Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज लहान बालकांमध्ये राज्यभरात गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये गोवर लसीकरण व गोवर आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. संगमनेर मधील सामाजिक कार्यकर्ते आणि नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलीस मित्र फाउंडेशनचे संगमनेर शहराध्यक्ष मन्सूर चांदभाई शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. राज्यभरात बालकांमध्ये गोवर साथीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नवजात बालकापासून पाच वर्षे वयोगटातील बालकांना याचा सर्वाधिक धोका आहे. यात अनेक बालकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे संगमनेर शहरासह तालुक्यात सर्वत्र लहान…
महाराष्ट्र संवाद न्यूज घरामध्ये चहा करणाऱ्या महिलेला पाठीमागून येत आरोपीने कवळी घालत तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच दुसऱ्या महिलेने संबंधित महिलेला चावा घेत लाथा बुक्क्याने मारहाण केल्याप्रकरणी तालुक्यातील नान्नज दुमाला येथील दोघा आरोपींविरोधात विनयभंग व मारहाणीचा संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने घुसत तिला पाठीमागून कवळी घालत शारीरिक संबंधाची मागणी केली फिर्यादीने आरोपीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीची साडी ओढून तिच्याशी पुन्हा लज्जास्पद वर्तन करण्यास सुरुवात केल्याने फिर्यादीने त्यास विरोध केला असता आरोपीने तिला शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने मारहाण केली. फिर्यादीच्या मुलीचा आरडाओरडा ऐकून तेथे आलेल्या दुसऱ्या महिला आरोपीने फिर्यादीच्या हनुवटीवर…
कंपनीच्या प्राध्यापकासह चार जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र संवाद न्यूज संस्थेची माहिती विद्यापीठाकडे विचारल्याचा राग आल्याने तरुणाला प्राचार्यांच्या दालनात अडीच तास डांबून ठेवत दमबाजी करण्यात आल्याने तसेच पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने विद्यार्थी बेशुद्ध पडला व त्याला पालकांच्या ताब्यात देण्यास दिरंगाई केल्याच्या कारणावरून, तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना धमकी दिल्याच्या कारणावरून तालुक्यातील पारेगाव येथील बाप कंपनीच्या प्राध्यापकांसह काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या कंपनी संबंधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील बाप कंपनीमध्ये पाथर्डी तालुक्यातील हनुमान अण्णा गर्जे या बावीस वर्षे तरुणाने…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील एका डॉक्टरने संस्थेमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून डॉक्टर विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. २९ नोव्हेंबरच्या रात्री साडेआठ वाजता गोल्डन सिटीमधील प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी संस्थेमध्ये हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. आरोपीने या मुली बाथरूममध्ये जावून काय करतात असे विचारणा करत तिचा विनयभंग केला तसेच उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय करणार असे म्हणत चल माझ्या गाडीत बस, असे विचित्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचे सारथ्य केले. निमित्त होते, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धीच्या नागपूर ते शिर्डी या महामार्गाच्या पाहणीचे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा हा पाहणी दौरा सायंकाळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे सांगणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या विधानाबद्दल ट्विटरद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एवढ्या गंभीर चुकीसाठी व्हिडीओ ट्विट करत त्यांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितलीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आमदार लाड यांनी छत्रपतींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली असून यामुळे राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. छत्रपती संदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष आधीच अडचणीत सापडला असताना लाड यांचे वक्तव्य पक्षासमोर अडचणी निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार लाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड करत त्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालाय. हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर “छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे ठरवून चाललंय का? औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. करारा जवाब मिलेगा असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं अजब विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार संजय…
महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या ट्विटर हँडल वरून यासंबंधीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लाड यांच्या या वक्तव्याने राज्यात पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरून राज्यात सुरू असलेली वादाची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाही. विशेष म्हणजे हा वाद भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पेटला आहे. छत्रपती विषयी अवमानकारक बोलणाऱ्या भाजपच्या वाचाळवीरांमध्ये आता प्रसाद लाड यांची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. राज्यपाल पदावरील…
रविवार विशेष एसएमबीटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर व प्रा. डॉ. सुदर्शन सिंग यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. या पेटंटचे पुढील २० वर्षांपर्यंत ‘एसएमबीटी’कडे अधिकार राहणार आहेत. या संशोधनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. लहानपणी घरातील वृध्द आजीबाई काही दुखत असल्यास जायफळ व तेल यांचे मिश्रण शरीरावर लावत असे. त्याच संकल्पनेतून जायफळात नेमके काय असावे? याचा शोध डॉ. उशीर व त्यांच्या समूहाने घेतला. अनेक वर्षे बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास सुरु होता. दरम्यान, जायफळात अशी काही गुणसत्व आहेत जी…
महाराष्ट्रात भाजपाने शिंदे गटाशी युती केल्यानंतर अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने विधान केले, खरंतर त्यांनी समान नागरी कायदा हा लोकसंख्या नियंत्रणाच्या कामी गरजेचा असल्याचे म्हटले आहे. गुजरात निवडणूकीनंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याचे संकेत दिले. भारतात गोवा राज्यामध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. उत्तराखंड राज्यांमध्ये सदर कायदा मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. आता त्यापाठोपाठ महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. हा कायदा भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. खरंतर हा कायदा काय आहे, त्याबाबत अनेक अफवा, समज- गैरसमज…
