Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर – शिर्डी परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. शिर्डीतील हॉटेल रेणुका जवळील काटवनात दबा धरून बसलेल्या या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी दीपक किसन जाधव (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) यांचा मुलगा निलेश हा शिर्डीहून सावळविहीर येथे जात होता. यावेळी आरोपी पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख आणि त्याच्या साथीदारांनी निलेशला रस्त्यात अडवले. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय…
संगमनेर, प्रतिनिधी- तळेगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून संगमनेरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, काँग्रेसने सत्ताधारी विखे-खताळ जोडीवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद पडलेली असताना पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. या निव्वळ दुर्लक्षामुळेच १६ गावांवर तहानेची वेळ आली असून, या वाताहतीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळच पूर्णतः जबाबदार आहेत. आता निवडणुका जवळ आल्यावर जनतेचा रोष पाहून यांना योजनेची आठवण झाली का? असा जळजळीत सवाल काँग्रेस पदाधिकारी सचिन दिघे यांनी उपस्थित केला आहे. सचिन दिघे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ही योजना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळाल्याने गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल, मात्र घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. विचारांमध्ये…
नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहीर केलेल्या किती योजना प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्या याचा विचार केला तर देश किती मागे सरकतो आहे, याचं वास्तव लक्षात येईल. 2014 नंतर देशात झालेल्या बदलाचा काळ हा नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचा काळ असल्याचा आव आणणार्या कंगना राणावत हिच्या वक्तव्याची लोकांनी चिरफाड केली तरी सरकार मात्र त्याच मानसिकतेत कारभार हाकत असल्याचं चित्र आहे. योजना जाहीर करायच्या. त्यांचं पुढे काय होतं, याचा विचार ना सरकार करत ना त्यांना कोणी जाब विचारत. आता तर जाब विचारायचं स्वातंत्र्यच कोणाला राहिलेलं नाही. जनतेला लुभावण्यासाठी सरकारने नऊ योजना जाहीर केल्या. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घातले. पण त्यातून बाहेर आला मोठा भोपळा. प्रकल्प जसजसे…
संगमनेर | प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापले असून विकासकामांच्या श्रेयावरून आता थेट ‘क्रेडिट वॉर’ सुरू झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात ज्या विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे, ती सर्व कामे मुळात लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेली आहेत. हा सर्व प्रकार निव्वळ ‘स्टंटबाजी’ असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, अशी घणाघाती टीका संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या वागण्यामुळे संगमनेरच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला छेद दिला जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. अजय फटांगरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला…
श्रीरामपूर – राजकारणात यश मिळवणे सोपे असते, पण संघर्ष आणि अपमानातून तावून सुलाखून निघत जनमाणसात स्थान निर्माण करणे कठीण असते. श्रीरामपूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाची दखल घेत राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) वतीने त्यांचा नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. करण ससाणे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केल्यास, त्यांची ही वाटचाल अतिशय खडतर राहिली आहे. अनुराधा आदिक नगराध्यक्ष असताना करण ससाणे यांना उपनगराध्यक्षपद मिळाले होते. राजकारणात नवखे असतानाच त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला; त्यांचे वडील आणि आधारस्तंभ माजी आमदार जयंतराव ससाणे यांचे निधन झाले. या दुखाच्या काळात सावरत असतानाच त्यांना…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे मोठी क्रांती होणार आहे. यामुळे कामाच्या पद्धती आणि नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार असले, तरी नवीन संधींची दारेही उघडणार आहेत. म्हणूनच प्रत्येक तरुणाने या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. एआयच्या युगात जे सातत्याने शिकतील, तेच टिकतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि संशोधक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था आणि ‘डबल डेकर ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील चर्चासत्रात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, एआय तंत्रज्ञ डॉ. सुयश गुंजाळ, दुर्गाताई…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज- राजकारणात विजय मिळाला की गुलालाची उधळण आणि गल्लोगल्ली फ्लेक्स लावून शक्तिप्रदर्शन करण्याची परंपरा आहे. मात्र, संगमनेरमध्ये या परंपरेला छेद देत एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करत, सेवा समितीने ऐतिहासिक विजयानंतरही एकही फ्लेक्स न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील बसस्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांनी अक्षरशः ‘मोकळा श्वास’ घेतला असून, केवळ फ्लेक्सबाजी करणाऱ्या पुढाऱ्यांना ही मोठी चपराक मानली जात आहे. शब्दाला जागले आमदार!- निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी शहराचे विद्रूपीकरण थांबवण्याचे आश्वासन दिले होते. केवळ आश्वासनच दिले नाही, तर…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, कारण अचानक खर्च उद्भवू शकतात. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन: व्यापार आणि व्यवसायात आज तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा जवळच्या व्यक्तींसोबत विनाकारण वाद होऊ शकतात. अभ्यासात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क: आज तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरामाला…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ५१ कोटी ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचा आज शुभारंभ होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवारी, (२७ डिसेंबर) हा सोहळा पार पडणार असून, या निमित्ताने तालुक्यात महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून तालुक्यातील निळवंडे, तळेगाव, मालदाड, गुंजाळवाडी, वडगाव लांडगा, धांदरफळ खुर्द, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि पिंपरणे या गावांमध्ये विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडणार आहे. यामध्ये…
