Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : अवकाळी पावसाने अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगलीसह काही भागाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. होळीचा सण राज्यभर साजरा होत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने राज्याच्या बहुतांश भागात थैमान घातले आहे. त्यामुळे अवकाळीच्या नुकसानीची आकडेवारी समोर आल्यानंतर मदत केली जाईल असा आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. अवकाळी पावसामुळे गहू, द्राक्ष, हरभरा, मूग अधिक शेती पिकांचे प्रचंड नुकसान होऊन पिके भूईसपाट झाले आहेत. त्यामुळे दुर्दैवाने अवकाळी पावसाचं शेतकऱ्यांवर संकट आले आहे, अशी भावना विखे पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारची भूमिका…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : आधार धारकांनी आधार नोंदणी केल्यापासून गेल्या दहा वर्षामध्ये एकदाही स्वतःच्या आधारमध्ये कोणतीही दुरुस्ती अथवा अद्यावतीकरण केलेले नाही, अशा आधार धारकांनी आपली माहिती अद्यावत करण्यासाठी गरजेचे असल्याने नागरिकांनी आपली माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या सद्यस्थितीतील अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात 17 लाख 49 हजार 888 आधार धारकांचे आधार माहिती अद्यावत करणे बाकी आहे या आधारधारकांनी स्वतःचे ओळख व पत्त्याचा पुरावा देऊन आधार अद्यावतीकरण करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नागरिकांना जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन आधार माहितीचे अद्यावतीकरण करावे लागणार आहे. अथवा नागरिकांना स्वतः my Aadhaar…
महाराष्ट्र संवाद न्यूज शहादा (जि. नंदुरबार) मी अपक्ष आमदार आहे आणि अपक्षच राहणार असून कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही आहे. मला खात्री आहे या संदर्भात राज्य सरकार आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यातून चांगला मार्ग काढतील. या योजनेसाठी राज्य सरकारवर आपण दबाव आणण्याचे काम करणार आहोत, असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशन आदरणीय दोन दिवसाच्या सुट्टीत तांबे मतदारांचे आभार मानण्यासाठी मतदार संघात आले होते. यावेळी शहादा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आपण आग्रही राहणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत पहिल्या चर्चेत आपण हा मुद्दा देखील मांडला असल्याचे आठवण त्यांनी पत्रकारांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज अवघ्या महाराष्ट्राचे आकर्षण आणि पर्यटक, गिर्यारोकांचे साहस केंद्र असलेल्या अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात १३० प्रजातीचे पक्षी आढळून आले आहेत. कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्यात पहिलेच पक्षी सर्वेक्षण २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान पार पडले. हे सर्वेक्षण कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य, वन्यजीव विभाग नाशिक आणि आऊल कन्सर्वेशन फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आले. यामधे महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील १६ पक्षी निरीक्षक सहभागी झाले होते. अभयारण्याच्या दोन वनपरिक्षेत्रामध्ये प्रत्येकी ४ असे अभयारण्य मिळून ८ मार्ग आखण्यात आले होते. हे मार्ग उंच-सखल जंगला नुसार कमीत कमी २ ते जास्तीत जास्त ५ किलोमीटर असे आखण्यात आले होते. सहभागी झालेल्या पक्षी निरीक्षकांनी वनरक्षक आणि वनमजूर यांच्या सहकार्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्र व गोवा या राज्यातील महिलांसाठी महिला दिनाच्या निमित्ताने ‘खेलो इंडिया – दस का दम’ या नावाने योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या 12 मार्च रोजी पुण्यातील सूस येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारच्या या स्पर्धा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. वय वर्ष 9 ते 18 आणि 19 ते 55 अशा दोन गटात होणार्या या योगासन स्पर्धेत पारंपरिक व कलात्मक या दोन क्रीडा प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारात महाराष्ट्र आणि गोव्यातील कोणत्याही महिला स्पर्धकाला सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी तयार केला गेलेला अभ्यासक्रम नॅशनल योगासन…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात केलेले ट्विट एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुंबईतील सार्थक कापडी या तरुणा विरोधात नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापडी हा युजर मुंबईतला असून तो उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. असं सांगण्यात येत आहे. “एकनाथ शिंदे तुला हे सर्व इथेच भोगाव लागणार आहे तुला xxxxx असेल ना तर निवडणुका घेऊन दाखव xxxxxxxx. एकनाथ शिवरायांच्या आशीर्वादामुळे नाही तुझा xxx बसलाय ना दिल्लीत त्याच्या आशीर्वादाने तुला धनुष्यबाण भेटला आहे”, असं त्याने या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. तसंच “चंद्रकांत पाटील चंपा तुझी लायकी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यामध्ये मातृ-पितृ पूजन या उपक्रमाचे आयोजन करून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नको असा संदेशच जणू दिला. शाळेत चिमुकल्यांनी आई-वडिलांचे पूजन करून आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आगळावेगळा दिन साजरा केला. आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सद्यस्थितीत पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत आहे. व्हॅलेंटाईन डे, रोज डे, हग डे असे वेगवेगळे डे साजरे करण्यासाठी तरुणाई पुढे सरसावत आहे. मात्र, आपली भावी पिढी सात्विक आणि सुसंस्कृत व्हावी यासाठी चिमुकल्यांना चांगले संस्कार मिळावे या उदात्त हेतूने देशमुख मळा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांच्या पुढाकाराने मातृ-पितृ पूजन व बाल…
वाळू माफीयांवरील कारवाई कोणाला दडपशाही वाटत असेल तर, मला त्याची फिकीर नाही: महसूल मंत्री विखे पाटील
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : वाळू माफीयांवरील कारवाई कोणाला दडपशाही वाटत असेल तर, मला त्याची फिकीर नाही. माफीयांच्या तावडीतून प्रवरामाई मुक्त केली याचे समाधान मला आहे. या वाळूच्या विरोधात आदरणीय खासदार साहेबांनी सुध्दा मोठा संघर्ष केला. त्याच विचाराने आपण या अवैध वाळू तस्करीला लगाम घातला असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील जोर्वे येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे १४ कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. निवृत्त पोलीस अधिकारी हरीभाऊ कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, शहर…
होळी विशेष ● रवींद्र एरंडे अस्सल संगमनेरी बोंबाबोंब ऐकायची आणि सहन करायची असेल तर, संगमनेरच्या होळीमध्ये सामील व्हायला हवं. बदलत्या काळानुसार होळी उत्सवात बदल झाला असल्यास तरी जुन्या होळीच्या आठवणी कायम आहेत. होळी साजरं करणारं मंडळ आठवड्यापासूनच तयारीला लागतं. पूर्वी लहानपणी घरोघरी फिरून गोवर्या (गवर्या) मागीतल्या जात. वखारीतून लाकडं आणली जात, सायंकाळी होळीभोवती शेणसडा, रांगोळी, पूजा करुन होळी पेटवली जायची. मग गल्लीतल्या बायाबापड्या पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन यायच्या. तांब्यातील पाण्याने प्रदक्षिणा मारायची. खोबर्याची वाटी जाळायची.त्याचा प्रसाद वाटायचा. “होळीच्या गवर्या पाच पाच…होळीपुढं नाच नाच” असा सूर निघायचा. तो साधारणतः साडे आठ पर्यंत… नंतर होळकरी पोरं टप्प्याटप्प्याने घरी जेवण करुन यायची आणि मग…
महाराष्ट्र संवाद न्यूज कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना रडविले असताना आता कांद्याचा प्रश्न पेटला असल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. कमी कांद्याच्या उत्पादनामुळे जगातील अनेक देशांना रडवत असलेला कांदा आता मात्र आपल्या राज्यात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना रडवत असल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पारनेरमध्ये आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन झाले असतानाच आता राज्यात कांदा प्रश्नी शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होताना दिसू लागला आहे. एकीकडे विरोधकांनी या प्रश्नी सभागृहात आवाज उठवताना आता आंदोलने देखील सुरू केले आहे. अशातच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री…
