Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज वाळू लिलावासाठी शासनाच्या नवीन धोरणाची लवकरच अंमलबजावणी सुरू होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती नियुक्त करण्यात येणार आहे. सरकारच्या यंत्रणेमार्फतच वाळूचे डेपो उभे करून ऑनलाईन पद्धतीने वाळू दिली जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर वाळूचे लिलाव होणार नाहीत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महसूल यंत्रणेच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीत मंत्री विखे बोलत होते. त्यांनी जनावरांच्या लम्पी स्किन संदर्भात देखील आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जळगावचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, नंदूरबारचे प्रभारी जिल्हाधिकारी महेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज मागील अडीच वर्षात महिलांच्या बाबतीत अनेक गैरप्रकार घडले होते. मात्र आता राज्यात शिंदे–फडणवीस यांचे सरकार असल्याने तेव्हा महिलांशी गैरवर्तन करणार्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत महिलांशी संबंधित प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालय सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. महिला मोर्च्याचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर वाघ प्रथमच ठाण्यात आल्या होत्या. ठाणे खोपट येथील भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही आता सत्ताधारी पक्षात आहोत. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना गोरगरिबापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहोत. राज्यात पहिल्यांदा एका पुरुषाकडे महिला बालकल्याण…
महाराष्ट्र संवाद न्यूज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे अनुवादित ‘सिटीझनविल’ या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी 7 डिसेंबरला साडेतीन वाजता मुंबईमध्ये होत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ‘सिटीझनविल’ हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचा युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. प्रकाशनापूर्वीच तांबे यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक बहुचर्चित ठरले आहे. पुण्याच्या अमेय प्रकाशनच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित होत आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारा पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी शहरांचा विकास नियोजनबद्ध रीतीने होणे गरजेच झालंय, किंबहुना ती काळाची गरजच बनली. ही नियोजनबद्धता आणण्यासाठी हवा असतो एक वेगळा दृष्टिकोन, इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न.…
महाराष्ट्र संवाद न्यूज टपाल विभागाच्या दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेत राज्य पातळीवर अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर विभागातील दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे निवडले गेलेले सर्व विद्यार्थी संगमनेर मधील विविध शाळांचे आहेत, अशी माहिती श्रीरामपूर डाक अधीक्षक हेमंत खडकेकर व संगमनेरच्या मुख्य डाकघर येथील विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील नक्ष चंद्रकांत खामकर (इयत्ता सहावी), स्वामिनी संदीप चव्हाण (इयत्ता सातवी), प्रज्योत प्रदीप शेळके (इयत्ता नववी), मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयातील श्रद्धा विलास ताजने (इयत्ता आठवी), सुमित महेश देशमुख (इयत्ता आठवी), तनिष्क संतोष दिवे (इयत्ता नववी), अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमधून समरजीत विश्वास वाघ (इयत्ता सातवी), दिव्याल…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यभरात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंचपदासह सदस्य निवडीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे वारंवार वेबसाईट मध्ये खंडितपणा येत असल्याची दखल आयोगाने घेतली असून पारंपारिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षक, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाने (दि. ०९/११/२०२२) च्या आदेशान्वये राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केलेला असून या…
महाराष्ट्र संवाद न्यूज हळूहळू सगळेच राज्य समान नागरी कायदा लागू करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील यासाठी योग्य वेळी विचार करू, असं सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी बाबत व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस गुजरातमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, उत्तराखंडमध्ये देखील हा कायदा लागू करण्यात येणार आहे. हिमाचल आणि गुजरात देखील करणार आहे. मला वाटतं हळूहळू सगळेच राज्य हे करणार आहेत. मात्र आज मी याबद्दल अधिकृत घोषणा करू शकत नाही. कारण अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो, असेदेखील ते म्हणाले. संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी रायतेवाडीमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये बनावट मद्य निर्मितीचा कारखाना आढळून आला होता. राज्यात प्रतिबंधित असलेली दारू नामांकित कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून त्याचे वितरण केले जात असल्याचे समोर आल्यानंतर संगमनेर आणि अकोल्यातील परमिट रूमवर कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सील केलेले हे परमिट रूम पुन्हा चालू झाल्याने दारूबंदी समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. रायतेवाडी येथील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून एका घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेले गोवा आणि दमण येथील दारू आढळून आली होती. घरगुती पद्धतीने नामांकित कंपन्यांच्या बॉटलमध्ये या दारूचे रिफिलिंग केले जात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नगर जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. 13 डिसेंबर पर्यंत हे जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेत हे आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या-लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का…
महाराष्ट्र संवाद न्यूज रस्त्यातील खड्ड्यांपाठोपाठ आता भाजपने क्रीडा संकुलाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाचे नांव बदलून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल’ असे केले जाणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते जावेद जहागिरदार यांनी दिली. जहागिरदार म्हणाले, संगमनेर नगरपालिकेत ३० वर्षांपासून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अधिपत्याखाली कॉग्रेसची सत्ता आहे. त्यावेळी मोठा गाजावाजा करत नगरपालिकेने सुमारे पाच एकर परिसरामध्ये क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. संगमनेर नगरपालिकेचे क्रीडा संकुल ही शासकीय मालमत्ता आहे.…
अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निळवंडे प्रकल्प हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने हितकारक असलेल्या या प्रकल्पाच्या कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही त्यामुळे हे काम निर्धारित वेळेत व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात निळवंडे प्रकल्प कामकाज आणि गौण खनिज या विषयावर आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अधीक्षक अभियंता अरुण…
