचौरे यांनी केले. संगमनेर तालुका वकील संघ आणि तालुका विधी समितीच्या वतीने संगमनेर न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या भाषा संवर्धन दिनी वाकचौरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. आमेठा होते. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश वाय. पी. मनाठकर, न्यायाधीश डी. आर. देशपांडे, न्यायाधीश एम. एम. शेख, न्यायाधीश एस. एस. बुद्रुक,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनेत मोठे बंड करत ४० आमदारांना सोबत घेत भारतीय जनता पक्षाच्या साथीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना अद्याप लोकप्रियता लाभल्याचे या सर्वेक्षणातून दिसत नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र देशातील टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीत यावेळी महाराष्ट्राचा नंबर घसरला आहे. तसेच, राज्यात आता लोकसभेची निवडणूक झाल्यास युपीएला ३४ जागांवर विजय मिळेल, असे इंडिया टुडे सी वोटरने (India Today-C Voter) केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. इंडिया टुडे सी वोटरने केलेल्या ‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षणात देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : नासिक-पुणे महामार्गालगत बस स्थानकाजवळ गुरुवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्याच्या घरातील व्यक्तींना मारहाण करत सुमारे अडीच लाखाच्या रोकड रकमेसह साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. शहरातून जाणारा नासिक-पुणे महामार्ग प्रचंड वर्दळीचा असून बस स्थानकापासून काही अंतरावर सह्याद्री विद्यालया शेजारी असलेल्या व्यापारी केदारनाथ भंडारी यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. महामार्गापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर पडत असलेल्या या दरोड्याची चाहूल देखील कोणाला लागली नाही. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने भंडारी यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी घरामध्ये भंडारी यांच्या पत्नी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नेवासा : साहेब, वरखेड गावात खून झालाय. ११२ नंबरवर आलेल्या या गंभीर प्रकाराची दखल पोलीस यंत्रणेने लगेचच घेतली. आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. मात्र कोणाचाही खून झालेला नसून आपल्याला मिळालेली माहिती चुकीचे असल्याची पथकाची खात्री पटली. आणि चुकीचा फोन करणारा थेट तुरुंगात पोहोचला. प्रजासत्ताक दिनाची धामधूम सुरू असताना सकाळीच नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर ७ वाजून ४९ मिनिटांनी फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने नेवासा तालुक्यातील वरखेड गावामध्ये खून झाला असल्याची माहिती पोलिसांना दिली. खुनाचा गंभीर प्रकार असल्याने तातडीने नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पोलीस उपनिरीक्षक मोंढे, पोलीस नाईक संजय माने,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राहाता : कोंबड्यांची शिकार करण्यासाठी कोंबड्याच्या जाळीमध्ये शिरलेल्या बिबट्याने कोंबड्यांसोबतच शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रकार राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे समोर आला आहे. जखमी शेतकऱ्यावर शिर्डीच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदनगरला हलविण्यात आले आहे. बबन बाजीराव ढगे (वय ६५ वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री ढगे नेहमीप्रमाणे झोपलेले होते. रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घराजवळ असलेल्या कोंबड्यांच्या जाळीतील कोंबड्या जास्त आवाज करू लागल्याने त्यांनी कोंबड्यांच्या जाळीकडे धाव घेतली. जाळी जवळ गेल्यानंतर त्यांना कोंबड्यांच्या जाळीमध्ये बिबट्या शिरला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने जाळीचा दरवाजा उघडला. मात्र बिबट्याने लगेचच त्यांच्यावर हल्ला…

Read More