Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एकूण ३१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विविध रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटी रुपये आणि वेल्हाळे ते राजापूर दरम्यान म्हाळुंगी नदीवर उभारल्या जाणाऱ्या पुलासाठी ६ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न सुटणार असून, नागरिकांना मोठा दिलासा…

Read More

आश्वी | वार्ताहर संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द–हनुमानवाडी–दाढ खुर्द या सुमारे ३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आश्वी खुर्द ग्रामपंचायतीला यश आले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गुदमरलेला हा रस्ता आता मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून रस्त्यावरील झाडांची छाटणी केली, खड्डे बुजवले आणि बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरू केल्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला होता. झाडांच्या फांद्यांमध्ये पथदिव्यांच्या तारा अडकल्याने संपूर्ण रस्ता अंधारात असायचा. त्यातच परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत…

Read More

शिर्डी: उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून अविस्मरणीय करण्यासाठी एक सर्वंकष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. विधान भवनात या आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे, स्वप्नील काळे यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष हा एक ऐतिहासिक टप्पा असून, या निमित्ताने राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विशेष समितीची स्थापना केली आहे. या महोत्सवांतर्गत जलाशय परिसराचे सुशोभीकरण करणे,…

Read More

आजचे सविस्तर राशिभविष्य: बुधवार, ११ मार्च २०२६ मेष आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ आज आपल्याला कामाच्या ठिकाणी संयम ठेवावा लागेल. सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. नवीन वस्तू खरेदी करण्याचे बेत आखले जातील. व्यापारात मध्यम फळ मिळेल. मान-सन्मानात वृद्धी होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मिथुन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज आपण कठीण कामे सहज पूर्ण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील चिखली गावच्या शिवारात महार वतन इनाम जमिनीवर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता अनधिकृतपणे सिमेंट रस्ता आणि भूमिगत गटाराचे बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन ठेकेदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या आईच्या पश्चात चिखली येथील महार वतन जमीन वारसा हक्काने त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असून, ती त्यांच्या सामायिक ताब्यात आहे. दरम्यानच्या काळात, चिखली ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार बांधकामाचा निधी मंजूर करून घेतला होता. या…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर शहराला शिस्त लावण्याच्या नावाखाली संगमनेर नगरपरिषदेने राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नवीन नगर रस्त्यावरील ज्या जागांवरून गरिबांच्या हातगाड्या आणि छोटी दुकाने हटवण्यात आली, तिथे आता चक्क आलिशान चारचाकी गाड्यांनी तळ ठोकला आहे. यामुळे ही मोहीम नेमकी शहर सुशोभीकरणासाठी होती की श्रीमंतांच्या बेकायदेशीर पार्किंगला रान मोकळे करून देण्यासाठी, त्यांचे पार्किंगचे चोचले पुरविण्यासाठी असा संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा गाजावाजा करत, फौजफाटा घेऊन शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. वाहतुकीला अडथळा होतो, शहराचे विद्रूपीकरण होते असे कारण देत अनेक हातावर…

Read More

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – अल्पवधीत अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो-इन्व्हेस्टर’ कंपनीवर श्रीरामपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भोकर परिसरात बेकायदेशीरपणे गुंतवणूक स्वीकारून लोकांची लूट केली जात होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी कोणतीही अधिकृत तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेऊन हा घोटाळा उघडकीस आणला आहे. या कारवाईसाठी पोलीस पथकाने २६ डिसेंबर २०२५ रोजी भोकर शिवारातील संदिपराज मोहिणीबाई कपाटे (वय ३६) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी संशयिताकडून कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे निष्पन्न केले. झडतीदरम्यान ९ पासबुक, १० चेकबुक, हिशोबाची वही, लॅपटॉप, संगणक, रोख रक्कम…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – मक्याच्या उधारी पोटी दिलेला धनादेश न वटल्याच्या कारणावरून संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर दाखल करण्यात आलेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांनी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात फिर्यादी पक्षाला आपला दावा कायदेशीर रित्या सिद्ध करता आला नाही. वावी (ता. सिन्नर) येथील महावीर ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर मिलिंद रमेश गंगवाल यांनी कोपरगाव तालुक्यातील डांगेवाडी येथील नितीन माधव कांडेकर आणि नारायण माधव कांडेकर यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात ७ लाख ७० हजार रुपयांच्या धनादेश अनादराबाबत ही तक्रार दाखल केली होती. ​फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी पोल्ट्री व्यवसायासाठी घेतलेल्या मक्याच्या उधारीपोटी नोव्हेंबर २०१९ मध्ये ७ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करून पसार होणाऱ्या उत्तर प्रदेशातील पाच अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या संगमनेर पोलिसांनी हिवरगाव पावसा टोलनाका येथे मोठ्या शिताफीने आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी व्यापाऱ्याची सुटका करत आरोपींकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे, सहा जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून आरोपी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक UP-70-HR-9272) आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला दिली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयत्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने तपास करत या दोघा सराईतांना सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. साहिल विजय देवरे आणि अनिल काथे (दोघेही राहणार नवघर गल्ली, संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी दहशत माजवली होती, मात्र पोलीस त्यांच्या मागावर असतानाही ते सातत्याने गुंगारा देत होते. या आरोपींचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. शहर…

Read More