Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात आता पूर्वीचे सरकार राहिलेले नाही, त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर तो नियमात राहूनच करावा लागेल. आधी राज्यांमध्ये गुंडाराज सरकार होते, आता मात्र चांगले सरकार सत्तेवर आल्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिले आहे. आव्हाड यांच्या विरोधात ज्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, त्या संदर्भात अधिक भाष्य न करता त्यांनी याबाबत तिच्याशी बोलेन त्यानंतरच यावर बोलणे उचित राहील असे त्या म्हणाल्या. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत नाहीये, त्यामुळे कोणते खोटे होणे आता दाखल होणार नाही हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपत असतांना करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाचा वर्षाच्या आतच बोजवारा उडाला आहे. रस्ते बनवितांना पुरेसे डांबर न वापरल्याने खडी उघडी पडली, क्रॉक्रीटीकरण करतांना निकृष्ठ व पुरेसे सिमेंट वापरले नाही. जे रस्ते किमान पाच वर्ष टिकणे अपेक्षित होते, त्याची वर्षातच दुरवस्था झाल्याचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रस्ते निरीक्षण पाहणीत समोर आले. येत्या निवडणूकीत रस्त्याचा विषय कळीचा मुद्दा बनविण्यासाठी त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. रस्ते निरीक्षण पाहणी अभियानात भाजपाचे माजी नगरसेवक व शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक शिरीष मुळे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, माजी उपनगराध्यक्ष व शहर संगठन सरचिटणीस जावेद जहागीरदार, उपाध्यक्ष सुनील खरे, भाऊ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण सुरू असून वाढलेली महागाई, बेरोजगारी याविरुद्ध आवाज उठवत प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडीयात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार असल्याचे गौरवोद्गार भारत जोडो यात्रेचे समन्वयक कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. खासदार राहुल गांधी यांची ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ ही सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या तयारीचे व नियोजन जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते आमदार थोरात यांचेवर असून ते यात्रेचे समन्वयक आहेत. थोरात म्हणाले, भारत जोडो यात्रेमध्ये देशभरातील पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्र पक्षांचा मोठा पाठिंबा लाभत आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क हे कायद्याचे राज्य आहे. सरकार नियमानुसार चालते. लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाऊ शकते. परंतु कायदा हातात घेणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड विनयभंग प्रकरणावर दिला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नासिक-मुंबई महामार्गावर जाळपोळ करण्यात आली, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव पोलिसांवर नाही. तसा दबाव टाकला ही जाणार नाही. पोलीस नियमानुसार गुन्ह्याची चौकशी करतील. तपास करतील, पडताळणी करतील. जी काही तक्रार असेल त्यात तर त्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास मी तीन सहकारी नगरसेविकांसह बिनशर्त शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. अशा आशयाचे पत्र नाशिकच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. विरोधकांवरच गुन्हे दाखल होत असून त्यांच्यावरच सरकार सूडबुद्धीने कारवाई करतय असा आरोप होत असतानाच आता नाशिकच्या ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेविकेने यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या पत्राद्वारे लक्ष करत त्यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांच्या या उपरोधिक पत्राची आता चांगलीच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मागील दहा वर्षांपासून पुणे विद्यापीठाचे पदव्युत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचे वर्ग चालविले जातात. नुकताच सन २०२१ -२२ या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे आणि पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेची पदवी असलेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली आहे. ज्येष्ठ मुक्त पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दहा वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरु आहे. पत्रकारिता करू इच्छिणाऱ्यांबरोबरच शिक्षक, वेगवेगळ्या आस्थापनात प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करणारे किंवा करू इच्छिणाऱ्यांना हा पदविका अभ्यासक्रम उपयुक्त आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम लेखन कौशल्य, दूरचित्रवाणीवरील विविध…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून संगमनेर पंचायत समितीने तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या थकलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीची तब्बल साठ लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळविले आहे अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारची वसुली करण्यात संगमनेर पंचायत समिती अव्वल ठरली. गावच्या विकासात ग्रामपंचायतीचे योगदान महत्वाचे आहे. त्याकरीता घरपट्टी व पाणीपट्टीची वसूली देखील महत्वाची आहे. जनतेने सदरचा कर वेळेत भरल्यास विकासाच्या प्रक्रियेला हातभार लागण्यास मदत होते. नागरिकांनी कोणत्याही सरकारी कराचा भरणा करणे त्यांच्या हिताचे असते, मात्र ग्रामपंचायतीचा घरपट्टी, पाणीपट्टीचा कर थकविणारे अनेक महाभाग आहेत. वारंवार मागणी करून देखील घरपट्टी पाणीपट्टीचा भरणा न करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील १०२२० खातेदारांविरोधात थकबाकीचा भरणा करण्यासंबंधीच्या नोटीसा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा काही वेळापूर्वीच ट्विटरद्वारे केली आहे. जितेंद्र आव्हाड या घोषणेने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४… मी ह्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे… लोकशाहीची हत्या… उघड्या डोळ्याने नाही बघू शकत, असं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे. आव्हाड यांनी नुकतच ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा दावा करत काही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि टोल प्रशासना विरोधात संगमनेर मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या उपोषणाला आठवडा उलटत नाही तोच महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात आता खासदार अमोल कोल्हे संतप्त झाले असून त्यांनी थेट या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाईल क्रमांकाचे फलक लावण्याचा इशारा दिला आहे. नासिक-पुणे मार्गाचे चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे तसेच या मार्गावरील टोल नाके देखील सुरू झाले असून वाहन चालकांकडून टोल असलेली सुरू झाली आहे. मात्र या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहन चालकांचे हाल होत आहे. यातून अपघाताच्या देखील अनेक घटना घडल्या. अनेक जण जायबंदी झाले तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले. महामार्गावर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. महा विकास आघाडी सरकारच्या काळातील चुकांमुळे राज्यात येऊ घातलेले औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडले जात असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना उद्योजकांशी काहीही देणे-घेणे नव्हते. शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळणारे ठाकरे बोलत नव्हते म्हणून त्यांचे आमदार देखील त्यांना सोडून गेले तर त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यातील उद्योग बाहेर का जाणार नाही असा प्रश्न उपस्थित केला. राज्यात गुंतवणूक व्हायचे असेल तर उद्योजकांचे चर्चा…

Read More