Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन| संगमनेर: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ आणि अत्याचारीत सर्वच बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने भव्य ‘कॅन्डल मार्च’ काढण्यात आला. संगमनेर बसस्थानक परिसरातून निघालेल्या या मोर्चात महिला आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. कॅन्डल मार्च प्रांत अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर येथे उपस्थित लहान मुलींच्या हस्ते प्रांताधिकारी अरुण उंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेचा निषेध करत नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली.…

Read More

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ मतांच्या विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत त्यांना एकूण २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या २२ उमेदवारांसह ‘नोटा’ला केवळ ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत प्रस्थापित केलेला १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडीत काढला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र २२ अपक्ष उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत केलेले नियोजन यशस्वी होईल, मात्र अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम राखावा लागेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. व्यवसायात भागीदारांकडून चांगले सहकार्य मिळेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासाचे योग येतील. मिथुन: आजचा दिवस धावपळीचा राहू शकतो. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील, पण निर्णय घेताना घाई करू नका. नातेवाईकांशी जुन्या मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात…

Read More

छत्रपती शिवरायांचे गुरू कोण? ते शिवकालीन लढायांचे सूत्रधार कोण? याविषयींच्या वायफळ चर्चा घडवून आणणार्‍या बुवा आणि बाबांचा कोण सुळसुळाट सध्या देशाभर आहे. येनकेन प्रकारेन छत्रपतींच्या मागे त्यांच्या पुण्याईला किंमत न देण्याची ही स्पर्धा होय. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा जो काही पराक्रम केला तो ब्राह्मणांच्या सहभागाशिवाय नव्हता, असं दाखवण्याची सुरू असलेली अहमहिका ही केवळ छत्रपतींची बदनामीच नव्हे, तर त्यांना कमी लेखण्यासाठी केलेला कटच होय. शिवरायांविषयी गरळ ओकणार्‍यांबाबत सत्ताधारी सातत्याने मूग गिळून राहिल्याने त्याचा गैरफायदा देशातील शिवरायांच्या द्वेषींनी घेतला. वादग्रस्त टिपण्ण्या करायच्या आणि सत्ताधार्‍यांना अडचणीत आणणार्‍या वातावरणापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न होय. मग कधी राज्यपाल यावर बोलत, तर कधी मंत्री.…

Read More

मुंबई: महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून, या संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल सरकारने तातडीने सार्वजनिक करावा, अशी आग्रही मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने १६ मार्च २०२६ रोजी आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानंतर १० एप्रिल रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन करून जनतेकडून ३० एप्रिलपर्यंत यावर आक्षेप आणि मते मागवण्यात आली होती. मात्र, ज्या अहवालावर मते द्यायची आहेत, तो मूळ अहवालच सरकारने अद्याप लोकांसमोर ठेवलेला नाही, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे. या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित…

Read More

अहिल्यानगर: जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत टंचाईग्रस्त भागांवर सतत देखरेख ठेवली जात असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३४ गावे आणि १६२ वाड्या-वस्त्यांना ३० टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका संगमनेर, पारनेर आणि नगर तालुक्यांना बसला असून तेथे अनुक्रमे १०, १३ आणि ६ टँकर तैनात करण्यात आले आहेत. एकूण ६४ हजार ५८६ नागरिक या टँकर सुविधेवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाने टँकरच्या खेपांचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे केले असून मंजूर ९०.९२ खेपांपैकी ८८ खेपा पूर्ण केल्या जात…

Read More

मुंबई: नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले आहे. पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हा चाकणकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आणि प्रतिभा चाकणकर यांच्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे संशयित व्यवहार आढळले आहेत. समता नागरी सहकारी पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांशी संबंधित सुमारे ३ ते ५० कोटी रुपयांची उलाढाल प्रतिभा चाकणकर यांच्या बँक खात्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, याच पतसंस्थेत…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सुखद राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना संयम ठेवा. वृषभ: आज तुम्हाला भाग्याची खंबीर साथ मिळेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यातून भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांशी संवाद साधताना वादाचे प्रसंग टाळा. गुंतवणूक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक भोंदू कॅप्टन अशोक खरात याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याला पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले. अवतार पूजेच्या नावाखाली व्यावसायिकाला एक कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या अशोक खरातला न्यायालयाने चार मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. व्यवसाय जगभरात विस्तारण्याच्या इच्छेचा गैरफायदा घेत आरोपी खरातने एका व्यावसायिकाला १ कोटी ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले. आहे. आरोपीने फिर्यादीला ‘अवतार पूजा’ करण्याचे आमिष दाखवून ईशान्येश्वर मंदिर परिसरात बोलावले आणि तिथे बनावट साप दाखवून मृत्यूची भीती घातली. ही पूजा पूर्ण करण्यासाठी २१ देशांत जावे लागेल, अन्यथा नागदंश होऊन मृत्यू होईल, अशी भीती…

Read More

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच केंद्र सरकारने सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे आपले क्रूर धोरण पुन्हा एकदा राबवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका संपताच महागाईचा भडका उडाला असून, १ मेपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि रेस्टॉरंट चालकांचे कंबरडे मोडले असून, ऐन उन्हाळ्यात महागाईची ही झळ जनतेला सोसावी लागणार आहे. व्यावसायिक सिलेंडर मध्ये झालेल्या दरवाढीचा फटका आता सामान्य कुटुंबाच्या हॉटेल आतील खाद्यपदार्थांना बसणार आहे. नव्या दरवाढीनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता ३०७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही हे…

Read More